शहरं
Join us  
Trending Stories
1
'ठाकरे बंधूंचा वचननामा ४ जानेवारीला प्रसिद्ध करणार, नंतर एवढ्या संयुक्त सभा होणार', संजय राऊत यांनी दिली माहिती 
2
Success Story: कपडे धुवून कोट्यधीश बनली 'ही' व्यक्ती, एकेकाळी रिक्षाचं भाडं देण्यासही नव्हते पैसे, कसा होता आजवरचा प्रवास
3
तो काळ परत येणार नाही...! PCO चा बुथ ते 3G डोंगलचा वेग; स्मार्टफोन आणि ५जीच्या स्पीडने तुम्ही विसरलात का...?
4
अर्ज छाननीचाही ‘रात्रीस खेळ चाले’; मुंबईत १६७ अर्ज बाद, भाईंदरमध्ये ६०० अर्ज वैध
5
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका, एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी वाढ
6
प्रवाशांनो… २४ ट्रेनची वेळ बदलली, ६२ ट्रेनचा वेग वाढला; पुणे, मुंबईतील अनेक ट्रेनचा समावेश!
7
घरातील दागिन्यांतून कमवा दरमहा पैसे; नेमके कसे मिळतात? जाणून घ्या...
8
सोने व्यापारी, पत्नी आणि तो...! एकाकडे पिस्तूल, दुसऱ्याकडे चाकू, तिघांचाही मृत्यू; कोणी कोणाला मारले? शेजारी, पोलिसही चक्रावले...
9
Astrology: १००० वर्षांनंतर 'त्रिवेणी योग' पुढची ३ वर्षे मिळेल नशीबाची साथ; आजच करा 'ही' भाग्यसिद्धी मुद्रा
10
Stock Market Today: शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स १५० अंकांनी वधारला, निफ्टीत ५० अंकांची तेजी; FMCG, फार्मा शेअर्समध्ये तेजी
11
Ikkis Review: अगस्त्य नंदाचा नव्हे; धर्मेंद्र यांचाच वाटतो 'इक्कीस'; कथा, अभिनय जमेच्या बाजू, पण...; वाचा रिव्ह्यू
12
Mumbai Rains: २०२६ च्या पहिल्याच दिवशी मुंबई चिंब भिजली! थंडीत पावसाच्या सरींनी मुंबईकर चक्रावले
13
Hyundai Cars Price Hike: ह्युंदाई क्रेटा, व्हेन्यू, एक्स्टर... आजपासून ह्युंदाईच्या कार्स महागल्या, किती खिसा रिकामा करावा लागणार?
14
भाजपच्या बंडोबांना थंडोबा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची उडी; अनेक नेत्यांवर जबाबदारी
15
मुंबईत रिपब्लिकन पक्षाला १७ ऐवजी १२ जागा : आठवले
16
९८ लाख कोटींच्या साम्राज्याचा सम्राट निवृत्त! वॉरेन बफे यांचा कंपनीतून ९५ व्या वर्षी राजीनामा
17
आजपासून काय-काय बदलणार? एलपीजी, सीएनजी स्वस्त? कार महागणार, पीएफच्या नियमांतही मोठे बदल होणार अन् बरंच काही...!
18
आजचे राशीभविष्य १ जानेवारी २०२६ : नववर्षाचा पहिला दिवस 'या' राशींसाठी ठरणार लाभदायी; वाचा १२ राशींचे सविस्तर भविष्य
19
'नाराज'कीय वातावरण तापले! निष्ठावंतांचा संताप कायम; मंत्री सावेंच्या कारला काळं फासण्याचा प्रयत्न, कराडांना घेराव, पदाधिकाऱ्याच्या कानशिलात
20
नाशिक-अक्कलकोट कॉरिडॉरला हिरवा कंदील, १७ तासांचा प्रवास आणि २०१ किमीचे अंतर वाचणार
Daily Top 2Weekly Top 5

तहसीलमध्ये दलालांचा रुबाब

By admin | Updated: September 22, 2014 00:55 IST

आष्टी : येथील तहसील कार्यालयाच्या परिसरात दिवसेंदिवस दलालांचे प्रमाण वाढतच चालले आहे. विविध कागदपत्रे काढण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसह नागरिकांची आर्थिक लूट करण्याचे काम हे दलाल करीत आहेत.

आष्टी : येथील तहसील कार्यालयाच्या परिसरात दिवसेंदिवस दलालांचे प्रमाण वाढतच चालले आहे. विविध कागदपत्रे काढण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसह नागरिकांची आर्थिक लूट करण्याचे काम हे दलाल करीत आहेत. याकडे मात्र तहसीलदार ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे. एकूणच या परिसरात दलालांचा रूबाब वाढत असल्याचे दिसून येत आहे.शैक्षणिक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी व ग्रामीण भागातील नागरिकांना अत्यावश्यक कागदपत्रे काढण्यासाठी तहसील कार्यालयात यावे लागते. जात प्रमाणपत्र, धरणग्रस्त, रहिवासी प्रमाणपत्र अशी विविध प्रकारची कागदपत्रे काढण्यासाठी तर नवीन रेशनकार्ड, निराधार योजनेचे प्रमाणपत्र काढण्यासाठी कार्यालयाच्या परिसरात विद्यार्थी व नागरिकांच्या नेहमीच रांगा लागलेल्या असतात.येथे आल्यानंतर त्यांना थेट ना तहसीलदारांना भेटून दिले जाते ना सेतू मधील कर्मचाऱ्यांना. माणूस दिसला की, हे दलाल त्याचा पाठलाग करीत त्याला जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करतात. सर्वसामान्य नागरिकांनी प्रमाणपत्र काढण्यासाठी आवश्यक त्या कागदात्रांची पूर्तता केली तरी संबंधित अधिकाऱ्यांकडूनही नियमावलीवर बोट ठेवीत जागोजागी अडवणूक केली जाते. दलालांकडून कोणत्याही कागदपत्रांची पुर्तता न करता घरपोच प्रमाणपत्र आणून दिले जात असल्याचा प्रकारही येथील तहसील कार्यालयामध्ये दिसून येतो़संपूर्ण कागदपत्रांची पूर्तता करूनही सेतू कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून दुर्लक्ष केले जाते़ संबंधित काम हे दलालाकडूनच करून घेण्यात कर्मचाऱ्यांचा अर्थपूर्ण दृष्टीकोन असल्याच्या आरोप सर्वसामान्यांमधून होत आहे. सेतू कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या दुटप्पी भूमिकेमुळे नागरिकांना प्रमाणपत्रासाठी अतिरीक्त पैशाचा फटका सहन करावा लागत आहे. तहसील कार्यालयातील दिवसेंदिवस दलालांचा वाढते प्रमाण पाहता त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी वेळोवेळी संघटनांनी केली. मात्र आर्थिक हीत जोपासत तहसीलदार यांनीही अद्यापर्यंत कठोर पाऊल उचलले नाही. त्यामुळे दलालांना तहसील कार्यालयातूनच अभय मिळत असल्याचा आरोप होत आहे़यासंबधी तहसीलदार राजीव शिंदे यांना विचारणा केली असता, अशा दलालांवर कारवाई येईल, असे सांगितले़ तहसीलदारांकडूनच पाठराखवणतहसीलच्या आवारात ५० ते ६० दलाल नियमित बसलेले असतात़ या दलालांमार्फत आलेल्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यास तहसीलदार अधिक पसंती देत असल्याचा आरोपही येथील नागरिकांनी केला आहे़सेतूमध्येही बिनधास्त परवानगीयेथील सेतू कार्यालयात बाहेर बसलेले दलाल बिनधास्तपणे वावरताना दिसतात़ येथे असणाऱ्या महत्वाच्या कागदपत्रांची तपासणीही हेच करत असल्याचे समोर आले आहे़ याला मात्र सेतू कार्यालयातील कर्मचारी दुजोरा देतात़ (वार्ताहर)