शहरं
Join us  
Trending Stories
1
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
2
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
3
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
4
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
5
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
6
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
7
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
8
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
9
प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष; या व्यक्तीवर जबाबदारी...
10
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
11
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
12
'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा', डॉ.दीपक सावंत यांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र
13
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
14
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
15
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
16
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
17
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
18
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
19
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
20
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट

गावात वृक्ष संवर्धनाची लोकचळवळ निर्माण करा

By admin | Updated: June 24, 2016 01:57 IST

पर्यावरण संवर्धनात वृक्षांचे अनन्य साधारण महत्त्व आहे. औद्योगिकरणामुळे वाढलेले प्रदुषण लक्षात घेता वृक्ष लागवड करणे व त्यांचे संर्वधन करणे ही प्रत्येक नागरिकाने स्वत:चे कर्तव्य मानले पाहिजे.

अनिल सोले यांचे प्रतिपादन : गडचिरोलीत जनजागृती रॅलीगडचिरोली : पर्यावरण संवर्धनात वृक्षांचे अनन्य साधारण महत्त्व आहे. औद्योगिकरणामुळे वाढलेले प्रदुषण लक्षात घेता वृक्ष लागवड करणे व त्यांचे संर्वधन करणे ही प्रत्येक नागरिकाने स्वत:चे कर्तव्य मानले पाहिजे. वृक्ष लागवड व संवर्धन ही लोकचळवळ निर्माण झाली पाहिजे, त्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने जनजागृती करावी, असे प्रतिपादन आमदार प्रा. अनिल सोले यांनी केले. उपवनसंरक्षक कार्यालय गडचिरोलीच्या वतीने वृक्ष लागवडीबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी गुरूवारी वृक्षदिंडी व रॅली काढण्यात आली. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाला मार्गदर्शन करताना आमदार प्रा. अनिल सोले बोलत होते. यावेळी खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, मुख्यवनसंरक्षक पी. कल्याणकुमार, उपवनसंरक्षक लक्ष्मी अनबत्तुला, रवींद्र ओल्लावार आदी मान्यवर उपस्थित होत. पुढे बोलताना आमदार सोले म्हणाले की, आपल्या राज्यात वनांचे आच्छादन १७ टक्के आहे. वास्तविक पाहता, जमिनीच्या किमान ते ३३ टक्के असायला पाहिजे. दिवसेंदिवस विविध कारणांमुळे जंगलाचा ऱ्हास होत आहे. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडत आहे. परिणामी दुष्काळ, प्रदुषण, अकाली पाऊस, तसेच विविध आजारांना संमोर जावे लागत आहे. प्रत्येक जण जन्मापासून ते मृत्यूपर्यंत पाच कोटी रूपये मुल्याचे आॅक्सीजन ग्रहण करतो. या विनामुल्य मिळणाऱ्या आॅक्सीजनची परतफेड म्हणून त्याचबरोबर भावी पिढीला पुरेशा प्रमाणात आॅक्सीजन मिळावे यासाठी येत्या १ जुलैला प्रत्येकाने एक झाड लावून ते जगवावे, असे आवाहन केले. संचालन प्रशांत खाडे, तर आभार सुनिल पेंदोरकर यांनी मानले. कार्यक्रमाला कारमेल हायस्कूलचे विद्यार्थी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)