शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

कापूस बियाणे विक्रीत मोठा काळाबाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 05:01 IST

गेल्या आठवड्यात येथे पकडलेल्या २५ लाखांच्या एचटी बीटी या प्रतिबंधित कापूस बियाण्यांची तस्करी कृषी विभागाच्या पथकाने पकडली. पण हे प्रकरण पोलिसांच्या हवाली करताच थंड पडले. उलट आरोपीचीच बाजू सावरण्याची भूमिका तपास अधिकाºयाने घेऊन या काळाबाजाराच्या मुळाशी जाण्याऐवजी त्याला अप्रत्यक्षपणे पाठबळ दिल्याची खमंग चर्चा संपूर्ण तालुक्यात सुरू आहे.

ठळक मुद्देअहेरी तालुक्यात वाढला पेरा : तेलंगणातील कंपन्यांची नजर, शेतकऱ्यांचा बिटीकडे कल

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : दक्षिण गडचिरोली भागाचे केंद्रस्थान असलेल्या अहेरी तालुक्यात कापसाचा पेरा वाढण्यासोबतच बियाण्यांच्या काळाबाजारालाही ऊत आला आहे. तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील काही कंपन्या विक्रेत्यांशी संधान साधून हा विनापरवाना बियाण्यांची विक्री करत आहे. मात्र हा प्रकार बिनबोभाटपणे सुरू असल्याने आणि सुगावा लागूनही संबंधितांवर कारवाई होत नसल्यामुळे या काळाबाजारात अनेक यंत्रणा सहभागी असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.गेल्या आठवड्यात येथे पकडलेल्या २५ लाखांच्या एचटी बीटी या प्रतिबंधित कापूस बियाण्यांची तस्करी कृषी विभागाच्या पथकाने पकडली. पण हे प्रकरण पोलिसांच्या हवाली करताच थंड पडले. उलट आरोपीचीच बाजू सावरण्याची भूमिका तपास अधिकाºयाने घेऊन या काळाबाजाराच्या मुळाशी जाण्याऐवजी त्याला अप्रत्यक्षपणे पाठबळ दिल्याची खमंग चर्चा संपूर्ण तालुक्यात सुरू आहे. वास्तविक कृषी विभागाच्या कारवाईनंतर आता काही व्यापारीही पोलिसांच्या गळाला लागतील अशा जोरदार चर्चा शेतकऱ्यांमध्ये होती. पण पोलिसांच्या नरमाईच्या भूमिकेमुळे काळाबाजारात सहभागी असणारे व्यापारी जणूकाही पुढेही हे व्यवहार करण्याची मूक संमतीच मिळाल्याप्रमाणे वावरत असल्यामुळे हा चर्चेचा विषय झाला आहे.देशात प्रकारच्या बीटी कापसाच्या बियाण्यांच्या विक्रीवर बंदी आहे. ज्या व्यक्तीकडे हे बियाणे आढळेल, त्याला पाच वर्षांची शिक्षा आणि पाच हजार रु पयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो. तरीसुद्धा तालुक्यात मोठ्या प्रमाणात या बियाण्यांचा वापर सुरू आहे. सरकारमान्य कंपन्यांद्वारे हे बियाणे विकले जात नाही. पण काही शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या नेटवर्कमधून हे बियाणे आंध्र प्रदेशातून विक्रीसाठी आणली जात आहे. मागील दोन वर्षांपासून कापूस पेरणीतील जवळपास ८० ते ९० टक्के पेरणी याच बिटी बियाण्यांद्वारे करण्यात येत आहे.४ जूनच्या रात्री मिळालेले बियाणे तपासणीसाठी पाठवण्यात येत आहे. वास्तविक तणनाशकांच्या वापरास बंदी असल्याने ग्लायफोसेटयुक्त बीटी बियाणे राज्य सरकारद्वारे विकले जात नाही. या बियाण्यांमध्ये तणनाशक तत्वे असतात. त्यामुळे कापसाच्या रोपट्याभोवती तणनिर्मिती होत नाही आणि पिकांची वाढ चांगली होते. परंतु याच ग्लायफोसेटमुळे कर्करोग होण्याची शक्यता असल्याचे सिद्ध झाल्यामुळे जगभरातील अनेक देशांमध्ये या तंत्रज्ञानावर तसेच या बियाण्यांवर बंदी घालण्यात आली आहे. बीटीमध्ये तणनाशकाचा वापर केला गेला आहे. त्यामुळे या बियाण्यांची शेतकऱ्यांकडून मागणी जास्त आहे. त्याचाच फायदा घेत बियाण्यांचा काळाबाजार जोरात सुरू आहे. कृषी विभागाकडून या बियाण्यांच्या विक्रीवर नजर ठेवली जात असली तरी अहेरी पोलीसांकडून होणाऱ्या तपासावर शंकेचे सावट आल्याने कृषी विभागाची मेहनत कुचकामी ठरत असल्याची भावना एका अधिकाºयाने व्यक्त केली.बियाण्यांची विक्री नाही, तरीही झाली लागवडअहेरी तालुक्यात मागील वर्षी १८८६.९० हेक्टर क्षेत्रावर कापूस पिकाची लागवड झाली होती. त्यात अहेरी मंडळामध्ये १२४० हेक्टर, आलापल्ली मंडळात २६०.६० हेक्टर, पेरमिली मंडळात ५४ हेक्टर तर जिमलगट्टा मंडळात ३१४.३० हेक्टर कापूस पेरणी करण्यात आली. परंतु कृषी केंद्रांचे रेकॉर्ड पाहिल्यास अगदी कमी प्रमाणात कापूस बियाणे विकल्या गेली. यावरून जो काही कापसाचा पेरा झाला तो अवैधपणे काळाबाजारातून घेतलेल्या बियाण्यांमधून झाल्याचे स्पष्ट होते.

टॅग्स :cottonकापूसagricultureशेती