शहरं
Join us  
Trending Stories
1
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
2
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
3
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
4
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
5
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
6
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
7
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
8
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
9
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
10
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
11
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
12
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
13
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
14
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
15
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
16
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक
17
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
18
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
19
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
20
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?

कोट्यवधी खर्चूनही कचऱ्याचे ढिगारे कायमच

By admin | Updated: November 20, 2014 22:51 IST

शहर साफसुतरे ठेवण्यासाठी नगर परिषद प्रशासनाचे वर्षाकाठी जवळपास १ कोटी ४० लाख रूपये खर्चुनही शहरात जिकडेतिकडे कचऱ्याचे ढिगारे बघायला मिळतात. त्याचबरोबर बहुतांश

गडचिरोली : शहर साफसुतरे ठेवण्यासाठी नगर परिषद प्रशासनाचे वर्षाकाठी जवळपास १ कोटी ४० लाख रूपये खर्चुनही शहरात जिकडेतिकडे कचऱ्याचे ढिगारे बघायला मिळतात. त्याचबरोबर बहुतांश वार्डांमधील नाल्याही गाळाने तुंबलेल्या आहेत. कचरा उचलणे व झाडू मारण्यासाठी २० नियमित कर्मचारी असले तरी ठिकठिकाणी कचरा पडला असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शहरवासीयांचे दीड कोटी रूपये कचऱ्यातच जात आहेत की काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.शहराचा व्याप दिवसेंदिवस वाढत चालला असून लोकवस्ती निर्माण झाल्यानंतर नगर परिषदेच्यावतीने त्या-त्या भागात नालीचे बांधकाम करण्यात येत आहे. त्यामुळे नाल्यांची संख्या दरवर्षी वाढतच असून नाली उपसण्याचा खर्चही वाढतच चालला आहे. यावर्षी नगर परिषदेने नाली उपसण्याचे कंत्राटतच दिले असून कंत्राटदाराला महिन्याचे ५ लाख ९६६ रूपये बिल दिल्या जाते. यावर वर्षाचे ६० लाख ११ हजार ५९२ रूपये खर्च होतात. मात्र बहुतांश वार्डांमधील नाल्या सहा महिन्यांपासून उपसल्या नसल्याने सदर नाल्या गाळाने तुंबल्या असल्याचे दिसून येते. प्रत्येक वार्डात जाऊन घराघरातील कचरा गोळा करण्यासाठी यापूर्वी नगर परिषदेने स्वत:चे मजूर नेमून दिले होते. यावर्षी मात्र घंटागाडीच्या माध्यमातून कचरा गोळा करण्याचे कंत्राटही नगर परिषदेने दिले आहे. या सदर कंत्राटदाराला महिन्याचे ३ लाख ८७ हजार ५०० रूपये दिले जातात. वर्षाचे ४४ लाख १० हजार रूपये चुकते केले जातात. शहरातील मुख्यरस्ते तसेच अंतर्गत रस्त्यांची झाडझुड करण्यासाठी नगर परिषरदेकडे सुमारे २० कर्मचारी नियमित आहेत. या प्रत्येक कर्मचाऱ्याला १५ हजार रूपयांपेक्षा जास्त वेतन दिले जाते. त्यांच्या वेतनावर सरासरी महिन्याचे ३ लाख व वर्षाचे ३६ लाख रूपये खर्च होतात. असे एकूण शहरात स्वच्छता राखण्यासाठी नगर परिषदेचे जवळपास १ कोटी ४० लाख रूपये खर्च होतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च होऊनही शहरात मात्र प्रत्येक वार्डात कचऱ्याचे ढिगारे बघावयास मिळतात. शहरात ठेवण्यात आलेल्या कंटेनर संपूर्ण भरून त्यातील कचरा खाली पडलेला दिसून येतो. त्यावर डुकरे दिवसभर लोळत असल्याने त्रस्त झालेले नागरिक नाईलाजास्तव कंटेनरलाच आग लावतात. एवढा खर्च होऊनही शहरात अस्वच्छता असल्याने नगर परिषदेविषयी नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. (नगर प्रतिनिधी)