शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

शहरातील जमिनीवर टोलेजंग इमारती, तरीही 'ॲग्रिस्टेक'मध्ये शेतकरी म्हणून नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 17:02 IST

महसूल कर्मचारी शेतकऱ्यांच्या दारात : केंद्र शासनाकडून सुधारणा होईपर्यंत घरमालक राहणार शेतकरी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शहरातील काही नागरिकांनी घरे बांधण्यासाठी शेतीची जागा खरेदी केली. त्या शेतीचे प्लॉट पाडून त्यावर घरे बांधली. मात्र या जागेची गुंठेवारी करण्यात आली नाही. त्यामुळे त्यांचा उल्लेख 'शेतकरी' असाच आहे. परिणामी त्यांना ॲग्रिस्टेकमध्ये 'शेतकरी' म्हणून नोंद करावी लागणार आहे. यात घरमालकांपेक्षा महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांची अडचण वाढली आहे.

गडचिरोली शहराला लागून असलेल्या सर्वच जमिनीत शेती केली जात होती. पुढे शहराचा विस्तार होण्यास सुरुवात झाल्याने या जमिनीला घर बांधण्यासाठी चांगली किंमत मिळण्यास सुरुवात झाली. त्यामुळे शेतकऱ्यांनी घर बांधकामासाठी शेती विकायला सुरुवात केली. घर बांधायचे असेल तर प्लॉट अकृषक असणे आवश्यक आहे. मात्र अकृषक प्लॉट महाग राहत असल्याने काही प्लॉट विक्रेत्यांनी त्यावर शेतीच्या जमिनीचा पर्याय शोधून काढला.

अशी चढली शेतीच्या सातबाऱ्यावर नावे

  • प्लॉटविक्रेता एखाद्या शेतकऱ्याकडून शेतजमीन खरेदी करून त्याचे अनधिकृतपणे प्लॉट पाडत होता. हे प्लॉट जेवढे नागरिक खरेदी करतील तेवढ्यांच्या नावे रजिस्ट्री करून दिली जात होती. संबंधितांची नावे सातबारावर चढत होती.
  • शेतीची जमीन असल्याने त्यांना शासनदरबारी शेतकरीच समजले जाते. त्यामुळे त्यांची ॲग्रिस्टेकवर नोंद करणे आता बंधनकारक झाले आहे. मात्र प्रत्यक्षात त्यांनी त्या जागेवर घरे बांधली आहेत. त्यामुळे संबंधित व्यक्ती नोंदणीसाठी तयार नाहीत.

तुकडे पाडण्यावर आता शासनाची बंदीअनेकांनी शेतजमीन खरेदी करून त्यावर घरे बांधली. यात एका एकराच्या सातबारावर अनेकांची नावे राहत होती. आता मात्र हा प्रकार शासनाने बंद केला आहे. पूर्वी अशा प्रकारे जमिनीची खरेदी केली जात होती.

सीएससीवर नोंदणीची सोयशेतकऱ्यांच्या सोयीसाठी शासनाने सीएससी सेंटरवर ॲग्रिस्टेक ॲपमध्ये नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तरीही बऱ्याच शेतकऱ्यांनी अजूनही नोंदणी केलेली नाही.

नोंदणीसाठी महसूलवर वाढतोय दबावप्रत्येक शेतकऱ्याची ॲग्रिस्टेकवर नोंद होण्यासाठी महसूल प्रशासनावर दबाव वाढत चालला आहे. ज्या शेतजमिनीवर आता घरे उभी आहेत. असे नागरिक अॅग्रिस्टेकर शेतकरी म्हणून नोंद करीत नाही. त्यांची नोंद घेण्यासाठी तलाठी थेट त्यांच्या घरापर्यंत पोहोचत आहेत. त्यामुळे तलाठी कार्यालयातील इतर कामे प्रभावित झाली आहेत.

काय आहे तांत्रिक अडचणशेतजमीन म्हणून ज्याची शासनदप्तरी नोंद आहे, तिथे आता टोलेजंग इमारती उभ्या आहेत. त्यामुळे ज्यांची नावे सातबारावर आहेत, ते आता व्यवसायाने शेतकरी नाहीच. मात्र शेतजमिनीच्या सातबारावर त्यांची नावे असल्याने त्यांना शेतकरीच समजले जाणार आहे. संबंधित व्यक्तींनी गुंठेवारी करणे आवश्यक होते. मात्र ती करण्यात आले नाही.

१.७८ वरिष्ठस्तरावरून घेतला जात आहे आढावालाख शेतकरी असल्याची नोंद जिल्ह्यात आहे. या सर्वाची ॲग्रिस्टेक नोंदणी होणे आवश्यक आहे. त्यासाठी महसूलचे प्रशासन कामाला लागले आहे. 

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली