शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

पूल बांधा अन्यथा निवडणुकीवर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 06:00 IST

नवीन उंच पूल बांधून देण्यासाठी गावकºयांनी यापूर्वी लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडे अनेकवेळा पाठपुरावा केला आहे. मात्र लोकप्रतिनिधींनी केवळ आश्वासन दिले आहे. तर प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. पावसाळ्यात एखाद्याची प्रकृती बिघडल्यास जीव मुठीत घालून पुलावरून पाणी असतानाही पुढचा प्रवास करावा लागतो. पाणी एकदमच जास्त असल्यास कोणताही पर्याय शिल्लक राहत नाही.

ठळक मुद्देठेंगण्या पुलामुळे अडते पावसाळ्यात वाट : कुंभी (मोकासा) व माडेमूल येथील गावकऱ्यांचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पावसाळ्यात वाट अडविणाºया पोटफोडी नदीवर उंच पूल बांधावा, अन्यथा निवडणुकीवर बहिष्कार घातला जाईल, असा इशारा माडेमूल व कुंभी (मोकासा) येथील नागरिकांनी पत्रकार परिषदेतून दिला आहे.माडेमूल व कुंभी ही दोन्ही गावे जिल्हा मुख्यालयापासून अवघ्या १० किमी अंतरावर आहेत. या दोन्ही गावांना जाण्यासाठी पोटफोडी नदी ओलांडून जावे लागते. दुसरा कोणताही मार्ग नाही. गावकऱ्यांनी सातत्याने मागणी केल्यानंतर जिल्हा परिषदेने २००२ मध्ये सिमेंटचे पाईप टाकून पूल बांधून दिला. मात्र या पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्यात पुलावरून पाणी राहते. पावसाळ्याच्या दिवसात जवळपास दीड ते दोन महिने पुलावरून पाणी वाहत असल्याने या गावांचा संपर्क तुटतो. दोन्ही गावांना पोटफोडी नदी मार्गाशिवाय दुसरा मार्ग उपलब्ध नाही. ठेंगण्या पुलावरून आजपर्यंत अनेकांचा जीव गेला आहे. २०१६ मध्ये पाचव्या वर्गात शिकणारा विद्यार्थी वाहून गेला. यावर्षी सुद्धा २१ आॅगस्ट रोजी तिसºया वर्गात शिकणारा हेमंत किशोर निकुरे हा वाहून गेला. दुसºया दिवशी त्याचा मृतदेह विहिरगाव येथील पुलाखाली सापडला.नवीन उंच पूल बांधून देण्यासाठी गावकºयांनी यापूर्वी लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडे अनेकवेळा पाठपुरावा केला आहे. मात्र लोकप्रतिनिधींनी केवळ आश्वासन दिले आहे. तर प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. पावसाळ्यात एखाद्याची प्रकृती बिघडल्यास जीव मुठीत घालून पुलावरून पाणी असतानाही पुढचा प्रवास करावा लागतो. पाणी एकदमच जास्त असल्यास कोणताही पर्याय शिल्लक राहत नाही. गावात चवथीपर्यंत शाळा आहे. पाचवीपासून विद्यार्थी चांदाळा, गडचिरोली येथे शिक्षणासाठी जातात. पावसाळ्यात मात्र या विद्यार्थ्यांची शाळा बुडते. गरोदर माता, लहान बालके यांना सुविधेपासून वंचित राहावे लागत आहे.यानंतरच्या सर्वच निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचा इशारा गावकºयांनी दिला आहे. याबाबत गावकरी जिल्हाधिकाºयांना निवेदन देणार आहेत. पत्रकार परिषदेला सरपंच पुष्पा सोनुले, ग्रा.पं.सदस्य डिम्पल बांबोळे, विजय मडावी, तुळशिराम मेश्राम, यश्वगीता गेडाम, निवृत्ता नैताम, वैशाली सोनुले, रमेश कुमरे, हितराज बांबोळे, राकेश मोहुर्ले, अशोक मोहुर्ले यांच्यासह कुंभी व माडेमूल येथील जवळपास १५० नागरिक उपस्थित होते.१५ दिवस उलटूनही नुकसानीचा पंचनामा नाहीअतिवृष्टीमुळे कुंभी व मोडेमूल येथील हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. मात्र अजूनपर्यंत कृषी सहायक, तलाठी यांनी प्रत्यक्ष गावात येऊन नुकसानीचा पंचनामा केला नाही. कृषी सहायक व तलाठ्याचे या दोन्ही गावांमध्ये दर्शनच होत नाही. अनेकांना तर कृषी सहायक व तलाठ्याचे नाव सुद्धा माहित नाही. पंचनामे न झाल्यास शेतकरी मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता वर्तविली आहे.कुंभी येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत जीर्ण झाली आहे. नवीन इमारत बांधण्याची मागणी गावकºयांनी केली.