शहरं
Join us  
Trending Stories
1
कराची अन् इस्लामाबादचं कनेक्शन तुटलं; भारताच्या INS विक्रांतचा पाकिस्तानवर मोठा हल्ला
2
लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं
3
“सैन्यावर विश्वास, देशाचा अभिमान, युद्ध नक्की जिंकू”; पाक कुरापतीवर J&Kतील नागरिकांना विश्वास
4
पाकिस्ताचे भारताच्या संपूर्ण पश्मिम सीमेवर हल्ले! भारताचेही जशास तसे प्रत्युत्तर; बघा कसा पाडला ड्रोन
5
India Pakistan War : भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये विध्वंस, आतापर्यंत काय-काय घडले; १० मुद्द्यांमध्ये समजून घ्या
6
पाकिस्तानचा भारतावर सायबर हल्ल्याचा डाव; 'Dance of the Hillary' व्हायरस नेमकं काय आहे?
7
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होतील; अपूर्ण कामे पूर्ण होतील
9
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
10
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
11
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
12
भारत, पाकच्या सीमा आगळ्यावेगळ्या का; ही सीमा जगात सर्वांत धोकादायक का आहे?
13
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
14
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
15
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
16
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
17
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
18
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
19
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
20
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार

पेसा अधिसूचनेच्या विषयावर मुख्यमंत्र्यांसह भाजपचे घूमजाव

By admin | Updated: November 25, 2014 22:55 IST

गडचिरोली जिल्ह्यात १३०० वर गावांमध्ये अनुसूचित जमातीची लोकसंख्या अधिक असल्याच्या कारणावरून पेसा अधिसूचनेची अंमलबजावणी ९ जून २०१४ पासून सुरू झाली आहे.

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात १३०० वर गावांमध्ये अनुसूचित जमातीची लोकसंख्या अधिक असल्याच्या कारणावरून पेसा अधिसूचनेची अंमलबजावणी ९ जून २०१४ पासून सुरू झाली आहे. पेसा अधिसूचनेत बदल करू किंवा अधिसूचना रद्द करू, असे आश्वासन भारतीय जनता पक्षाने निवडणूक काळात दिले होते. त्यानंतरही भारतीय जनता पक्ष या मुद्यावर ठाम होता. मात्र आता पेसा अधिसूचना रद्द करणे व बदल करणे याबाबीवर पाहू व करू, अशी भूमिका भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह जिल्ह्यातील अन्य लोकप्रतिनिधींनीही घेतली आहे. त्यामुळे या प्रश्नावर भाजप धूमजाव केल्याची प्रतिक्रिया जनमाणसात उमटलली आहे. २६ आॅगस्ट १९८२ ला निर्माण झालेल्या गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी व गैरआदिवासी समाज गुण्यागोविंदाने वास्तव्याला आहे. मात्र ९ जून २०१४ रोजी तत्कालीन आघाडी सरकारच्या काळात राज्यपाल के. शंकर नारायणन यांनी पेसा कायद्याची अधिसूचना गडचिरोलीसह राज्याच्या ११ जिल्ह्यांमध्ये जारी केली. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात १३०० च्यावर गावांमध्ये याची अंमलबजावणी जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे. या कायद्यामुळे वनहक्क गावांना प्रदान करण्यात आले असून ही गावे व या गावाची ग्रामसभा निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र झाली आहे. तसेच या गावांमध्ये वर्ग ३ आणि ४ च्या पदाची शासकीय पदभरती ही अनुसूचित जमाती प्रवर्गातूनच होणार आहे. त्यामुळे या गावांमध्ये वास्तव्याला असलेला गैरआदिवासी समुदाय संतप्त आहे. अनेक गावांनी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालून आपल्या भावना शासनाला कळविल्या. तसेच २९ हजारांवर नोटाचे मतदानही यामुळेच विधानसभा निवडणुकीत झाले. निवडणूक प्रचाराच्या काळात भारतीय जनता पक्षाने पेसा अधिसूचना रद्द करू, असे आश्वासन दिले होते. तर यात काही बदलही केले जातील, अशीही भूमिका घेतली होती. यादृष्टिकोणातूनच खासदार अशोक नेते यांनी राज्यपाल सी.विद्यासागर राव यांचीही दोन आमदारांना सोबत घेऊन भेट घेतली. त्यावेळी राज्यपालांशी चर्चाही केली. मात्र आता मुख्यमंत्री गडचिरोलीच्या दौऱ्यावर आले असताना त्यांनी पेसा अधिसूचनेबाबत पाहू करू, अशी भूमिका घेतली आहे. याची माहिती आपल्याला झाली. मी या संदर्भात पाहतो, असे ते बोलले. तसेच पेसा अधिसूचना लागू नसलेल्या २८६ गावांमध्ये ओबीसींना १९ टक्के आरक्षण केले जाईल, असे सुतोवाच त्यांनी केले. याचा अर्थ पेसा अधिसूचनेची अंमलबजावणी जिल्ह्यात होणारच यावरून स्पष्ट होत आहे. राज्य शासन ही अधिसूचना रद्द करणे व त्यात बदल करणे या संदर्भात कुठलाही निर्णय घेणार नाही, अशी सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे पेसाच्या गावांमधील गैरआदिवासी समुदायाच्या पदरी निराशा पडण्याची शक्यता आहे. यासंदर्भात भाजपच्या लोकप्रतिनिधींना जनतेच्या रोषाचाही सामना करण्याची वेळ निवडणूक काळात आली होती, हे विशेष.