शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
3
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
4
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
5
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
6
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
7
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
8
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
9
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
10
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
11
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
12
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
13
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
14
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
15
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
16
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
17
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
18
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
19
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
20
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."

‘भीम सेतू’ला चुकांचे ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 23:52 IST

कित्येक वर्षांपासून एका पुलाअभावी पावसाळ्यात संपर्क तुटणाऱ्या १५ ते २० गावांना बारमाही संपर्काचे स्वप्न दाखविणाऱ्या येरमणार नाल्यावरील ‘भीम सेतू’ या पुलाला तांत्रिक चुकांचे ग्रहण लागले.

ठळक मुद्देकच्चे बांधकाम : पुरात वाहून गेला दोन्ही बाजूंचा रस्ता

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कित्येक वर्षांपासून एका पुलाअभावी पावसाळ्यात संपर्क तुटणाऱ्या १५ ते २० गावांना बारमाही संपर्काचे स्वप्न दाखविणाऱ्या येरमणार नाल्यावरील ‘भीम सेतू’ या पुलाला तांत्रिक चुकांचे ग्रहण लागले. त्यामुळे अवघ्या काही दिवसातच पुलाच्या दोन्ही बाजूकडील माती वाहून गेल्याने पुन्हा नागरिकांना नाला पार करताना कसरत करावी लागत आहे.अहेरी तालुक्यातील पेरमिली-येरमणार लगतच्या परिसरात असलेला येरमणार नाला उन्हाळ्यात कोरडा पडतो. त्यामुळे नाल्यातून पलिकडे जाणे सर्वांना सहज शक्य होते. मात्र पावसाळ्याला सुरूवात होताच हा नाला पुन्हा प्रवाहित होतो आणि मग पुढचे ५ ते ६ महिने नागरिकांना वाहत्या पाण्यातूनच पैलतिर गाठावे लागते. या नाल्यावर पूल बांधण्याचा प्रयत्न केला तरी नक्षलदृष्ट्या अतिसंवेदन भागामुळे कंत्राटदार हे काम घेण्यास तयार होत नाही. अशा परिस्थितीत भूमकाल संघटनेने गावकºयांच्या मदतीतून या पुलाची उभारणी करण्याचा प्रस्ताव ठेवला. पोलिसांनीही तो मान्य करून सर्व ती मदत करण्याची हमी दिली. मात्र पूल उभारण्याची वेळ चुकली. अगदी पावसाळ्याच्या तोंडावर जेमतेम १८ ते २० दिवसांत हा पूल उभा करण्यात आला. त्यामुळे त्यात काही तांत्रिक चुकाही राहिल्या. ७ जूनला पुलाचे लोकार्पण झाल्यानंतर लगेच पावसाला सुरूवात झाली. काही दिवस वाहत्या पाण्यातही पूल तग धरून होता. मात्र सततच्या पावसात पाण्याचा प्रवाह वाढल्यानंतर पुलाच्या दोन्ही बाजुकडील रस्त्याला जोडणाºया बाजूची माती वाहून गेली. त्यामुळे पुलाचा मधल्या भागातील ढाचा कायम असला तरी दोन्ही बाजू खंडित झाल्याने पुलावर जाण्यासाठी कसरत करावी लागत आहे.प्रशासनाने बांधकाम विभागाच्या मदतीने पुलाची योग्य ती दुरूस्ती करून हा पूल लवकरात लवकर पुन्हा सुरू करावा आणि १५ ते २० गावांतील नागरिकांचा संपर्क पुन्हा जोडावा अशी अपेक्षा त्या भागातील नागरिकांकडून केली जात आहे.

टॅग्स :riverनदीfloodपूर