शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
3
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
4
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
5
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
6
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
7
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
8
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
9
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
10
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
11
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
12
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
13
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
14
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
16
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
17
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
18
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
19
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
20
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
Daily Top 2Weekly Top 5

भाजप कार्यकर्त्यांनी केली निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2020 05:00 IST

राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी अमरावती येथील अंबादेवी मंदिर परिसरात कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी अमरावती जिल्हा न्यायालयाने शिक्षा ठोठावल्याने ठाकरे सरकारने त्यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा व त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांनी केली. आंदोलनाचे नेतृत्व आमदार डॉ. देवराव होळी, भाजपा जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे यांनी केले.

ठळक मुद्देमागणी : महिला व बाल विकास मंत्र्यांनी राजीनामा द्यावा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांना न्यायालयाने शिक्षा सुनावली असल्याने राज्य शासनाने त्यांचा राजीनामा घ्यावा, या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने शुक्रवारी स्थानिक इंदिरा गांधी चौकात भारतीय जनता पार्टीच्या वतीने निदर्शने करण्यात आली.राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी अमरावती येथील अंबादेवी मंदिर परिसरात कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी अमरावती जिल्हा न्यायालयाने शिक्षा ठोठावल्याने ठाकरे सरकारने त्यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा व त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांनी केली. आंदोलनाचे नेतृत्व आमदार डॉ. देवराव होळी, भाजपा जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे यांनी केले. यावेळी नगराध्यक्ष योगिता पिपरे, जिल्हा संपर्क प्रमुख सदानंद कुथे, नगरपरिषद उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, किसान आघाडीचे प्रदेश सदस्य रमेश भुरसे, पंचायत समिती उपसभापती विलास दशमुखे, महामंत्री विनोद देवोजवार, नगरसेविका निता उंदिरवाडे, नगरसेवक प्रशांत खोब्रागडे, तालुका महामंत्री हेमंत बोरकुटे, शाम वाढई, राजू शेरकी यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी केंद्र शासनाचा सुधारित कृषी कायदा राज्यात तात्काळ लागू करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. शेतकऱ्यांच्या हिताचा कायदा राज्यात लागू न करता मुख्यमंत्र्यांनी शेतकरी विरोधी निर्णय घेतलेला आहे. हा निर्णय मागे घेऊन सुधारित कृषी कायदा लागू करण्याची मागणी केली.केंद्र शासनाचा कृषी कायदा शेतकऱ्यांच्या हिताचा -डॉ. होळीशेतकऱ्यांना त्यांचा कृषी माल विकण्यास स्वातंत्र्य मिळाल्यास कृषी मालाला चांगला भाव मिळून त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे. केंद्र शासनाने केलेला कृषी कायदा शेतकऱ्यांच्या हिताचा आहे, असा दावा गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी केला आहे. जे आजपर्यंत शक्य झाले नाही, ती बाब केंद्र शासनाने करून दाखविली आहे. त्यामुळे विरोधकांच्या मनात जळाऊ वृत्ती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांची दिशाभूल करून त्यांना आंदोलन करण्यास भाग पाडत आहेत. महाराष्ट्र शासनाने या कायद्याला विरोध केला आहे. मात्र हे चुकीचे आहे. कृषी कायद्यात शेतकऱ्यांच्या हिताच्या अनेक बाबी आहेत. त्यामुळे या कायद्याची तत्काळ अंमलबजावणी करावी, अशी मागणी आमदार डॉ. देवराव होळी यांनी केली आहे. पत्रकार परिषदेला भाजपा जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, नगराध्यक्ष योगिता पिपरे, नगर परिषद उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :Yashomati Thakurयशोमती ठाकूरBJPभाजपा