शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

तीन वर्षांपासून भेंडाळा परिसरातील शेतीच्या माती परीक्षणाला बगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:37 IST

भेंडाळा : चामाेर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरात असलेल्या जवळपास पंधरा ते सोळा गावांचा समावेश आहे. सर्व गावे कृषिप्रधान आहेत; परंतु ...

भेंडाळा : चामाेर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरात असलेल्या जवळपास पंधरा ते सोळा गावांचा समावेश आहे. सर्व गावे कृषिप्रधान आहेत; परंतु या गावातील शेतकऱ्यांना शेतजमिनीचा पाेत कसा आहे, याबाबत माहिती नाही. गेल्या तीन वर्षांपासून माती परीक्षण न झाल्याने शेतकऱ्यांना पिकांचे खत व्यवस्थापन करताना अडचणी येत आहेत. त्यामुळे या भागातील माती परीक्षणाला कृषी विभाग बगल देत आहे की काय? असा सवाल शेतकरी करीत आहेत.

भेंडाळा परिसरातील शेती उपजाऊ आहे. पूर्वी शेतात प्रवेश करताच मातीचे ढेकूळ पायाने फुटायचे, पायाला मुलायमपणाचा जाणवायचा, आता जमीन कडक दिसून येते. रासायनिक खताच्या अतिवापराने मातीतील मुलायमपणा निघून गेला आहे. त्यामुळे माती परीक्षण करणे नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताचे आहे; परंतु गेल्या तीन वर्षांपासून माती परीक्षण झाले नाही. माती परीक्षणामुळे शेतात घेण्यात येणाऱ्या पीक खर्चात बचत करून उत्पादन वाढवता येते. सोबतच पिकांना द्यावयाच्या खताची मात्रा निश्चित करता येते. गैरवाजवी खते देण्यावर नियंत्रण येते. नत्र, पालाश, स्फूरद, तांबे, लोह, मॅगनिज, जस्त यासारख्या पोषक द्रव्यांचा व सूक्ष्म मूलद्रव्याचा शोध घेता येतो. यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन व प्रोत्साहित करणे आवश्यक आहे; परंतु तसे होताना दिसत नाही. प्रत्येक शेतकरी आपापल्या पद्धतीने शेतात रासायनिक खते टाकतात. अमर्यादित असा रासायनिक खताचा वापर शेतात होत आहे. त्यामुळे शेतजमिनीसाठी योग्य प्रमाणात रासायनिक खताचा वापर, मृदेचे पोषक द्रव्य वाढवून जमिनीचे आरोग्य नियंत्रित, अबाधित ठेवण्याकरिता मृदा परीक्षण गरजेचे आहे. मात्र, चामोर्शी तालुक्यात मागील तीन वर्षांपासून भेंडाळा परिसरात असलेल्या शेतामध्ये माती परीक्षण न झाल्याचे निदर्शनास आले आहे.

बाॅक्स

तालुका कृषी विभागाचे दुर्लक्ष -धर्मशीला सहारे

चामाेर्शीचे तालुका कृषी अधिकारी शेतकऱ्यांना याेग्य मार्गदर्शन करीत नाही. तसेच मुख्यालयी असतानासुद्धा ते पंचायत समितीमध्ये मासिक बैठकीला उपस्थित राहत नाही. आपला प्रतिनिधी पाठवितात. त्यामुळे कृषीसंदर्भात असणाऱ्या समस्या आम्ही कुणाकडे मांडायच्या, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून भेंडाळा परिसरासह तालुक्यातील शेतीचे माती परीक्षण लवकर करावे, अशी मागणी पंचायत समिती सदस्य धर्मशीला सहारे यांनी केली.

काेट

मागील तीन वर्षांपासून तालुक्यातील भेंडाळा परिसरातील शेतजमिनीचे माती परीक्षण झाले नाही. मागील वर्षी कोरोनाचे संकट असल्याने कोणतीच कामे होऊ शकली नाही. तसेच २०१७ ते २०१९ या या कालावधीत मी या पदावर नव्हतो. मागील वर्षी कोरोना काळातच येथे माझी नियुक्ती झाली. त्यामुळे यापूर्वी माती परीक्षण का झाले नाही, याबाबत सांगू शकत नाही. पंचायत समिची मासिक अथवा त्रैमासिक बैठकीत मी उपस्थित राहताे. केवळ कार्यालयीन कामे असल्यास मी आपला प्रतिनिधी पाठविताे.

-सागर डांगे, तालुका कृषी अधिकारी चामोर्शी