शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
3
भारताविरोधातील कट उधळला! शोपियानात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
4
अमेरिकेचा यू-टर्न; ज्या व्यक्तीला कुख्यात दहशतवादी घोषित केले, त्याचीच ट्रम्प यांनी घेतली भेट
5
FD वर व्याजासोबत ५ लाख रुपयांचे विमा कव्हर; ठेवीवर कर्ज घेण्याचीही सुविधा
6
तुम्ही फक्त एवढे काम करा, आम्ही पाकिस्तानातून स्वातंत्र होऊ; बलूचची भारताकडे मागणी
7
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
8
Gold Rates 14 May : सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
9
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
10
बापमाणूस! पत्नीच्या मृत्यूनंतर चिमुकल्या लेकीला सोबत घेऊन बाबा करतोय काम, पाणावले डोळे
11
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
12
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
13
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
14
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
15
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
16
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
17
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
18
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
19
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
20
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई

अटी व शर्तींच्या अधीन धावणार बैल

By admin | Updated: December 6, 2014 01:35 IST

ग्रामीण भागातील उत्सव मानला जाणाऱ्या बैलांच्या शर्यतीना पूर्ववत केंद्र शासनाच्या पर्यावरण विभागाने अनेक अटी व शर्ती लादून मंजुरी देण्याचे ठरविले आहे.

देसाईगंज : ग्रामीण भागातील उत्सव मानला जाणाऱ्या बैलांच्या शर्यतीना पूर्ववत केंद्र शासनाच्या पर्यावरण विभागाने अनेक अटी व शर्ती लादून मंजुरी देण्याचे ठरविले आहे. या निर्णयामुळे झाडीपट्टीतील पट शौकीनांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा व तामिळनाडू या राज्यांमधील ग्रामीण भागात बैलांच्या शर्यती मोठ्या प्रमाणात लावण्यात येतात. मात्र पशुप्रेमींनी बैलांना इजा होत असल्याच्या कारणावरून सर्वोच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली. याला अनुसरून केंद्र शासनाच्या पर्यावरण विभागाने बैलांच्या शर्यतींना पूर्णपणे बंदी आणली होती़ यामुळे गावात होणाऱ्या शर्यतीच्या उत्सवावर विरजन पडले. मात्र विविध अटी व शर्ती ठेऊन पर्यावरण विभागाने या शर्यती पून्हा होणार असल्याचे जाहीर केले़ अटी व शर्ती जाहीर केल्या नसल्या तरी बैलांना ईजा होणार नाही, बैलांवर जुगार लावता येणार नाही आदी अटींचा समावेश राहू शकतो. कोणत्याही प्रकारचा व्यापारी दृिष्टकोन न ठेवता बैलांच्या शर्यती घेण्यात याव्या, असे पर्यावरणवाद्यांंना देखील वाटते़ मात्र महाराष्ट्रातील शंकरपटांना जुगाराचे रूप आल्यामुळे या अटी व शर्ती कितपत पाळल्या जातात, हे येणारा काळच ठरविणार आहे.मागील कित्येक शतकांपासून ग्रामीण भागात बैलांच्या शंकरपटांची परंपरा जोपासली जात आहे. शंकरपटांसाठी बैलांना चांगल्या प्रतीचा आहार देऊन पटासाठी तयार केले जाते़ मात्र २०१२ पासून शासनाने शंकरपटावर बंदी आणल्याने ग्रामीण भागातील परंपराच लयास जाणार असल्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र पर्यावरण विभागाने शर्यतींना दिलेल्या परवानगीच्या संकेतामुळे ग्रामीण भागात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. शंकरपटांवर आलेल्या बंदीमुळे अप्रत्यक्षरित्या बैलांच्या संगोपनाकडे शेतकऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. गावात बाहेरगावाहून पाहुणे आल्यामुळे मुले-मुली पाहण्याचा योग सुध्दा येते़ लग्नाच्या चर्चा शंकरपटाच्या निमित्ताने जुळून येत होत्या़ (वार्ताहर)