शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
4
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
5
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
6
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
7
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
8
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
9
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
10
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
11
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
12
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
13
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
14
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
15
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
16
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
17
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
18
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
19
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
20
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय

ब्रिटिशकालीन पर्जन्यमापक टॉवर कोसळण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 23:27 IST

जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या सिरोंचा या तालुका मुख्यालयी ब्रिटिशकालीन राजवटीत बांधण्यात आलेल्या पर्जन्यमापक टॉवरची दुरवस्था झाली आहे.

ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्ष : सिरोंचातील ऐतिहासिक वास्तूचे जतन करण्याची मागणी

आनंद मांडवे ।आॅनलाईन लोकमतसिरोंचा (गडचिरोली) : जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या सिरोंचा या तालुका मुख्यालयी ब्रिटिशकालीन राजवटीत बांधण्यात आलेल्या पर्जन्यमापक टॉवरची दुरवस्था झाली आहे. पूर्णत: दगडी बांधकाम असलेल्या या ऐतिहासिक वास्तूची निगा राखण्यात शासन व प्रशासनाला आत्मियता नसल्याने त्याची पडझड होत आहे. पुरातत्व विभागामार्फत या वास्तूचे नविनीकरण करून या ऐतिहासिक मूल्यांचे जतन करावे, अशी मागणी होत आहे.हवामान खात्याचे कार्यालय उपराधानी नागपूर येथे असले तरी या खात्याचा कर्मचारी सिरोंचा येथे कार्यरत नाही. इंग्रजांच्या सत्ताकाळात या विभागातील हवामानाचा अंदाज व पर्जन्याचे मोजमाप करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा होती. स्वातंत्र्यानंरही बरीच वर्षे हे कार्य सुरू होते. १९८० पर्यंत स्थानिक महसूल विभागाकडून पर्जन्याची आकडेवारी वरिष्ठ कार्यालयाला पाठविण्यात येत असे. या कामासाठी स्वतंत्र कर्मचारी तैनात असायचा. मात्र काही दिवसानंतर या ठिकाणी कर्मचारी ठेवणे बंद झाले. नागपूरस्थित हवामान खात्याच्या कार्यालयालाही अशी वास्तू महाराष्टÑाच्या अंतिम टोकावरील सिरोंचा येथे अद्यापही गतवैभव टिकवून असल्याचे विस्मरण झाले आहे. लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासनाने लक्ष घातल्यास गतवैभव पुन्हा लाभू शकते. यासाठी राज्य शासन व लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशांकडे दुर्लक्षतहसील कार्यालयामागे ध्वजस्तंभाजवळ ही टॉवरवजा वास्तू असून तिच्या लाकडी पायऱ्या जीर्ण झाल्या आहेत. एकमेव सागवानी दाराची मोडतोड झाली आहे. टॉवरच्या शिर्ष भागावर अमलतासचे झाड उगवले आहे. दर दिवसागणिक त्याचा आकार व घेर वाढत आहे. या झाडामुळे टॉवरला धोका निर्माण झाला आहे.सध्या ही वास्तू पूर्व दिशेकडे झुकली आहे. आठवडी बाजार, तहसील कार्यालयाचे कर्मचारी व नागरिकांची रहदारी येथूनच राहते. वास्तू कोसळून धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.तत्कालीन जिल्हाधिकारी अतुल पाटने हे पुष्कर यात्रेचा आढावा घेण्यासाठी सिरोंचा येथे आले असता सदर पर्जन्यमापक इमारतीची दुरवस्था लक्षात घेवून दुस्तीसाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले. मात्र त्यानंतर या इमारकडे प्रशासनाचे कायमचे दुर्लक्ष झाले आहे.१०७ वर्षानंतही विश्रामगृहे सुस्थितीतगडचिरोली जिल्ह्याच्या सिरोंचा तालुक्याला निसर्गसौंदर्याची देणे आहे. त्यामुळे १९१० मध्ये ११ हजार ३६८ रूपये खर्चुन सिरोंचा येथे ब्रिटिश सरकारने विश्रामगृह बांधले. १०० वर्षांपेक्षा अधिक कालावधी झाला असल्याने सदर इमारती निर्लेखित करण्याविषयी भारत सरकारकडून पत्र येतात. मात्र ब्रिटिशांनी केलेल्या कामाचा दर्जा गुणवत्तापूर्ण व सुसंगत असल्याने या इमारती अजूनही अभेद्य आहेत. सिरोंचा तालुक्यातील बामणी, सोमनपल्ली व कोपेला या आदिवासी व दुर्गम भागातही ब्रिटिशकालीन विश्रामगृहे आहेत. बामनीच्या विश्रामगृहात उपपोलीस स्टेशन थाटले आहे. सोमनपल्लीच्या विश्रामगृहाची दुरावस्था झाली आहे, तर कोपेला येथील विश्रामगृहाची समाजकंटकांनी २३ मार्च २००९ रोजी जाळपोळ केली. या इमारतींचे जतन होण्यासाठी पुरातत्व विभागाने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. ऐतिहासिक वास्तूंकडे सरकारचा कानाडोळा होत आहे.