शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
2
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
3
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
4
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
5
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
6
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
7
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
8
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
9
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
10
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
11
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
12
डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'मी युद्ध थांबवलं'; इस्राइलनं गाझामध्ये ६० हजार सैनिकांना पाठवलं! काय आहे नवा प्लॅन?
13
6 एअरबॅग्ज, 35 Km मायलेज अन् ADAS सह लवकरच येतेय ही ढासू कॉम्पॅक्ट SUV; आणखी कोण कोणत्या कार होतायेत लॉन्च? बघा लिस्ट
14
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
15
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
16
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
17
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
18
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
19
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
20
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."

वाहकाकडून असभ्य वागणूक

By admin | Updated: June 25, 2015 02:00 IST

राज्य परिवहन महामंडळाच्या गडचिरोली-अमरावती या बसमध्ये गडचिरोली येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या पदाधिकाऱ्याला

विभागीय नियंत्रकाकडे तक्रार : ज्येष्ठ नागरिक संघाच्या पदाधिकाऱ्याचा केला अपमानगडचिरोली : राज्य परिवहन महामंडळाच्या गडचिरोली-अमरावती या बसमध्ये गडचिरोली येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या पदाधिकाऱ्याला वयाच्या दाखल्यावरून परिवहन महामंडळाच्या वाहकाने अपमानास्पद वागणूक दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या संदर्भात राज्य परिवहन महामंडळाच्या गडचिरोली आगाराकडे परिपत्रकही उपलब्ध नसल्याची बाब ज्येष्ठ नागरिक संघाने केलेल्या पत्र व्यवहारानंतर उजेडात आली. राज्य सरकारच्या २५ जानेवारी १९९६ व २१ जून २००८ च्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या साध्या व निमआराम बसमध्ये ६५ वर्ष व त्यावरील वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना प्रवासभाड्यात ५० टक्के सवलत अनुज्ञेय केलेली आहे. मात्र वाहकाच्या मनमानीमुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांजवळ वयाचा पुरावा असूनही त्यांना अपमानास्पद वागणूक दिल्या जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गडचिरोली येथील सेवानिवृत्त तहसीलदार व ज्येष्ठ नागरिक संघाचे प्रादेशिक विभागाचे कोषाध्यक्ष दत्तात्रय नारायण बर्लावार हे ३ मे २०१५ ला नागपूरला जाण्यासाठी गडचिरोली-अमरावती बस क्रमांक एमएच ४०-५७६२ ने सकाळी ५.४५ वाजता निघाले. त्यांच्याकडे तहसीलदारांनी दिलेले वयाबाबतचे ओळखपत्र होते. सदर एसटी बसच्या वाहकास त्यांनी ते ओळखपत्र दाखविले. तहसीलदाराने दिलेले हे ओळखपत्र बोगस आहे व यापुढे हे बस प्रवासात दाखवू नका, अशी तंबी बर्लावार यांना सदर बसच्या वाहकाने दिली, अशी माहिती बर्लावार यांनी लोकमतला दिली आहे. विभागीय नियंत्रकास व गडचिरोली येथील आमदार डॉ. देवराव होळी यांच्याकडे ५ मे २०१५ रोजी तक्रार दिली. परंतु त्यांच्याकडूनही काहीही कार्यवाही झालेली नाही. ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन महामंडळाचे वाहक नाहक अपमानास्पद वागणूक देत आहे, असा आरोप बर्लावार व डी. डी. सोनटक्के यांनी केला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)परिपत्रकही दिले नाहीबर्लावार यांनी ४ मे २०१५ ला एसटी महामंडळाच्या विभागीय नियंत्रकास तक्रार नोंदविली. त्यावेळी गडचिरोली बसस्थानक व्यवस्थापक बावणे यांना ही तक्रार देण्यात आली. ज्येष्ठांच्या ओळखपत्राच्या वैधतेबाबत एसटी महामंडळाचे काही वेगळे परिपत्रक असल्यास ते दाखवावे, असा आग्रह धरण्यात आला. मात्र बसस्थानक व्यवस्थापकांनी परिपत्रकाची शोधाशोध केली. परंतु त्यांना ते सापडले नाही. ४८ दिवसांचा कालावधी लोटला. परंतु त्यांच्याकडून अद्यापही परिपत्रक उपलब्ध करून देण्यात आले नाही. त्यामुळे प्रशासनाचा बेजबाबदारपणा उघडकीस आला आहे.