शहरं
Join us  
Trending Stories
1
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
2
Video: दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात
3
अल्पवयीन मुलीच्या गुप्तांगाला स्पर्श करणे म्हणजे बलात्कार नव्हे; सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
4
अपुऱ्या झोपेमुळे स्मृतिभ्रंशाचा मोठा धोका; ५ वर्षाच्या अभ्यासानंतर समोर आला धक्कादायक रिपोर्ट
5
स्क्रीनवर सोज्वळ, खऱ्या आयुष्यात बिकिनी? सीतेच्या भूमिकेत दिसणाऱ्या साई पल्लवीवर होतेय टीका
6
इस प्यार को क्या नाम दूं? भावोजीसोबत मेहुणी पळाली; जाताना १ लाख रोख अन् २ लाखांचे दागिनेही घेऊन गेली; पुढे काय झालं?
7
ट्रम्प यांच्या एच-1 बी शुल्क आदेशानंतर भारतीय प्रवासी एमिरेट्सच्या विमानातून उतरले, विमान ३ तास उशीरा
8
Mumbai Robbery: मोबाईल आणि ब्रँडेड घड्याळांच्या दुकानात दरोडा; चार सराईत गुन्हेगारांना अटक!
9
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
10
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
11
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
12
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
13
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
14
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
15
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
16
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
17
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
18
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
19
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
20
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!

वीज नसतानाही पाठविले बिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 01:06 IST

अहेरी तालुक्यातील येरमनार ग्रामपंचायत अंतर्गत तीन गावे व आरेंदा ग्रा.पं.तील दोन गावात वीज खांब लावून तारा ओढण्यात आल्या. परंतु अद्यापही वीज पुरवठा सुरू झाला नाही. मात्र नागरिकांना वीज बिल पाठविले जात आहे.

ठळक मुद्देयेरमनार परिसरातील पाच गावे : आलापल्ली वीज कार्यालयावर ग्राहकांची धडक

लोकमत न्यूज नेटवर्कजिमलगट्टा : अहेरी तालुक्यातील येरमनार ग्रामपंचायत अंतर्गत तीन गावे व आरेंदा ग्रा.पं.तील दोन गावात वीज खांब लावून तारा ओढण्यात आल्या. परंतु अद्यापही वीज पुरवठा सुरू झाला नाही. मात्र नागरिकांना वीज बिल पाठविले जात आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी गुरूवारी आलापल्ली येथील वीज वितरण कार्यालयावर धडक देऊन कार्यकारी अभियंत्यांना निवेदन सादर केले.अहेरी तालुकातील येरमनार ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या कोरेपल्ली, कवटाराम व मिचगुंडा आणि आरेंदा ग्रामपंचायतमधील ताडगुडा व चौडमपल्ली आदी पाच गावांत वीज पुरवठा अद्यापही सुरू करण्यात आला नाही. विशेष म्हणजे पाचही गावांमध्ये यंदाच्या मे महिन्यात विद्युत पुरवठा सुरू करण्यात आला. परंतु तीन महिन्यांचा कालावधी उलटूनही अद्यापही एक दिवस सुद्धा वीज पुरवठा सुरू करण्यात आला नाही. वीज पुरवठा नसतानाही ग्राहकांना वीज देयके पाठविले जात आहेत. महावितरण कंपनीकडून नागरिकांची दिशाभूल व आर्थिक लूट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. रात्रीच्या सुमारास अंधारात रस्त्याने फिरणाºया नागरिकांना सरपटणाºया प्राण्यांपासून धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या भागातील विद्युत पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात आली. निवेदन देताना येरमनारचे सरपंच बालाजी गावडे, आरेंदाचे उपसरपंच राजू तलांडी तसेच कोरेपल्ली, कवटाराम, मिचगुंडा, ताडगुडा व चौडमपल्लीतील नागरिक हजर होते.ट्रान्सफॉर्मर पडला बंदयेरमनार व आरेंदा ग्रामपंचायत अंतर्गत येणाºया गावांमध्ये वीज पुरवठा करण्यासाठी ट्रान्सफार्मर लावून तो सुरू करण्यात आला. परंतु वीज पुरवठा गावांमध्ये सुरळीत करण्यात आला नाही. वीज पुरवठा सुरू करण्याआधीच ट्रान्सफार्मर बंद पडले. ताडगुडा येथील अनेक नागरिकांच्या घरी वीज मीटरही बसविण्यात आले नाही. परंतु वीज पोहोचली नाही. त्यामुळे येथील नागरिकांना विजेची अद्यापही प्रतीक्षा आहे. महावितरण कंपनीच्या एकूणच कारभारावर परिसरातील नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :electricityवीज