शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
3
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
4
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
5
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
6
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
7
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
8
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
9
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
10
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
11
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
12
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
13
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
14
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
15
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
16
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
17
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
18
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
19
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
20
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...

पालकमंत्र्यांच्या अनुपस्थितीतच झाल्या भाजपच्या मुलाखती

By admin | Updated: January 17, 2017 00:42 IST

अहेरी विधानसभा मतदार संघाचे महाराष्ट्राच्या विधानसभेत प्रतिनिधीत्व करणारे राज्याचे आदिवासी विकास ...

अहेरी विधानसभा क्षेत्र : पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोक नेते उपस्थितअहेरी : अहेरी विधानसभा मतदार संघाचे महाराष्ट्राच्या विधानसभेत प्रतिनिधीत्व करणारे राज्याचे आदिवासी विकास व वनराज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या गैरहजेरीतच भारतीय जनता पक्षाला अहेरी येथे सोमवारी जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठीच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पाडाव्या लागल्या. पक्षाचे जिल्हाध्यक्ष खासदार अशोक नेते, प्रदेश सदस्य तथा अहेरी विधानसभा प्रमुख बाबुराव कोहळे, सहप्रमुख जिल्हा महामंत्री रवींद्र ओल्लालवार, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. भारत खटी, दामोधर अरगेला, अहेरी तालुकाध्यक्ष रवी नेलकुद्री, जिल्हा सचिव विनोद आकनपल्लीवार, बाबुराव गंपावार, प्रकाश सावकार गुडेल्लीवार आदी उपस्थित होते. भारतीय जनता पक्षाच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यात आजपासून पक्षाकडून उमेदवारी मागणाऱ्या इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येत आहे. अहेरी येथे एटापल्ली, भामरागड, सिरोंचा, मुलचेरा, अहेरी या तालुक्यातून जिल्हा परिषदेकरिता ६५ इच्छुकांनी तर पंचायत समितीकरिता १५२ जणांनी मुलाखती दिल्या, अशी माहिती पक्षाचे उपाध्यक्ष डॉ. भारत खटी यांनी लोकमतशी बोलताना दिली. अहेरी विधानसभा क्षेत्रापासून याची सुरूवात करण्यात आली. पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम या मुलाखतीला उपस्थित राहतील, असे भाजपच्या वतीने सांगण्यात आले होते. मात्र मुलाखत प्रक्रियेला पालकमंत्र्यांनी दांडी मारली आहे. भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर ही अम्ब्रीशराव आत्राम यांची पहिलीच जिल्हा परिषद व पंचायत समितीची सार्वत्रिक निवडणूक आहे. यापूर्वी राजे विश्वेश्वरराव महाराज, राजे सत्यवानराव महाराज व दस्तखुर्द अम्ब्रीशराव महाराज यांच्या नेतृत्वात नाग विदर्भ आंदोलन समितीच्या झेंड्याखाली अनेकवेळा जि.प. व पं.स.च्या निवडणुका लढविण्यात आल्या. २०१४ मध्ये अम्ब्रीशराव आत्राम भाजपवासी झाल्यानंतर नाविसंचे सर्व कार्यक्रम अहेरी विधानसभा क्षेत्रात भाजपच्या बॅनरखाली घेतले जाऊ लागले. त्यामुळे नाविसचे अस्तित्व नाममात्र राहिले आहे. याची खंत नाविसच्या अनेक जुन्या कार्यकर्त्यांना आहे. नाविससोबत अहेरी विधानसभा क्षेत्रातील मुस्लीम, दलित, आदिवासी समाज मोठ्या संख्येने जुळला आहे. भाजपच्या कमळावर लढण्याची मानसिक तयारी अजुनही नाविसच्या कार्यकर्त्यांची झालेली नाही. अम्ब्रीशराव आत्रामही मजबुरीसाठी म्हणून भाजपच्या चिन्हावर विधानसभेची निवडणूक लढले. मोदी लाटेत त्यांचा सहज विजय झाला. मात्र त्यांचा जनसंपर्क आमदार झाल्यापासूनच मतदार संघात कमी होत चाललेला आहे, याची खंत त्यांच्या निकटवर्तीयांनाही आहे. मुलाखत प्रक्रियेतील अनुपस्थिती संदर्भात राजे अम्ब्रीशराव आत्राम यांची भूमिका जाणून घेण्यासाठी संपर्क केला असता, आपण ज्या ग्राहकाला कॉल करीत आहा, त्यांनी फोन बंद करून ठेवला आहे, असा संदेश देण्यात येत होता. त्यामुळे त्यांची बाजू यात घेता आली नाही.