शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
8
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
9
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
10
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
11
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
12
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
13
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
14
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
15
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
16
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
17
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
18
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
19
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
20
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला

कोट्यवधी खर्चूनही कचऱ्याचे ढिगारे कायमच

By admin | Updated: November 20, 2014 22:51 IST

शहर साफसुतरे ठेवण्यासाठी नगर परिषद प्रशासनाचे वर्षाकाठी जवळपास १ कोटी ४० लाख रूपये खर्चुनही शहरात जिकडेतिकडे कचऱ्याचे ढिगारे बघायला मिळतात. त्याचबरोबर बहुतांश

गडचिरोली : शहर साफसुतरे ठेवण्यासाठी नगर परिषद प्रशासनाचे वर्षाकाठी जवळपास १ कोटी ४० लाख रूपये खर्चुनही शहरात जिकडेतिकडे कचऱ्याचे ढिगारे बघायला मिळतात. त्याचबरोबर बहुतांश वार्डांमधील नाल्याही गाळाने तुंबलेल्या आहेत. कचरा उचलणे व झाडू मारण्यासाठी २० नियमित कर्मचारी असले तरी ठिकठिकाणी कचरा पडला असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शहरवासीयांचे दीड कोटी रूपये कचऱ्यातच जात आहेत की काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.शहराचा व्याप दिवसेंदिवस वाढत चालला असून लोकवस्ती निर्माण झाल्यानंतर नगर परिषदेच्यावतीने त्या-त्या भागात नालीचे बांधकाम करण्यात येत आहे. त्यामुळे नाल्यांची संख्या दरवर्षी वाढतच असून नाली उपसण्याचा खर्चही वाढतच चालला आहे. यावर्षी नगर परिषदेने नाली उपसण्याचे कंत्राटतच दिले असून कंत्राटदाराला महिन्याचे ५ लाख ९६६ रूपये बिल दिल्या जाते. यावर वर्षाचे ६० लाख ११ हजार ५९२ रूपये खर्च होतात. मात्र बहुतांश वार्डांमधील नाल्या सहा महिन्यांपासून उपसल्या नसल्याने सदर नाल्या गाळाने तुंबल्या असल्याचे दिसून येते. प्रत्येक वार्डात जाऊन घराघरातील कचरा गोळा करण्यासाठी यापूर्वी नगर परिषदेने स्वत:चे मजूर नेमून दिले होते. यावर्षी मात्र घंटागाडीच्या माध्यमातून कचरा गोळा करण्याचे कंत्राटही नगर परिषदेने दिले आहे. या सदर कंत्राटदाराला महिन्याचे ३ लाख ८७ हजार ५०० रूपये दिले जातात. वर्षाचे ४४ लाख १० हजार रूपये चुकते केले जातात. शहरातील मुख्यरस्ते तसेच अंतर्गत रस्त्यांची झाडझुड करण्यासाठी नगर परिषरदेकडे सुमारे २० कर्मचारी नियमित आहेत. या प्रत्येक कर्मचाऱ्याला १५ हजार रूपयांपेक्षा जास्त वेतन दिले जाते. त्यांच्या वेतनावर सरासरी महिन्याचे ३ लाख व वर्षाचे ३६ लाख रूपये खर्च होतात. असे एकूण शहरात स्वच्छता राखण्यासाठी नगर परिषदेचे जवळपास १ कोटी ४० लाख रूपये खर्च होतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च होऊनही शहरात मात्र प्रत्येक वार्डात कचऱ्याचे ढिगारे बघावयास मिळतात. शहरात ठेवण्यात आलेल्या कंटेनर संपूर्ण भरून त्यातील कचरा खाली पडलेला दिसून येतो. त्यावर डुकरे दिवसभर लोळत असल्याने त्रस्त झालेले नागरिक नाईलाजास्तव कंटेनरलाच आग लावतात. एवढा खर्च होऊनही शहरात अस्वच्छता असल्याने नगर परिषदेविषयी नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. (नगर प्रतिनिधी)