शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोली जिल्ह्यात प्राणहिता नदीवरील पुलाचे काम अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 13:25 IST

अहेरीजवळील वांगेपल्ली गावालगत प्राणहिता नदीपात्रात महाराष्ट्र व तेलंगणा राज्याला जोडणाऱ्या पुलाचे काम अंतिम टप्य्यात आले आहे. बहूप्रतिक्षित पुलाचे काम येत्या दहा दिवसांत पूर्ण होणार असून येत्या काही दिवसात सर्व सामान्य जनतेसाठी हा खुला होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्दे१० दिवसात होणार काम पूर्णरस्त्याच्या कामालाही सुरुवातपावसाळ्यात गैरसोय थांबणारअहेरीची बाजारपेठ होणार महत्वाची

प्रतीक मुधोळकरलोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली: अहेरीजवळील वांगेपल्ली गावालगत प्राणहिता नदीपात्रात महाराष्ट्र व तेलंगणा राज्याला जोडणाऱ्या पुलाचे काम अंतिम टप्य्यात आले आहे. बहूप्रतिक्षित पुलाचे काम येत्या दहा दिवसांत पूर्ण होणार असून येत्या काही दिवसात सर्व सामान्य जनतेसाठी हा खुला होण्याची शक्यता आहे.महाराष्ट्र व तेलंगणा राज्याला जोडणारा या पुलाचे बांधकाम तेलंगणा राज्य करीत आहे. चोवीस पिल्लर व अंदाजित नव्वद कोटी किंमत असलेल्या हा पूल हा दोन राज्याला जोडणारा असून येत्या पावसाळ्यात नागरिकांना या पुलावरून सीमापार करता येणार आहे.प्राणहिता नदीवर आधी पूल नसल्याने दोन्ही राज्यातील नागरिकांना जीव धोक्यात घालून नावेने प्रवास करावा लागत होता. काहींना दुचाकीवरून प्रवास करताना नदीत बुडून मृत्यूला ही सामोरे जावे लागले आहे. तेलंगणा राज्याततील गुडेम, कवटाला, बेज्जूर,सिरपूर, कागजनगर हे महत्वाचे गावे अहेरी शहरापासून ७० किमी अंतराच्या वर्तुळात आहे. विशेष म्हणजे अहेरी उपविभागीय जनतेला नजिकचे रेल्वे स्थानक आधी बल्लारपूर होते मात्र पूल पूर्ण झाल्यामुळे सिरपूर कागजनगर हे रेल्वे जंक्शन हे सर्वात जवळ असणार आहे.महाराष्ट्र व तेलंगणा राज्यातील नागरिकांचे रोटी व बेटीचे व्यवहार आणखी घनिष्ठ होणार आहे. महाराष्ट्र राज्यालगत असलेल्या तेलंगणा राज्यातील अनेक गावातील नागरिक खरेदीसाठी अहेरी बाजारपेठेत येत असतात आणि अहेरी परिसरातील अनेक विवाह संबंध व नातेसंबंध तेलंगणा राज्यात जुळून आहे.तेलंगणाचे आमदार कोनेरू कोनप्पा यांनी या पुलाच्या बांधकामांसाठी विशेष प्रयत्न केले व मागील फडणवीस सरकार कडून ही सहकार्य केले गेले होते.येत्या दहा ते पंधरा दिवसात पुलाचे बांधकाम पूर्ण होणार आहे आणि पुलापासून मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या रस्त्याचे बांधकाम ही सुरू झाले आहे. पावसाळ्यात होणारी नागरिकांची गैरसोय आता थांबणार आहे.मात्र सध्या कोरोनाचे सावट असल्याने राज्याच्या सीमा सील आहेत त्यामुळे दोन्ही राज्याच्या नागरिकांना प्रत्यक्षपणे व्यवहार आणि ये जा करण्यासाठी आणखी वाट बघावी लागणार आहे.

टॅग्स :riverनदी