शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

‘भीम सेतू’ला चुकांचे ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 23:52 IST

कित्येक वर्षांपासून एका पुलाअभावी पावसाळ्यात संपर्क तुटणाऱ्या १५ ते २० गावांना बारमाही संपर्काचे स्वप्न दाखविणाऱ्या येरमणार नाल्यावरील ‘भीम सेतू’ या पुलाला तांत्रिक चुकांचे ग्रहण लागले.

ठळक मुद्देकच्चे बांधकाम : पुरात वाहून गेला दोन्ही बाजूंचा रस्ता

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कित्येक वर्षांपासून एका पुलाअभावी पावसाळ्यात संपर्क तुटणाऱ्या १५ ते २० गावांना बारमाही संपर्काचे स्वप्न दाखविणाऱ्या येरमणार नाल्यावरील ‘भीम सेतू’ या पुलाला तांत्रिक चुकांचे ग्रहण लागले. त्यामुळे अवघ्या काही दिवसातच पुलाच्या दोन्ही बाजूकडील माती वाहून गेल्याने पुन्हा नागरिकांना नाला पार करताना कसरत करावी लागत आहे.अहेरी तालुक्यातील पेरमिली-येरमणार लगतच्या परिसरात असलेला येरमणार नाला उन्हाळ्यात कोरडा पडतो. त्यामुळे नाल्यातून पलिकडे जाणे सर्वांना सहज शक्य होते. मात्र पावसाळ्याला सुरूवात होताच हा नाला पुन्हा प्रवाहित होतो आणि मग पुढचे ५ ते ६ महिने नागरिकांना वाहत्या पाण्यातूनच पैलतिर गाठावे लागते. या नाल्यावर पूल बांधण्याचा प्रयत्न केला तरी नक्षलदृष्ट्या अतिसंवेदन भागामुळे कंत्राटदार हे काम घेण्यास तयार होत नाही. अशा परिस्थितीत भूमकाल संघटनेने गावकºयांच्या मदतीतून या पुलाची उभारणी करण्याचा प्रस्ताव ठेवला. पोलिसांनीही तो मान्य करून सर्व ती मदत करण्याची हमी दिली. मात्र पूल उभारण्याची वेळ चुकली. अगदी पावसाळ्याच्या तोंडावर जेमतेम १८ ते २० दिवसांत हा पूल उभा करण्यात आला. त्यामुळे त्यात काही तांत्रिक चुकाही राहिल्या. ७ जूनला पुलाचे लोकार्पण झाल्यानंतर लगेच पावसाला सुरूवात झाली. काही दिवस वाहत्या पाण्यातही पूल तग धरून होता. मात्र सततच्या पावसात पाण्याचा प्रवाह वाढल्यानंतर पुलाच्या दोन्ही बाजुकडील रस्त्याला जोडणाºया बाजूची माती वाहून गेली. त्यामुळे पुलाचा मधल्या भागातील ढाचा कायम असला तरी दोन्ही बाजू खंडित झाल्याने पुलावर जाण्यासाठी कसरत करावी लागत आहे.प्रशासनाने बांधकाम विभागाच्या मदतीने पुलाची योग्य ती दुरूस्ती करून हा पूल लवकरात लवकर पुन्हा सुरू करावा आणि १५ ते २० गावांतील नागरिकांचा संपर्क पुन्हा जोडावा अशी अपेक्षा त्या भागातील नागरिकांकडून केली जात आहे.

टॅग्स :riverनदीfloodपूर