शहरं
Join us  
Trending Stories
1
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
2
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
3
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
4
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
5
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
6
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
7
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
8
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
9
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
10
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
11
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
12
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?
13
अमानुष! "आजीला सोडून दे", सुनेची वृद्ध सासूला बेदम मारहाण; वाचवण्यासाठी चिमुकल्याची धडपड
14
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
15
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
16
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
17
अंगारक संकष्ट चतुर्थीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status शेअर करा; गणेशभक्तांना द्या शुभेच्छा!
18
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
19
Bigg Boss 19: सलमानच्या शोची उपेंद्र लिमयेंना ऑफर? अभिनेता म्हणाला- "मला अनेकांनी विचारलं..."
20
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी

तुटलेला पूल नागरिकांसाठी धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 00:14 IST

गेल्या अनेक वर्षापासून मोडकळीस आलेला धानोरा तालुक्यातील खांबाडा-मुस्का मार्गावर असलेल्या नदीवरील पूल नागरिकांसाठी धोकादायक ठरला आहे.

ठळक मुद्देखांबाडा-मुस्का मार्गावरील पुलाच्या समस्या : कडा पूर्णत: मोडकळीस

ऑनलाईन लोकमतसुरसुंडी : गेल्या अनेक वर्षापासून मोडकळीस आलेला धानोरा तालुक्यातील खांबाडा-मुस्का मार्गावर असलेल्या नदीवरील पूल नागरिकांसाठी धोकादायक ठरला आहे. या मार्गावर वाहनांची वर्दळ राहत असल्याने धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे, आगामी पावसाळ्यात जीवितहानी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.खांबाडा - मुस्का या मार्गावर खोब्रागडी नदी आहे. पुलावरुन दिवसभरात अनेक वाहने मार्गक्रमण करीत असतात. या मार्गावरुन भाकरोंडी, रांगी, मानापूर, देलनवाडी, आरमोरीकडे दररोज शेकडो वाहने जात असतात. मात्र गेल्या अनेक वर्षापासून या मार्गावरील पुलाची कडा मोडकळीस आलेली आहे. परंतु या पुलाच्या दुरुस्तीकडे संबंधित प्रशासनाने अक्षम्य दुर्लक्ष केलेले आहे. पावसाळ्यात तात्पूरती सोय म्हणून गावातील नागरीक मोडकळीस आलेल्या कडेवर मुरुम टाकत असतात. यामुळे थोडाफार धोका टळतो. परंतु पूर आल्यास परिस्थिती ‘जैसे थे’ निर्माण होते. यापूर्वी या कडेवरुन काही वाहने उलटून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती. परंतु सुदैवाने मोठा अपघात घडला नाही. परिसरातील लोकप्रतिनिधी नाममात्र असून नागरीकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करीत आहेत. यामुळे नागरीकांमध्ये संताप व्यक्त केल्या जात आहे. या मोडकळीस आलेल्या कडेची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी परिसरातील नागरीकांनी केली आहे.खांबाडा-मुस्का या मार्गाचीही दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागतो. अशा प्रकारच्या अनेक समस्या सुरसुंडी भागात निर्माण झाले आहेत. या समस्यांबाबत काही नागरिकांनी प्रशासनाकडे तसेच स्थानिक लोकप्रतिनिधीकडे गाºहाणे मांडले. मात्र पुलाच्या व रस्त्यांच्या समस्यांकडे अधिकारी व लोकप्रतिनिधींनी लक्ष दिले नाही.अनेक नागरिक योजनांपासून वंचितकेंद्र व राज्य सरकारने सर्वसामान्यांच्या विकासासाठी अनेक विभागामार्फत विविध योजना कार्यान्वित केल्या आहेत. मात्र सुरसुंडी भागात प्रशासनाचे कर्मचारी मुख्यालयी राहत नाही. तसेच अधिकारीही दौरे करून वस्तूस्थिती जाणून घेत नाही. एकूणच प्रशासकीय उदासीनतेमुळे या भागातील अनेक नागरिक शासनाच्या योजनांपासून वंचित असल्याचे दिसून येत आहे.