शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
3
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
4
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
5
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
6
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
7
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
8
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
9
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
10
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
11
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
12
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
13
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
14
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
15
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
16
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
17
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
18
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
19
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
20
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?

गडचिरोली जिल्ह्यात प्राणहिता नदीवरील पुलाचे काम अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 13:25 IST

अहेरीजवळील वांगेपल्ली गावालगत प्राणहिता नदीपात्रात महाराष्ट्र व तेलंगणा राज्याला जोडणाऱ्या पुलाचे काम अंतिम टप्य्यात आले आहे. बहूप्रतिक्षित पुलाचे काम येत्या दहा दिवसांत पूर्ण होणार असून येत्या काही दिवसात सर्व सामान्य जनतेसाठी हा खुला होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्दे१० दिवसात होणार काम पूर्णरस्त्याच्या कामालाही सुरुवातपावसाळ्यात गैरसोय थांबणारअहेरीची बाजारपेठ होणार महत्वाची

प्रतीक मुधोळकरलोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली: अहेरीजवळील वांगेपल्ली गावालगत प्राणहिता नदीपात्रात महाराष्ट्र व तेलंगणा राज्याला जोडणाऱ्या पुलाचे काम अंतिम टप्य्यात आले आहे. बहूप्रतिक्षित पुलाचे काम येत्या दहा दिवसांत पूर्ण होणार असून येत्या काही दिवसात सर्व सामान्य जनतेसाठी हा खुला होण्याची शक्यता आहे.महाराष्ट्र व तेलंगणा राज्याला जोडणारा या पुलाचे बांधकाम तेलंगणा राज्य करीत आहे. चोवीस पिल्लर व अंदाजित नव्वद कोटी किंमत असलेल्या हा पूल हा दोन राज्याला जोडणारा असून येत्या पावसाळ्यात नागरिकांना या पुलावरून सीमापार करता येणार आहे.प्राणहिता नदीवर आधी पूल नसल्याने दोन्ही राज्यातील नागरिकांना जीव धोक्यात घालून नावेने प्रवास करावा लागत होता. काहींना दुचाकीवरून प्रवास करताना नदीत बुडून मृत्यूला ही सामोरे जावे लागले आहे. तेलंगणा राज्याततील गुडेम, कवटाला, बेज्जूर,सिरपूर, कागजनगर हे महत्वाचे गावे अहेरी शहरापासून ७० किमी अंतराच्या वर्तुळात आहे. विशेष म्हणजे अहेरी उपविभागीय जनतेला नजिकचे रेल्वे स्थानक आधी बल्लारपूर होते मात्र पूल पूर्ण झाल्यामुळे सिरपूर कागजनगर हे रेल्वे जंक्शन हे सर्वात जवळ असणार आहे.महाराष्ट्र व तेलंगणा राज्यातील नागरिकांचे रोटी व बेटीचे व्यवहार आणखी घनिष्ठ होणार आहे. महाराष्ट्र राज्यालगत असलेल्या तेलंगणा राज्यातील अनेक गावातील नागरिक खरेदीसाठी अहेरी बाजारपेठेत येत असतात आणि अहेरी परिसरातील अनेक विवाह संबंध व नातेसंबंध तेलंगणा राज्यात जुळून आहे.तेलंगणाचे आमदार कोनेरू कोनप्पा यांनी या पुलाच्या बांधकामांसाठी विशेष प्रयत्न केले व मागील फडणवीस सरकार कडून ही सहकार्य केले गेले होते.येत्या दहा ते पंधरा दिवसात पुलाचे बांधकाम पूर्ण होणार आहे आणि पुलापासून मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या रस्त्याचे बांधकाम ही सुरू झाले आहे. पावसाळ्यात होणारी नागरिकांची गैरसोय आता थांबणार आहे.मात्र सध्या कोरोनाचे सावट असल्याने राज्याच्या सीमा सील आहेत त्यामुळे दोन्ही राज्याच्या नागरिकांना प्रत्यक्षपणे व्यवहार आणि ये जा करण्यासाठी आणखी वाट बघावी लागणार आहे.

टॅग्स :riverनदी