लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : लग्नाचे वय निघून गेल्यानंतर नातेवाइकांत, समाजात संबंध जुळणे कठीण होते. अशा स्थितीत मॅटरमनी साइडचा वापर केला जातो. त्यावर आपल्यासाठी जोडीदार शोधण्यात येतो. या जोडीदाराबद्दल पुरेशी माहिती उपलब्ध होत नाही. स्थळ जोडण्यासाठी आलेली मंडळी बोलण्यातून मुलाकडच्यांना प्रभावित करतात. त्यामुळे फार चौकशी करण्याचाही वेळ मुलाला मिळत नाही. तसेच वय वाढले असल्याने आता आणखी चौकशी का, असे म्हणत संबंध जोडला जातो. कमी कालावधीतच लग्न काढण्यात येते आणि नंतर मुलाकडून मिळालेल्या भेटवस्तू, रोख, दागिने हे घेऊन नवरी नातेवाइकासह पसार होते.
फसवणुकीचे नवीन तीन प्रकार गुन्हेगारांकडून वापरले जात आहे. त्यामुळे मॅटरमनी साइड सुरक्षित आहे असे म्हणता येणार नाही. येथूनच दीर्घकाळ लग्नाच्या प्रतीक्षेत असणाऱ्यांचा शोध घेतला जातो. बऱ्याचदा मुलीला उच्चपदस्थ नोकरी असल्याची बतावणी केली जाते. नंतर पस्तावा करण्याची वेळ ओढवते. मागील पाच महिन्यांत जिल्ह्यात अशी तक्रार दाखल नाही. मात्र भविष्यात अशा घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील युवकांनी सावध असण्याची अत्यंत आवश्यकता निर्माण झाली आहे.
पुनर्विवाह करणाऱ्यांना बसतो सर्वाधिक धोकापुनर्विवाह करणारा युवक अलगद जाळ्यात सापडतो. असेच सावज हेरून या टोळ्या संबंध जुळवितात. प्रेमाने दागदागिने घेऊन नंतर संधी मिळताच नवरीसह तेथून पसार होतात, असे प्रकार मोठ्या शहरांमध्ये वाढत आहेत.
पाच महिन्यांत एकही गुन्हा दाखल नाही
- लग्न करून नवऱ्याची फसवणूक करणाऱ्या मुर्लीच्या टोळ्याच सक्रिय झाल्या आहे. गडचिरोली जिल्ह्यात पाच महिन्यांत असा एकही गुन्हा नाही.
- महानगरांमध्ये लुटेरी दुल्हनचा प्रकार मोठ्या प्रमाणात घडत आहे. ग्रामीण भागात शक्यतोवर संपूर्ण माहिती घेऊनच लग्न केले जातात.
- फसवणूक झालेल्यांकडून बऱ्याचदा 3 त्याची वाच्यता केली जात नाही. त्यामुळे रेकॉर्डवर येत नाही.
- सध्या मोठ्या शहरांमध्ये सुरू असलेला हा प्रकार गडचिरोली जिल्ह्यातही सुरू होऊ शकतो.