शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

बंडीला जुंपलेली बैलजोडी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 23:39 IST

जमिनीवर पडलेल्या जिवंत विद्युत तारांना बैलांचा स्पर्श होऊन बंडीला जुंपलेली बैलजोडी जागेवरच ठार झाली. प्रसंगावधान राखत शेतकरी व त्याची आई बैलबंडीवरून उतरल्याने ते सुखरूप आहेत.

ठळक मुद्देजिवंत वीज तारांना स्पर्श । मोहटोला शेतशिवारातील घटना; अचानक सुरू झाला होता वीज प्रवाह

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : जमिनीवर पडलेल्या जिवंत विद्युत तारांना बैलांचा स्पर्श होऊन बंडीला जुंपलेली बैलजोडी जागेवरच ठार झाली. प्रसंगावधान राखत शेतकरी व त्याची आई बैलबंडीवरून उतरल्याने ते सुखरूप आहेत. सदर घटना देसाईगंज तालुक्यातील मोहटोला (किन्हाळा) गावात शनिवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली.मोहटोला येथील शेतकरी योगाजी दिनाजी दोनाडकर (३२) व त्यांची आई पार्वताबाई दिनाजी दोनाडकर (६०) हे दोघे बैलबंडीने शेतावर जात होते. जुना किन्हाळा या गावची मुख्य विद्युत लाईन या भागातून गेली आहे.किन्हाळा गाव पुनर्वसित झाल्यापासून तेथील प्रवाह बंद करण्यात आला होता. या तारा जमिनीवर पडल्या होत्या. याच भागातून नव्याने विद्युत पंपासाठी वीज तारा टाकण्यात आल्या आहेत. चालू व बंद असलेल्या दोन्ही वीज तारा एकमेकांना ओलांडून गेल्या आहेत. मृत तारांचे खांब कालपरत्वे. जमिनीकडे कलत आहेत. त्यामुळे शुक्रवारच्या रात्री मृत तारांचा स्पर्श जीवंत तारांना झाला. त्यामुळेमृत तारांना वीज प्रवाह सुरू झाला. याच तारांना दोन्ही बैलांचा स्पर्श होऊन बैलबंडीला जुपलेल्या स्थितीतच दोन्ही बैल ठार झाले. संबंधित शेतकऱ्याचे जवळपास ८० हजार रुपयांचे नुकसान झाले.संबंधित शेतकºयाची बैलबंडी लोखंडी आहे. मात्र बैलांच्या मानेवर ठेवलला जू हा लाकडी असल्याने बैलांना लागलेला वीज प्रवाह बंडीपर्यंत प्रवाहित झाला नाही. त्यामुळे बंडीवर बसलेल्या शेतकºयाला विजेचा धक्का लागला नाही.या परिसरातील अनेक वीज खांब जमिनीकडे झुकलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे भविष्यातही या वीज तारांपासून धोका आहे.शेतकऱ्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्षनिकामी झालेल्या तारा उचलण्यात याव्या, अशी मागणी शेतकºयांनी महावितरणच्या गाव पातळीवरील लाईनमनकडे केली होती. मात्र संबंधित लाईनमनने याकडे दुर्लक्ष केल्याने एवढा मोठा अनर्थ घडला. त्या तारांना वीज पुरवठा सुरू नसल्याने काहीच होणार नाही, अशी दिशाभूल करणारी माहिती संबंधित लाईनमन देत होता. त्या लाईनमनच्या वेतनातून बैल जोडीची रक्कम वसूल करून संबंधित शेतकºयाला महावितरणने ताबडतोब द्यावी. त्याचबरोबर संबंधित लाईनमनला निलंबित करावे, अन्यथा महावितरणच्या विरोधात तीव्र आंदोलन केला जाईल, असा इशारा गावातील नागरिकांनी दिला आहे.

टॅग्स :electricityवीज