शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
2
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...
3
कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला
4
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार हवा, पण अर्धी अमेरिकाच नाखूश! सर्वेक्षणात झाला धक्कादायक खुलासा 
5
IND vs PAK: 'इतका राग होता तर खेळलाच कशाला?' हस्तांदोलन न करण्यावर शशी थरूर संतापले!
6
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
7
वाढीव मदतीचा प्रस्ताव कॅबिनेटसमोर मांडू; मंत्री मकरंद पाटील यांचे शेतकऱ्यांना आश्वासन
8
भाजपाच्या अध्यक्षपदासाठी नाव आघाडीवर, कशी असेल पुढची वाटचाल? फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
9
भगवा कुर्ता, कपाळी भस्म; संजय दत्तने घेतलं महाकालेश्वरचं दर्शन, भक्तीत तल्लीन झाला अभिनेता
10
'रशियाचे लष्कर कागदी वाघासारखेच'; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना डिवचले, रशियानेही केला पलटवार
11
कारगिल युद्धावेळीही आपण पाकिस्तानसोबत..., हस्तांदोलन वादावरून शशी थरूर यांनी दिला टीम इंडियाला सल्ला
12
Pune Crime: विजयने ११व्या मजल्यावरून मारली उडी, ससून रुग्णालयातील धक्कादायक घटना
13
अखेर बीएसएनएल नेटवर्क बदलणार, देशभरात या तारखेला 4G सेवा सुरु करण्याची घोषणा
14
महाराष्ट्रातल्या मनगटात इतका दम आहे म्हणून.., प्रणित मोरेची खिल्ली उडवणाऱ्यांवर भडकला डीपी
15
"मला स्वातंत्र्य हवंय"; बॉयफ्रेंडच्या मदतीने बायकोने काढला नवऱ्याचा काटा, लोकेशन सांगितलं अन्...
16
TATA Motors ला ₹२,३८,६१,६६,००,००० चं मोठं नुकसान! JLR वर सायबर हल्ला; उत्पादन थांबलं, शेअर्समध्ये मोठी घसरण
17
हृदयद्रावक! नवरात्रीत मोठी दुर्घटना; देवीच्या मंडपात अचानक पसरला करंट; २ मुलांचा मृत्यू
18
मूलबाळ नसलेल्या हिंदू महिलेच्या मृत्यूनंतर तिची संपत्ती कुणाला मिळणार?; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
19
३०० पानांमध्ये लिहिलेत बाबाचे काळे कारनामे; इंस्टिट्यूटमध्ये होता टॉर्चर चेंबर! दिल्लीत खळबळ
20
GST मध्ये आणखी कपातीचे पंतप्रधान मोदींचे संकेत; म्हणाले, "आम्ही इकडेच थांबवणार नाही..."

पूल बांधा अन्यथा निवडणुकीवर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 06:00 IST

नवीन उंच पूल बांधून देण्यासाठी गावकºयांनी यापूर्वी लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडे अनेकवेळा पाठपुरावा केला आहे. मात्र लोकप्रतिनिधींनी केवळ आश्वासन दिले आहे. तर प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. पावसाळ्यात एखाद्याची प्रकृती बिघडल्यास जीव मुठीत घालून पुलावरून पाणी असतानाही पुढचा प्रवास करावा लागतो. पाणी एकदमच जास्त असल्यास कोणताही पर्याय शिल्लक राहत नाही.

ठळक मुद्देठेंगण्या पुलामुळे अडते पावसाळ्यात वाट : कुंभी (मोकासा) व माडेमूल येथील गावकऱ्यांचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पावसाळ्यात वाट अडविणाºया पोटफोडी नदीवर उंच पूल बांधावा, अन्यथा निवडणुकीवर बहिष्कार घातला जाईल, असा इशारा माडेमूल व कुंभी (मोकासा) येथील नागरिकांनी पत्रकार परिषदेतून दिला आहे.माडेमूल व कुंभी ही दोन्ही गावे जिल्हा मुख्यालयापासून अवघ्या १० किमी अंतरावर आहेत. या दोन्ही गावांना जाण्यासाठी पोटफोडी नदी ओलांडून जावे लागते. दुसरा कोणताही मार्ग नाही. गावकऱ्यांनी सातत्याने मागणी केल्यानंतर जिल्हा परिषदेने २००२ मध्ये सिमेंटचे पाईप टाकून पूल बांधून दिला. मात्र या पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्यात पुलावरून पाणी राहते. पावसाळ्याच्या दिवसात जवळपास दीड ते दोन महिने पुलावरून पाणी वाहत असल्याने या गावांचा संपर्क तुटतो. दोन्ही गावांना पोटफोडी नदी मार्गाशिवाय दुसरा मार्ग उपलब्ध नाही. ठेंगण्या पुलावरून आजपर्यंत अनेकांचा जीव गेला आहे. २०१६ मध्ये पाचव्या वर्गात शिकणारा विद्यार्थी वाहून गेला. यावर्षी सुद्धा २१ आॅगस्ट रोजी तिसºया वर्गात शिकणारा हेमंत किशोर निकुरे हा वाहून गेला. दुसºया दिवशी त्याचा मृतदेह विहिरगाव येथील पुलाखाली सापडला.नवीन उंच पूल बांधून देण्यासाठी गावकºयांनी यापूर्वी लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडे अनेकवेळा पाठपुरावा केला आहे. मात्र लोकप्रतिनिधींनी केवळ आश्वासन दिले आहे. तर प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. पावसाळ्यात एखाद्याची प्रकृती बिघडल्यास जीव मुठीत घालून पुलावरून पाणी असतानाही पुढचा प्रवास करावा लागतो. पाणी एकदमच जास्त असल्यास कोणताही पर्याय शिल्लक राहत नाही. गावात चवथीपर्यंत शाळा आहे. पाचवीपासून विद्यार्थी चांदाळा, गडचिरोली येथे शिक्षणासाठी जातात. पावसाळ्यात मात्र या विद्यार्थ्यांची शाळा बुडते. गरोदर माता, लहान बालके यांना सुविधेपासून वंचित राहावे लागत आहे.यानंतरच्या सर्वच निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचा इशारा गावकºयांनी दिला आहे. याबाबत गावकरी जिल्हाधिकाºयांना निवेदन देणार आहेत. पत्रकार परिषदेला सरपंच पुष्पा सोनुले, ग्रा.पं.सदस्य डिम्पल बांबोळे, विजय मडावी, तुळशिराम मेश्राम, यश्वगीता गेडाम, निवृत्ता नैताम, वैशाली सोनुले, रमेश कुमरे, हितराज बांबोळे, राकेश मोहुर्ले, अशोक मोहुर्ले यांच्यासह कुंभी व माडेमूल येथील जवळपास १५० नागरिक उपस्थित होते.१५ दिवस उलटूनही नुकसानीचा पंचनामा नाहीअतिवृष्टीमुळे कुंभी व मोडेमूल येथील हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. मात्र अजूनपर्यंत कृषी सहायक, तलाठी यांनी प्रत्यक्ष गावात येऊन नुकसानीचा पंचनामा केला नाही. कृषी सहायक व तलाठ्याचे या दोन्ही गावांमध्ये दर्शनच होत नाही. अनेकांना तर कृषी सहायक व तलाठ्याचे नाव सुद्धा माहित नाही. पंचनामे न झाल्यास शेतकरी मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता वर्तविली आहे.कुंभी येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत जीर्ण झाली आहे. नवीन इमारत बांधण्याची मागणी गावकºयांनी केली.