शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
2
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
3
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
4
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
5
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
6
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
7
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
8
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
9
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
10
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
11
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
12
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
13
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
14
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
15
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
16
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
17
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
18
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
19
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
20
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल

कापूस बियाणे विक्रीत मोठा काळाबाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 05:01 IST

गेल्या आठवड्यात येथे पकडलेल्या २५ लाखांच्या एचटी बीटी या प्रतिबंधित कापूस बियाण्यांची तस्करी कृषी विभागाच्या पथकाने पकडली. पण हे प्रकरण पोलिसांच्या हवाली करताच थंड पडले. उलट आरोपीचीच बाजू सावरण्याची भूमिका तपास अधिकाºयाने घेऊन या काळाबाजाराच्या मुळाशी जाण्याऐवजी त्याला अप्रत्यक्षपणे पाठबळ दिल्याची खमंग चर्चा संपूर्ण तालुक्यात सुरू आहे.

ठळक मुद्देअहेरी तालुक्यात वाढला पेरा : तेलंगणातील कंपन्यांची नजर, शेतकऱ्यांचा बिटीकडे कल

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : दक्षिण गडचिरोली भागाचे केंद्रस्थान असलेल्या अहेरी तालुक्यात कापसाचा पेरा वाढण्यासोबतच बियाण्यांच्या काळाबाजारालाही ऊत आला आहे. तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील काही कंपन्या विक्रेत्यांशी संधान साधून हा विनापरवाना बियाण्यांची विक्री करत आहे. मात्र हा प्रकार बिनबोभाटपणे सुरू असल्याने आणि सुगावा लागूनही संबंधितांवर कारवाई होत नसल्यामुळे या काळाबाजारात अनेक यंत्रणा सहभागी असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.गेल्या आठवड्यात येथे पकडलेल्या २५ लाखांच्या एचटी बीटी या प्रतिबंधित कापूस बियाण्यांची तस्करी कृषी विभागाच्या पथकाने पकडली. पण हे प्रकरण पोलिसांच्या हवाली करताच थंड पडले. उलट आरोपीचीच बाजू सावरण्याची भूमिका तपास अधिकाºयाने घेऊन या काळाबाजाराच्या मुळाशी जाण्याऐवजी त्याला अप्रत्यक्षपणे पाठबळ दिल्याची खमंग चर्चा संपूर्ण तालुक्यात सुरू आहे. वास्तविक कृषी विभागाच्या कारवाईनंतर आता काही व्यापारीही पोलिसांच्या गळाला लागतील अशा जोरदार चर्चा शेतकऱ्यांमध्ये होती. पण पोलिसांच्या नरमाईच्या भूमिकेमुळे काळाबाजारात सहभागी असणारे व्यापारी जणूकाही पुढेही हे व्यवहार करण्याची मूक संमतीच मिळाल्याप्रमाणे वावरत असल्यामुळे हा चर्चेचा विषय झाला आहे.देशात प्रकारच्या बीटी कापसाच्या बियाण्यांच्या विक्रीवर बंदी आहे. ज्या व्यक्तीकडे हे बियाणे आढळेल, त्याला पाच वर्षांची शिक्षा आणि पाच हजार रु पयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो. तरीसुद्धा तालुक्यात मोठ्या प्रमाणात या बियाण्यांचा वापर सुरू आहे. सरकारमान्य कंपन्यांद्वारे हे बियाणे विकले जात नाही. पण काही शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या नेटवर्कमधून हे बियाणे आंध्र प्रदेशातून विक्रीसाठी आणली जात आहे. मागील दोन वर्षांपासून कापूस पेरणीतील जवळपास ८० ते ९० टक्के पेरणी याच बिटी बियाण्यांद्वारे करण्यात येत आहे.४ जूनच्या रात्री मिळालेले बियाणे तपासणीसाठी पाठवण्यात येत आहे. वास्तविक तणनाशकांच्या वापरास बंदी असल्याने ग्लायफोसेटयुक्त बीटी बियाणे राज्य सरकारद्वारे विकले जात नाही. या बियाण्यांमध्ये तणनाशक तत्वे असतात. त्यामुळे कापसाच्या रोपट्याभोवती तणनिर्मिती होत नाही आणि पिकांची वाढ चांगली होते. परंतु याच ग्लायफोसेटमुळे कर्करोग होण्याची शक्यता असल्याचे सिद्ध झाल्यामुळे जगभरातील अनेक देशांमध्ये या तंत्रज्ञानावर तसेच या बियाण्यांवर बंदी घालण्यात आली आहे. बीटीमध्ये तणनाशकाचा वापर केला गेला आहे. त्यामुळे या बियाण्यांची शेतकऱ्यांकडून मागणी जास्त आहे. त्याचाच फायदा घेत बियाण्यांचा काळाबाजार जोरात सुरू आहे. कृषी विभागाकडून या बियाण्यांच्या विक्रीवर नजर ठेवली जात असली तरी अहेरी पोलीसांकडून होणाऱ्या तपासावर शंकेचे सावट आल्याने कृषी विभागाची मेहनत कुचकामी ठरत असल्याची भावना एका अधिकाºयाने व्यक्त केली.बियाण्यांची विक्री नाही, तरीही झाली लागवडअहेरी तालुक्यात मागील वर्षी १८८६.९० हेक्टर क्षेत्रावर कापूस पिकाची लागवड झाली होती. त्यात अहेरी मंडळामध्ये १२४० हेक्टर, आलापल्ली मंडळात २६०.६० हेक्टर, पेरमिली मंडळात ५४ हेक्टर तर जिमलगट्टा मंडळात ३१४.३० हेक्टर कापूस पेरणी करण्यात आली. परंतु कृषी केंद्रांचे रेकॉर्ड पाहिल्यास अगदी कमी प्रमाणात कापूस बियाणे विकल्या गेली. यावरून जो काही कापसाचा पेरा झाला तो अवैधपणे काळाबाजारातून घेतलेल्या बियाण्यांमधून झाल्याचे स्पष्ट होते.

टॅग्स :cottonकापूसagricultureशेती