शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

भामरागड अजूनही वनवासात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 23:30 IST

महाराष्ट्र तसेच गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या आदिवासीबहुल, अतिदुर्गम भामरागड तालुक्याच्या अनेक गावांमध्ये आजही रस्ते, वीज, शिक्षण, आरोग्य आदीसह इतर मूलभूत सुविधा पोहोचल्याच नाही.

ठळक मुद्देमूलभूत सुविधा पोहोचल्याच नाही : २५ वर्ष उलटूनही आदिवासींचा संघर्ष कायम

रमेश मारगोनवार ।आॅनलाईन लोकमतभामरागड : महाराष्ट्र तसेच गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या आदिवासीबहुल, अतिदुर्गम भामरागड तालुक्याच्या अनेक गावांमध्ये आजही रस्ते, वीज, शिक्षण, आरोग्य आदीसह इतर मूलभूत सुविधा पोहोचल्याच नाही. परिणामी या भागातील नागरिक विविध समस्यांचा सामना करीत अडचणीचे जीणे जगत आहे. विशेष म्हणजे भामरागड तालुक्याच्या निर्मितीला आता २५ वर्षांचा कालावधी उलटला आहे. मात्र या भागातील आदिवासी नागरिकांचा संघर्ष कायम असल्याचे दिसून येते.भामरागड तालुक्याची निर्मिती १९९२ मध्ये झाली. आता २०१८ ला तालुका निर्मितीला २५ वर्षे उलटले असून या तालुक्याची वाटचाल २६ व्या वर्षाकडे सुरू झाली आहे. मात्र विकासाचा वाटा विस्तारल्याचे दिसून येत नाही. भामरागड तालुक्यात माडीया आदिवासी जमातीचे लोक मोठ्या संख्येने निसर्गाच्या सानिध्यात राहून आपला उदरनिर्वाह करीत आहेत. त्यांना नवे वर्षे येवो की जावो याचे काहीही सोयरसुतक नाही. एकीकडे शहरांचा झपाट्याने विकास होत आहे. भारत देश प्रगतीच्या वाटेवर आहे. मात्र दुसरीकडे महाराष्टÑातील गडचिरोली जिल्ह्याच्या टोकावर वसलेला भामरागड तालुका निर्मितीपासूनच विकासाच्या प्रतीक्षेत आहे.शासन दरवर्षी कोट्यवधी रूपये खर्च करून दुर्गम भागातील जनतेपर्यंत विविध योजना पोहोचविण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र यापैकी बºयाच योजनांची माहिती भामरागड तालुक्यातील आदिवासी नागरिकांना नसल्याने हे नागरिक शासकीय योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. पोलीस विभागातर्फे ठिकठिकाणी जनजागरण मेळावे घेण्यात आले. यात आदिवासी, पंचायत समिती, महसूल, शिक्षण, आरोग्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच पदाधिकाऱ्यांनी या जनजागरण मेळाव्याकडे पाठ फिरविली. आदिवासी नागरिकांच्या नावावर राजकारण करणाऱ्या आदिवासी समाजातील नेत्यांना भामरागडातील आदिवासींची दयनिय स्थिती दिसत नाही काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आलापल्लीवरून भामरागडला येण्यासाठी रस्ता नाही. तालुका ठिकाणची पाणीपुरवठा योजना कागदावर आहे. भामरागड येथे एक कोटी रूपये खर्च करून उभारलेली पाणीटाकी व जलशुद्धीकरण यंत्रणा कुचकामी ठरली आहे. नगर पंचायतीचे या समस्येकडे दुर्लक्ष होत आहे. २०१८ या नव्या वर्षात भामरागड तालुक्यात विकासाचा महामेरू येईल काय, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.