शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

भामरागड जलमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 05:00 IST

पर्लकोटा नदीला यावर्षी दुसऱ्यांदा पुराचा फटका बसला. गुरूवारपासून पुराचे पाणी सतत वाढतच आहे. हे पाणी गावात शिरल्यामुळे भामरागड नागरवासीयांची व प्रशासनाचा चिंता वाढली आहे. शुक्रवारी भामरागडला बेटाचे स्वरूप आले. नगरातील बाजारपेठेतील दुकानांसह आंबेडकर नगर, शोभा नगरातील जवळपास १५० घरे जलमय झाली आहेत. अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरले आहे. मुसलमान टोल्यालाही पुराचा वेढा पडला आहे.

ठळक मुद्देचार तालुक्यात अतिवृष्टी : १० मार्गांची वाहतूक ठप्प

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली, भामरागड, कुरखेडा : जिल्ह्याच्या उत्तर भागातील चार तालुक्यांमध्ये अतिवृष्टी होऊन अनेक ठिकाणच्या नाल्यांना पूर आला आहे. त्यामुळे ठेंगणे पूल पाण्याखाली जाऊन जवळपास १० मार्गांवरील वाहतूक खोळंबली आहे. विशेष म्हणजे दक्षिणेकडील भामरागड तालुक्यात २४ तासात जेमतेम १३.९ मिमी पाऊस झालेला असला तरी छत्तीसगडकडून येणाऱ्या नद्यांच्या दाबामुळे पर्लकोटा नदीवर दाब येऊन तिचे पाणी भामरागडमध्ये शिरले. त्यामुळे १५० पेक्षा जास्त घरांना पाण्याचा वेढा पडला आहे.शुक्रवारी सकाळी घेतलेल्या नोंदीनुसार, २४ तासात सर्वाधिक १२९ मिमी पाऊस कुरखेडा तालुक्यात झाला. तसेच देसाईगंज तालुक्यात ९९ मिमी तर आरमोरी तालुक्यात ६६.५ मिमी पाऊस झाल्याची नोंद घेण्यात आली. त्यामुळे कुरखेडा आणि आरमोरी तालुक्यातही अनेक नाल्यांना पूर येऊन मार्ग अडले आहेत.पर्लकोटा नदीला यावर्षी दुसऱ्यांदा पुराचा फटका बसला. गुरूवारपासून पुराचे पाणी सतत वाढतच आहे. हे पाणी गावात शिरल्यामुळे भामरागड नागरवासीयांची व प्रशासनाचा चिंता वाढली आहे. शुक्रवारी भामरागडला बेटाचे स्वरूप आले. नगरातील बाजारपेठेतील दुकानांसह आंबेडकर नगर, शोभा नगरातील जवळपास १५० घरे जलमय झाली आहेत. अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरले आहे. मुसलमान टोल्यालाही पुराचा वेढा पडला आहे. त्यामुळे पुरपीडित लोकांचे सामान सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले.प्रशासनातर्फे पूरग्रस्तांना राहण्याकरिता भगवंतराव आश्रमशाळा, समूह निवासी शाळा व इतर शासकीय इमारतीम्ांध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. तहसीलदार सत्यनारायण सीलमवार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.कुणाल सोनवणे, नायब तहसीलदार अनमोल कांबळे, नगर पंचायत मुख्याधिकारी सुरज जाधव हे पूपरिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत.मुस्लिम टोल्यातून गावात येण्याºया रस्त्यावर पाणी असल्याने त्यांची आरोग्य तपासणी करण्यासाठी ग्रामीण रु ग्णालयाचे डॉ.कांबळे व त्यांच्या चमूने बोटच्या सहाय्याने जाऊन तिथे स्टॉल लावला व सर्वांची तपासणी केली.सध्या इंद्रावती नदी ही जगदलपूर (छत्तीसगड) येथे धोका पातळीच्या वर वाहात आहे. ही नदी भामरागड तालुक्यातील कवंडे गावातून प्रवेश करु न पुढे दक्षिण भागात सोमनूर येथे गोदावरी नदीला जाऊन मिळते. सध्या नदीची पाणी पातळी लक्षात घेता इंद्रावती नदीकिनाऱ्यावरील गावांनी विशेष सतर्कता बाळगावी. संबंधित तहसीलदारांनी आवश्यकता पडल्यास परिसरातील लोकांना तत्काळ सुरक्षित ठिकाणी हलविण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. गोसेखुर्द धरणामधूनही वेळोवेळी विसर्ग सुरू आहे.१२८ गावे संपर्काबाहेरभामरागड तालुक्यातील १२८ गावांचा तालुका मुख्यालयाशी असलेला संपर्क तुटल्याने सदर गावांची काय परिस्थिती असेल याची माहिती प्रशासनाकडेही नाही. सध्या भामरागड-कोठी, भामरागड-आरेवाडा, भामरागड-नेलगुंडा, भामरागड-लाहेरी, भामरागड-मन्नेराजाराम असे सर्व मार्ग बंद आहेत. त्यामुळे त्या गावांपर्यंत पोहोचण्यासाठी सध्या कोणताही पर्याय नाही.नागरिकांनी सतर्क राहावेसध्या गडचिरोली जिल्ह्यातून वाहणाºया विविध नद्या-उपनद्या तसेच नजीकच्या जिल्ह्यातील धरणांमधून वेळोवेळी सोडले जाणारे पाणी जिल्ह्यातून वाहणाºया नद्या-नाल्यांच्या पातळीमध्ये वाढ होऊन पूरपरिस्थिती निर्माण होत आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे. संभाव्य पूरपरिस्थितीवर उचित उपाययोजना करण्यासाठी संबंधित सर्व विभागांमध्ये समन्वय ठेवण्याची सूचनाही त्यांनी केली आहे.मेडिगड्डातील विसर्गामुळे गावांना धोकामेडिगड्डा बॅरेजमधून वेळोवेळी सोडण्यात येणाऱ्या विसर्गामुळे (सध्या विसर्ग ४.२८ लक्ष क्युसेक्स) गोदावरी नदीच्या खालील भागातील गावांमध्ये विशेषत: कोतापल्ली, मद्दीकुंठा, चिंतरवेला, अंकिसा, आसरअल्ली, सुंकरअल्ली, मुथुपुरम, मुकडागट्टा, बोम्मेलकोंडा, सोमनूर इत्यादी गावांमध्ये विशेष दक्षता घेण्याचा इशारा देण्यात आला आहे. इंद्रावती व गोदावरी नदीकिनारी असलेल्या गावांतील नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर