शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

वीज नसतानाही पाठविले बिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 01:06 IST

अहेरी तालुक्यातील येरमनार ग्रामपंचायत अंतर्गत तीन गावे व आरेंदा ग्रा.पं.तील दोन गावात वीज खांब लावून तारा ओढण्यात आल्या. परंतु अद्यापही वीज पुरवठा सुरू झाला नाही. मात्र नागरिकांना वीज बिल पाठविले जात आहे.

ठळक मुद्देयेरमनार परिसरातील पाच गावे : आलापल्ली वीज कार्यालयावर ग्राहकांची धडक

लोकमत न्यूज नेटवर्कजिमलगट्टा : अहेरी तालुक्यातील येरमनार ग्रामपंचायत अंतर्गत तीन गावे व आरेंदा ग्रा.पं.तील दोन गावात वीज खांब लावून तारा ओढण्यात आल्या. परंतु अद्यापही वीज पुरवठा सुरू झाला नाही. मात्र नागरिकांना वीज बिल पाठविले जात आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी गुरूवारी आलापल्ली येथील वीज वितरण कार्यालयावर धडक देऊन कार्यकारी अभियंत्यांना निवेदन सादर केले.अहेरी तालुकातील येरमनार ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या कोरेपल्ली, कवटाराम व मिचगुंडा आणि आरेंदा ग्रामपंचायतमधील ताडगुडा व चौडमपल्ली आदी पाच गावांत वीज पुरवठा अद्यापही सुरू करण्यात आला नाही. विशेष म्हणजे पाचही गावांमध्ये यंदाच्या मे महिन्यात विद्युत पुरवठा सुरू करण्यात आला. परंतु तीन महिन्यांचा कालावधी उलटूनही अद्यापही एक दिवस सुद्धा वीज पुरवठा सुरू करण्यात आला नाही. वीज पुरवठा नसतानाही ग्राहकांना वीज देयके पाठविले जात आहेत. महावितरण कंपनीकडून नागरिकांची दिशाभूल व आर्थिक लूट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. रात्रीच्या सुमारास अंधारात रस्त्याने फिरणाºया नागरिकांना सरपटणाºया प्राण्यांपासून धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या भागातील विद्युत पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात आली. निवेदन देताना येरमनारचे सरपंच बालाजी गावडे, आरेंदाचे उपसरपंच राजू तलांडी तसेच कोरेपल्ली, कवटाराम, मिचगुंडा, ताडगुडा व चौडमपल्लीतील नागरिक हजर होते.ट्रान्सफॉर्मर पडला बंदयेरमनार व आरेंदा ग्रामपंचायत अंतर्गत येणाºया गावांमध्ये वीज पुरवठा करण्यासाठी ट्रान्सफार्मर लावून तो सुरू करण्यात आला. परंतु वीज पुरवठा गावांमध्ये सुरळीत करण्यात आला नाही. वीज पुरवठा सुरू करण्याआधीच ट्रान्सफार्मर बंद पडले. ताडगुडा येथील अनेक नागरिकांच्या घरी वीज मीटरही बसविण्यात आले नाही. परंतु वीज पोहोचली नाही. त्यामुळे येथील नागरिकांना विजेची अद्यापही प्रतीक्षा आहे. महावितरण कंपनीच्या एकूणच कारभारावर परिसरातील नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :electricityवीज