शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
7
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
8
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
9
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
10
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
11
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
12
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
14
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
15
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
16
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
17
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
18
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
19
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

भेंडाळातील सिंचन योजना रखडली

By admin | Updated: September 7, 2016 02:21 IST

तालुक्यातील भेंडाळा येथे उपसा जलसंचिन योजना निर्मितीसाठी सर्वेक्षण करण्याचे आदेश तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी

शासनाचे दुर्लक्ष : १३ गावातील हजारो शेतकऱ्यांना झाला असता लाभचामोर्शी : तालुक्यातील भेंडाळा येथे उपसा जलसंचिन योजना निर्मितीसाठी सर्वेक्षण करण्याचे आदेश तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी २००१ साली पाटबंधारे विभागाचे अव्वल सचिव यांना दिले होते. त्याचबरोबर भेंडाळा येथे राजीव जलउपसा सहकारी संस्था सुद्धा निर्माण करण्यात आली. मात्र जवळपास १४ वर्षांचा कालावधी उलटूनही या योजनेचे काम पुढे जाऊ शकले नाही.भेंडाळा येथील राजीव उपसा जलसिंचन सहकारी संस्था पंजीकृत करण्यात आली. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या आदेशानंतर आराखडा तयार करून सर्वे सुद्धा केला. या आराखड्यानुसार भेंडाळा, रामाळा, मार्र्कंडादेव, फराडा, घारगाव, दोटकुली, वाघोली, वेलतूर तुकूम, सगनापूर, एकोडी, कान्होली, फोकुर्डी, मोहुर्ली या १३ गावातील ५ हजार हेक्टर जमीन ओलीताखाली आणता येते. यासाठी मागील २० वर्षांपासून संस्थेच्या वतीने पत्रव्यवहार चालू आहेत. मात्र याकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहेत. योजनेच्या कामाला सुरुवात करावी, यासाठी विधीमंडळ व संसद अधिवेशन काळात गृहराज्यमंत्री खा. हंसराज अहीर, खा. अशोक नेते, माजी खा. नरेश पुगलिया यांना निवेदन देण्यात आली. मात्र लोकप्रतिनिधीसुद्धा याकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे पाठपुरावा कुणाकडे करावा, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाले आहे.राजीव जल उपसा सिंचन सहकारी संस्थेचे श्रीरंग म्हशाखेत्री, राजू चुधरी, गुरूदेव डांगे, विजय पोरेड्डीवार, किशोर डांगे, गजानन वैरागडे हे सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. मात्र अजूनपर्यंत या योजनेला मंजुरी प्रदान करण्यात आली नाही. विद्यमान आ. डॉ. होळी यांच्याकडेसुद्धा सदर योजनेच्या निर्मितीबाबतचे निवेदन दिले होते. मात्र अजूनपर्यंत त्यांनी सुद्धा या योजनेकडे लक्ष घातले नाही. परिणामी योजनेचे काम रखडले आहे. (शहर प्रतिनिधी)५ हजार हेक्टर क्षमताभेंडाळा येथे उपसा जलसिंचन योजना झाली असती तर याचा लाभ परिसरातील १३ गावांना झाला असता, चामोर्शी तालुक्यात रेगडी तलावाचे पाणी येते. मात्र ही गावे शेवट पडत असल्याने या गावातील बहुतांश शेतांना पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे चांगली काळीकसदार जमीन पाण्याअभावी पडिक ठेवावी लागत आहे. या योजनेमुळे सदर जमीन ओलिताखाली आली असती.