शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या लोकप्रतिनिधींनी ओबीसींच्या भावनेशी केला खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 22:57 IST

२०१४ च्या निवडणुकीपूर्वी गडचिरोली जिल्ह्यातील भाजपच्या नेत्यांनी ओबीसीचे आरक्षण पूर्ववत १९ टक्के करू, ओबीसी समाजावरील अन्याय दूर करू, असे ठोस आश्वासने देऊन मते मिळवून घेतली. परंतु सत्ता येताच ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नांकडे त्यांनी दुर्लक्ष केले. आता पेसा कायद्याअन्वये सरकारने काढलेल्या नवीन जीआरमध्ये आदिवासींसाठी आणखी पाच पदांचा समावेश करण्यात आला आहे. ओबीसी आरक्षण वाढविण्याचे दूर राहिले.

ठळक मुद्देवडेट्टीवार यांची टीका : सरकारने अन्यायाचा कळस गाठल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : २०१४ च्या निवडणुकीपूर्वी गडचिरोली जिल्ह्यातील भाजपच्या नेत्यांनी ओबीसीचे आरक्षण पूर्ववत १९ टक्के करू, ओबीसी समाजावरील अन्याय दूर करू, असे ठोस आश्वासने देऊन मते मिळवून घेतली. परंतु सत्ता येताच ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नांकडे त्यांनी दुर्लक्ष केले. आता पेसा कायद्याअन्वये सरकारने काढलेल्या नवीन जीआरमध्ये आदिवासींसाठी आणखी पाच पदांचा समावेश करण्यात आला आहे. ओबीसी आरक्षण वाढविण्याचे दूर राहिले. उलट अधिसूचनेच्या या नवीन जीआरने ओबीसी समाजाच्या जखमांवर मिठ चोळले आहे. जिल्ह्यातील भाजपच्या लोकप्रतिनिधींनी आरक्षणाच्या मुद्यावर ओबीसींच्या भावनेशी खेळ केला. विद्यमान सरकारने ओबीसींवरील अन्यायाचा कळस गाठला, अशी घणाघाती टिका काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा विधीमंडळातील उपगटनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली.यावेळी बोलताना आमदार वडेट्टीवार म्हणाले, काँग्रेस, राकाँ आघाडी शासनाने जिल्ह्यातील ओबीसींवर अन्याय केला. अशा वल्गना भाजपचे पदाधिकारी करीत होते. पण सत्ता आल्यानंतर भाजप सरकारने ओबीसींवरील अन्यायाची परिसीमाच गाठली आहे. ९ जून २०१४ च्या राज्यपालांच्या पेसा कायद्यान्वये निघालेल्या अधिसूचनेनंतर काँग्रेसचे तत्कालीन आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी राज्यपालांना पत्र लिहून या अधिसूचनेचा पुनर्विचार करण्याची मागणी केली होती. भाजपच्या खासदार व आमदारांनी अशा प्रकारचे पत्र राज्यपालांना पाठविले असल्यास ते पत्र आम्हाला दाखवावे, असे थेट आव्हान वडेट्टीवार यांनी पत्रपरिषदेतून दिले.अधिसूचनेचा पुनर्विचार करण्यासाठी समिती गठीत झाल्याची माहिती खासदार नेते हे पत्र परिषदेतून देतात आणि दुसऱ्याच दिवशी अनुसूचित जमातीसाठी पुन्हा पाच पदे वाढविण्याचा जीआर काढला जातो. याचा अर्थ खा. नेते यांना वस्तूस्थितीची माहिती नाही. तसेच या संदर्भातील विस्तृत अभ्यासही नाही. केवळ हवेवरच्या गोष्टी करून वेळ मारून नेण्याचे काम खासदार, आमदार व भाजपचे पुढारी करीत आहेत, असा आरोप आमदार वडेट्टीवार यांनी यावेळी केला. लोकसंख्येच्या प्रमाणात सर्व समाजाला नोकरीत आरक्षण मिळावे, अशी काँग्रेसची भूमिका आहे, असे वडेट्टीवार यांनी यावेळी स्पष्ट केले.पत्रकार परिषदेला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, जि.प. सदस्य अ‍ॅड. राम मेश्राम, काँग्रेसच्या ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग घोटेकर, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष भावना वानखेडे, डॉ. नितीन कोडवते, दिनेश चिटनुरवार, कुणाल पेंदोरकर आदी हजर होते.ओबीसींच्या हिताचा एकही निर्णय नाहीभाजपप्रणित केंद्र व राज्य सरकारने ओबीसींच्या हिताचा एकही निर्णय घेतलेला नाही, असे सांगत आरक्षण व नोकर भरती अधिसूचनेच्या मुद्यावरून जिल्ह्यातील ओबीसी बांधवांमध्ये विद्यमान सरकार व जिल्ह्यातील भाजपच्या लोकप्रतिनिधीप्रती प्रचंड रोष आहे. आता जिल्ह्यातील ओबीसी बांधवांनी या नेत्यांना जाब विचारावा, असे आवाहन आमदार वडेट्टीवार यांनी यावेळी केले.