शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
4
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
5
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
6
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
7
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
8
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
9
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
10
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
11
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
12
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
13
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
14
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
15
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
16
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
17
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
18
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
19
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
20
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू

पेसा अधिसूचनेच्या विषयावर मुख्यमंत्र्यांसह भाजपचे घूमजाव

By admin | Updated: November 25, 2014 22:55 IST

गडचिरोली जिल्ह्यात १३०० वर गावांमध्ये अनुसूचित जमातीची लोकसंख्या अधिक असल्याच्या कारणावरून पेसा अधिसूचनेची अंमलबजावणी ९ जून २०१४ पासून सुरू झाली आहे.

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात १३०० वर गावांमध्ये अनुसूचित जमातीची लोकसंख्या अधिक असल्याच्या कारणावरून पेसा अधिसूचनेची अंमलबजावणी ९ जून २०१४ पासून सुरू झाली आहे. पेसा अधिसूचनेत बदल करू किंवा अधिसूचना रद्द करू, असे आश्वासन भारतीय जनता पक्षाने निवडणूक काळात दिले होते. त्यानंतरही भारतीय जनता पक्ष या मुद्यावर ठाम होता. मात्र आता पेसा अधिसूचना रद्द करणे व बदल करणे याबाबीवर पाहू व करू, अशी भूमिका भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह जिल्ह्यातील अन्य लोकप्रतिनिधींनीही घेतली आहे. त्यामुळे या प्रश्नावर भाजप धूमजाव केल्याची प्रतिक्रिया जनमाणसात उमटलली आहे. २६ आॅगस्ट १९८२ ला निर्माण झालेल्या गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी व गैरआदिवासी समाज गुण्यागोविंदाने वास्तव्याला आहे. मात्र ९ जून २०१४ रोजी तत्कालीन आघाडी सरकारच्या काळात राज्यपाल के. शंकर नारायणन यांनी पेसा कायद्याची अधिसूचना गडचिरोलीसह राज्याच्या ११ जिल्ह्यांमध्ये जारी केली. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात १३०० च्यावर गावांमध्ये याची अंमलबजावणी जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे. या कायद्यामुळे वनहक्क गावांना प्रदान करण्यात आले असून ही गावे व या गावाची ग्रामसभा निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र झाली आहे. तसेच या गावांमध्ये वर्ग ३ आणि ४ च्या पदाची शासकीय पदभरती ही अनुसूचित जमाती प्रवर्गातूनच होणार आहे. त्यामुळे या गावांमध्ये वास्तव्याला असलेला गैरआदिवासी समुदाय संतप्त आहे. अनेक गावांनी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालून आपल्या भावना शासनाला कळविल्या. तसेच २९ हजारांवर नोटाचे मतदानही यामुळेच विधानसभा निवडणुकीत झाले. निवडणूक प्रचाराच्या काळात भारतीय जनता पक्षाने पेसा अधिसूचना रद्द करू, असे आश्वासन दिले होते. तर यात काही बदलही केले जातील, अशीही भूमिका घेतली होती. यादृष्टिकोणातूनच खासदार अशोक नेते यांनी राज्यपाल सी.विद्यासागर राव यांचीही दोन आमदारांना सोबत घेऊन भेट घेतली. त्यावेळी राज्यपालांशी चर्चाही केली. मात्र आता मुख्यमंत्री गडचिरोलीच्या दौऱ्यावर आले असताना त्यांनी पेसा अधिसूचनेबाबत पाहू करू, अशी भूमिका घेतली आहे. याची माहिती आपल्याला झाली. मी या संदर्भात पाहतो, असे ते बोलले. तसेच पेसा अधिसूचना लागू नसलेल्या २८६ गावांमध्ये ओबीसींना १९ टक्के आरक्षण केले जाईल, असे सुतोवाच त्यांनी केले. याचा अर्थ पेसा अधिसूचनेची अंमलबजावणी जिल्ह्यात होणारच यावरून स्पष्ट होत आहे. राज्य शासन ही अधिसूचना रद्द करणे व त्यात बदल करणे या संदर्भात कुठलाही निर्णय घेणार नाही, अशी सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे पेसाच्या गावांमधील गैरआदिवासी समुदायाच्या पदरी निराशा पडण्याची शक्यता आहे. यासंदर्भात भाजपच्या लोकप्रतिनिधींना जनतेच्या रोषाचाही सामना करण्याची वेळ निवडणूक काळात आली होती, हे विशेष.