शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

पालिका निवडणुकीत बुथ कॅप्चरिंग व अनियमितता

By admin | Updated: December 25, 2016 01:42 IST

१८ डिसेंबर रोजी पार पडलेल्या गडचिरोली नगर पालिकेच्या मतदान प्रक्रियेदरम्यान सत्ताधारी

फेर निवडणूक घ्या : राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार गडचिरोली : १८ डिसेंबर रोजी पार पडलेल्या गडचिरोली नगर पालिकेच्या मतदान प्रक्रियेदरम्यान सत्ताधारी भाजप पक्षाने सत्ता, संपती, प्रशासन व पोलीस बळाचा वापर करून बुथ कॅप्चरींग केले. अनेक केंद्रांवर घोळ करून मतदान प्रक्रियेत अनियमितता केली, अशी तक्रार राज्य निवडणूक आयोगाकडे काँग्रेस, राकाँ, शिवेसना व युवाशक्तीच्या पराभूत उमेदवारांनी केली असून गडचिरोली पालिकेची फेरनिवडणूक घ्यावी, अशी मागणी शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेतून केली. यावेळी पत्रकार परिषदेला जयवंत देशमुख, डॉ. अश्विनी धात्रक, संगीता कात्रटवार, सुषमा राऊत, कैलाश शर्मा, बाळू टेंभुर्णे, काशिनाथ भडके, बाळू मडावी, निशांत पापडकर, अमोल कुळमेथे, सुनिता भोयर आदी उपस्थित होते. यावेळी जसवंत देशमुख यांनी सांगितले की, संविधानातील तरतुदींचे उल्लंघन करून गडचिरोली नगर पालिका निवडणुकीची प्रक्रिया बेकायदेशीररित्या पार पाडण्यात आली. जाहीर झालेल्या निकालात प्रदत मतदानाची आकडेवारी शुन्य दाखविण्यात आली आहे. यादीत वेगळ्या प्रतिनिधींच्या नावांचा समावेश आहे. मात्र बूथवर पक्षाचे दुसरेच प्रतिनिधी देण्यात आले. अनेक केंद्रांवर इव्हीएम मशीन बदलल्या. त्यामुळे प्रशासनाने निवडणूक प्रक्रिया निर्भीडपणे पार पाडली नाही. परिणामी नागरिकांना बहाल करण्यात आलेल्या संविधानिक मतदानाच्या अधिकाराची हत्याच सत्ताधारी भाजप व प्रशासनाने केली आहे. तसेच मतदान प्रक्रियेत घोळ करण्याचा पूर्वनियोजित कट प्रशासन व भाजपचा होता, असा आरोप जयवंत देशमुख यांनी केला. सुरूवातीला आपल्याला पाच मतांनी विजयी झाल्याचे मतमोजणी कर्मचाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर पाऊण तासाने भाजपच्या उमेदवार पूजा बोबाटे यांना अडीचशे मतांनी विजयी घोषीत करण्यात आले, अशी माहिती प्रभाग क्रमांक १२ च्या पराभूत उमेदवार सुनिता भोयर यांनी सांगितली. प्रभाग गोकुलनगर क्रमांक १२ च्या मतदान केंद्रावर प्रात्यक्षिकावेळी ज्या इव्हीएम मशीन ठेवण्यात आल्या होत्या, त्या ईव्हीएम मशीन मतदानाच्या दिवशी त्या केंद्रांवर दिसून आल्या नाही. पाहणी केली असता, या मशीनचे क्रमांक बदलल्याचे दिसून आले, असे पराभूत उमेदवार बाळू टेंभुर्णे यांनी सांगितले. गोकुलनगर येथील रहिवासी मतदार प्रशांत डोमाजी वैरागडे हे प्रभाग क्रमांक १२ च्या तुलतुली मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी गेले असता, त्यांच्या नावावर मतदान झाले असल्याचे तेथील निवडणूक कर्मचाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर तक्रार करूनही निवडणूक अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही, असा आरोप पराभूत उमेदवार बाळू मडावी यांनी सांगितले. (स्थानिक प्रतिनिधी)