शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

राज्यपालांनी दत्तक घेतलेल्या भामरागडला पुरामुळे प्राण कंठात अन् अश्रू डोळ्यांत !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2024 16:29 IST

उदासीनता : पुनर्वसनाचा प्रस्ताव दहा वर्षांपासून धूळखात

लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : छत्तीसगड सीमेवरील अतिदुर्गम, आदिवासीबहुल व नक्षलप्रभावित भामरागड तालुका अद्यापही पायाभूत सुविधांपासून दूर आहे. या तालुक्याला दरवर्षी पावसाळ्यात पुराचा फटका सहन करावा लागतो. येथे पावसाळ्यात प्राण कंठात आणून लोक दिवस काढतात. पुराचे पाणी घरात शिरणे नेहमीचेच आहे, अशावेळी संसार डोळ्यांदेखत वाहत जातो तर लोकांची स्वतःचा जीव वाचविण्याचीच धडपड सुरू असते. दरम्यान, पुनर्वसनाचा प्रस्ताव दहा वर्षांपासून धूळखात पडून आहे. 

निसर्गसंपदेने नटलेल्या भामरागडमध्ये इंद्रावती, पामूलगौतम व पर्लकोटा या तीन नद्यांचा संगम होतो. दरवर्षी येणाऱ्या पुराचा स्थानिक आदिवासींना सामना करावा लागतो. पूर आल्यानंतर शहरात पंचायत कार्यालय, जिल्हा परिषद शाळा, तहसील कार्यालयासह उंच ठिकाणी आश्रय घ्यावा लागतो. घरातील संसारोपयोगी साहित्य डोळ्यांदेखत पाण्यात प्रवाहित होताना पाहून येथील लोकांचे काळीज पिळवटून जाते. मात्र, या संकटात केवळ स्वतःचा जीव वाचविण्यासाठीच धडपड सुरू असते.

१६ वर्षापासून पुलाचे काम रखडलेले• पर्लकोटावरील पूल किमान ४५ वर्षे जुना आहे. दरवर्षी त्यावर १०-१२ फूट पाणी असते. २००८ मध्ये पुलाचे बांधकाम करण्याचा निर्णय झाला.

• तब्बल १६ वर्षांपासून पुलाचे काम रखडलेले आहे. सध्या पुलाच्या ठिकाणी काम सुरु आहे; पण ते संथ गतीने होत आहे. त्यामुळे भामरागडबद्दलची राजकीय अनास्थाही समोर आली आहे.

• तत्कालीन राज्यपाल पी. सी. अलेक्झांडर यांनी हा तालुका विकासासाठी दत्तक घेतला होता; पण येथे मूलभूत सुविधाच अद्याप पोहोचलेल्या नाहीत, त्यामुळे विकासाचे स्वप्न अधुरेच आहे.

नाल्याला पाणी आले तरी तुटतो संपर्क• हलका पाऊस झाला तरी २ तालुक्यातील नाले जलमय होतात. नाल्याला पाणी आले तरी गावांचा संपर्क तुटतो. त्यामुळे स्थानिकांचे हाल होतात. अनेक गावे दोन-दोन महिने संपर्काबाहेर असतात.

• पक्के रस्ते, दर्जेदार पूल होणे ४ गरजेचे आहेत; पण अनेक गावांत अद्याप विकासवाटा पोहोचलेल्या नाहीत. परिणामी, स्थानिक आदिवासींना नदीतून जाण्यासाठी होडींचा वापर करावा लागतो. 

टॅग्स :Gadchiroliगडचिरोलीfloodपूर