शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
2
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
3
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
4
बालरोग विभागाच्या प्रमुखाकडून त्रास, ‘जे जे’मध्ये निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरूच! 
5
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा
6
नोकरीचे प्रलोभन दाखवून तरुणीवर बलात्कार, आरोपीला अटक, ५ दिवसांची पोलीस कोठडी
7
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
8
केमोथेरपीमुळे कॅन्सर आणखी बळावण्याची भीती?; चिनी संशोधकांचा धक्कादायक दावा
9
चीन तिबेटमध्ये बांधतोय जगातील सर्वांत मोठे धरण; भारत-चीन सीमेजवळ असणार प्रकल्प
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, दुपटीने लाभ; २ राजयोग करतील मालामाल, शुभ काळ!
11
लक्षात ठेवा, मी सांगतो तेच काम आणि कामाशिवाय दाम; विधिमंडळातील राड्यावर जनता नाराज
12
विधानसभा निवडणुकीत मविआच्या चुका झाल्या, उद्धव ठाकरे यांचे मत; अहंकारावरही बोट
13
शब्देविण संवादू... इमोजींची अकरा वर्षे: अबोल भावनांना मिळालेले 'रूप' आणि 'रंग'
14
त्या खासदार झाल्या, पण छळ काही थांबला नाही...; इंटर पार्लियामेंटरी युनियनचा धक्कादायक अहवाल
15
काँग्रेससोबत उत्तर भारतीयांना जोडण्यासाठी ‘मुंबई विरासत मिलन’ 
16
राज ठाकरेंना मी हिंदी शिकवली; निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचले 
17
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
18
धक्कादायक..! छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच कुटुंबातील ३ बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा
19
डेस्कटॉप पुन्हा फॉर्मात! वेगवान कामगिरी आणि सोयीमुळे मागणीत वाढ
20
ताक प्या आणि मस्त राहा! पण ताकासाठी दही कसं निवडावं? हेही जाणून घ्या

चामोर्शी एसडीओ कार्यालयावर बंगाली बांधव धडकले

By admin | Updated: December 15, 2015 03:36 IST

पुनर्वसित बंगाली बांधवांना अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र देणे व इतर सोयीसुविधा देण्याच्या प्रमुख मागणीसह विविध

चामोर्शी : पुनर्वसित बंगाली बांधवांना अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र देणे व इतर सोयीसुविधा देण्याच्या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी तालुक्यातील बंगाली बांधवांच्या वतीने निखिल भारत बंगाली उद्वास्तू समन्वय समितीच्या नेतृत्वात येथील उपविभागीय कार्यालयावर सोमवारी धडक मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर उपविभागीय अधिकारी जी. एम. तळपादे व तहसीलदार यू. जी. वैद्य यांच्या मार्फतीने शासनाला निवेदन सादर करण्यात आले. राज्यातील गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर जिल्ह्यातील पुनर्वसित बंगाली बांधवांच्या विविध मागण्यांकडे शासनाने १५ वर्षांपासून दुर्लक्ष केले आहे. मोर्चे, धरणे आंदोलन व निवेदनाद्वारे शासनाकडे पाठपुरावा अनेकदा करण्यात आला. मात्र बंगाली बांधवांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने बंगाली बांधवांच्या वतीने सोमवारी मोर्चा काढण्यात आला. राज्यातील नम शूद्र, पोंद, राजवंशी जातीला अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र व सवलत देणे, निवासासाठी दिलेल्या जमिनीचे मालकी हक्क देणे, गोंदिया जिल्ह्यातील सात जि. प. बंगाली माध्यमांच्या बंगाली शाळेत बंगाली भाषिक शिक्षकांची नियुक्ती करणे, बंगाली बांधवांना नागरिक प्रमाणपत्र देणे, जिल्ह्यातील संपूर्ण गावे दुष्काळग्रस्त घोषित करून प्रति क्विंटल तीन हजार रूपये भाव धानाला द्यावा, मुलचेरा तालुक्यातील चेन्ना सिंचन प्रकल्पाचे काम पूर्ण करावे, अतिक्रमित वन जमिनीच्या पट्ट्यांसाठी तीन पिढ्यांची अट शिथील करून डिसेंबर २००५ पर्यंत अतिक्रमण केलेल्या सर्व बिगर आदिवासींना वन जमिनीचे पट्टे देण्यात यावे, बंगाली बांधवांना देण्यात आलेल्या वर्ग- २ शेत जमिनी वर्ग- १ मध्ये करणे आदी मागण्यांच्या पुर्ततेसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. मोर्चाचे नेतृत्त्व निखिल भारत बंगाली उद्वास्तू समन्वय समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. सुबोध बिश्वास यांनी केले. विविध मागण्यांचे निवेदन प्रदेश सचिव बिधान बेपारी, अध्यक्ष दीपक हलदर, प्रदेश उपाध्यक्ष निर्मलइंदू हलदर, परिमल बौध, सुभाष सरकार, सतीश रॉय, इलाबंद हलदर, प्रशांत मंडल, निखिल बिश्वास, संतोष सरदार, दीपक रॉय यांच्या उपस्थितीत देण्यात आले. मोर्चात समितीचे रवन सरकार, डॉ. मोटूलाल हलदर, बिमल सेन, तालुका सचिव डॉ. कमलेश गाईन, रनेन मंडल व बहुसंख्य बंगाली बांधव उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)