शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

लाभार्थी निश्चिती गतीने करा

By admin | Updated: August 11, 2016 01:24 IST

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत दारिद्र्य रेषेखालील (बीपीएल) कुटुंबांना गॅस कनेक्शन देण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात लाभार्थी निवड प्रक्रियेला

जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा घेतला आढावा गडचिरोली : प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत दारिद्र्य रेषेखालील (बीपीएल) कुटुंबांना गॅस कनेक्शन देण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात लाभार्थी निवड प्रक्रियेला गतिमान करावे, तसेच या योजनेचा अधिकाधिक कुटुंबांना लाभ देण्यासाठी योग्य नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांनी दिले. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या दालनात बुधवारी बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकारी नायक बोलत होते. बैठकीला जिल्हा पुरवठा अधिकारी आर. आर. चांदुरकर, निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनवने आदी उपस्थित होते. ग्रामीण भागात महिलांना आजार होण्यामागील मुख्य कारण चुलीचा होणारा वापर हे आहे. चुलीच्या वापरात जीवाश्म इंधनाचाही वापर होतो. या दोन्हीसाठी ही उज्ज्वला योजना अंमलात आणण्यात आली आहे. महिला सक्षमीकरणाचा एक भाग म्हणून सदर योजना विशेषत: ग्रामीण भागातील महिलांना लाभदायक आहे. बीपीएलपात्रधारक कुटुंबातील महिलेला या योजनेंतर्गत गॅस कनेक्शन मिळणार आहे. अर्जदाराला लहान पाच किलोचे अथवा नियमित १४.२ किलोग्रॅमचे सिलिंडर घेण्याचा पर्याय उपलब्ध आहे. २०११ च्या जनगणेनुसार गडचिरोली जिल्ह्यात ४ लाख २८ हजार ६१७ इतकी दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्या आहे. बीपीएल कुटुंबांची संख्या पहिल्या टप्प्यात निश्चित करण्याचे उद्दिष्ट असून त्यानंतर गावनिहाय व गॅस एजन्सीनिहाय योजनेच्या निकषानुसार पात्र महिलांना या योजनेचा लाभ दिला जाईल, आतापर्यंत जिल्ह्यात ९ हजार ९५१ महिलांचे अर्ज विविध गॅस एजन्सींना प्राप्त झाले असल्याची माहितीही त्यांनी दिली. या योजनेपासून एकही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही, याची खबरदारी घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. (प्रतिनिधी)