शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

आम्ही बदला घेऊ... नक्षल संघटनेकडून एकनाथ शिंदेंना धमकीचं पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2021 14:17 IST

गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री एकनाथ शिंदे यांना भामरागढ एरिया कमिटीने ठार मारण्याची धमकी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

गडचिरोली : गडचिरोली तसेच ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री एकनाथ शिंदे यांना भामरागढ एरिया कमिटीने ठार मारण्याची धमकी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. या सम्पूर्ण प्रकरणाची ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाकडून चौकशी करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पालकमंत्री शिंदे यांना भामरागढ एरिया कमिटीच्या नावाने आलेल्या या पत्रात 'तुम्ही गडचिरोलीचा खूप विकास करीत आहात. पण आम्हाला मोठी समस्या निर्माण करीत आहात. पोलिसांच्या कारवाईत अनेक नक्षलवादी मारले गेले आहेत. याचा आम्ही नक्कीच बदला घेऊ, असा इशारा ठाण्यातील लुईसवाडीतील नंदनवन या निवासस्थानी आठ दिवसांपूर्वी हे पत्र आल्याची माहिती सूत्रांनी दिली. गडचिरोली पोलीस आणि ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.

एकनाथ शिंदे हे गडचिरोली प्रमाणेच ठाणे जिल्हयाचे देखील पालकमंत्री आहेत. गेल्या काही महिन्यात त्यांनी गडचिरोली येथे विकास कामांचा धडाका लावला. त्याचप्रमाणे अनेक नक्षलवाद्यांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणले, त्यामुळे गडचिरोली आणि आसपासच्या जिल्ह्यातील नक्षलवादी नाराज असल्याचे सूत्रांनी सांगितले. याच नारजीतून त्यांना हे पत्र  आल्याचे बोलले जात आहे.  

हे धमकीचे पत्र मुंबईतील त्यांच्या शासकीय बंगल्यावरही पाठवण्यात आले होते. त्या संदर्भात मुंबईतील पोलीस तपास करत असून ठाण्यातदेखील हे पत्र कोणी पाठवले या संदर्भात तपास सुरू असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. या पत्राबाबत  शिंदे यांना विचारले असता, यावर नंतर प्रतिक्रिया देईन, असे सांगत ते कोल्हापूर दौऱ्याला निघून गेले.

टॅग्स :PoliticsराजकारणEknath Shindeएकनाथ शिंदेnaxaliteनक्षलवादी