शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

वाहकाकडून असभ्य वागणूक

By admin | Updated: June 25, 2015 02:00 IST

राज्य परिवहन महामंडळाच्या गडचिरोली-अमरावती या बसमध्ये गडचिरोली येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या पदाधिकाऱ्याला

विभागीय नियंत्रकाकडे तक्रार : ज्येष्ठ नागरिक संघाच्या पदाधिकाऱ्याचा केला अपमानगडचिरोली : राज्य परिवहन महामंडळाच्या गडचिरोली-अमरावती या बसमध्ये गडचिरोली येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या पदाधिकाऱ्याला वयाच्या दाखल्यावरून परिवहन महामंडळाच्या वाहकाने अपमानास्पद वागणूक दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या संदर्भात राज्य परिवहन महामंडळाच्या गडचिरोली आगाराकडे परिपत्रकही उपलब्ध नसल्याची बाब ज्येष्ठ नागरिक संघाने केलेल्या पत्र व्यवहारानंतर उजेडात आली. राज्य सरकारच्या २५ जानेवारी १९९६ व २१ जून २००८ च्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या साध्या व निमआराम बसमध्ये ६५ वर्ष व त्यावरील वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना प्रवासभाड्यात ५० टक्के सवलत अनुज्ञेय केलेली आहे. मात्र वाहकाच्या मनमानीमुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांजवळ वयाचा पुरावा असूनही त्यांना अपमानास्पद वागणूक दिल्या जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गडचिरोली येथील सेवानिवृत्त तहसीलदार व ज्येष्ठ नागरिक संघाचे प्रादेशिक विभागाचे कोषाध्यक्ष दत्तात्रय नारायण बर्लावार हे ३ मे २०१५ ला नागपूरला जाण्यासाठी गडचिरोली-अमरावती बस क्रमांक एमएच ४०-५७६२ ने सकाळी ५.४५ वाजता निघाले. त्यांच्याकडे तहसीलदारांनी दिलेले वयाबाबतचे ओळखपत्र होते. सदर एसटी बसच्या वाहकास त्यांनी ते ओळखपत्र दाखविले. तहसीलदाराने दिलेले हे ओळखपत्र बोगस आहे व यापुढे हे बस प्रवासात दाखवू नका, अशी तंबी बर्लावार यांना सदर बसच्या वाहकाने दिली, अशी माहिती बर्लावार यांनी लोकमतला दिली आहे. विभागीय नियंत्रकास व गडचिरोली येथील आमदार डॉ. देवराव होळी यांच्याकडे ५ मे २०१५ रोजी तक्रार दिली. परंतु त्यांच्याकडूनही काहीही कार्यवाही झालेली नाही. ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन महामंडळाचे वाहक नाहक अपमानास्पद वागणूक देत आहे, असा आरोप बर्लावार व डी. डी. सोनटक्के यांनी केला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)परिपत्रकही दिले नाहीबर्लावार यांनी ४ मे २०१५ ला एसटी महामंडळाच्या विभागीय नियंत्रकास तक्रार नोंदविली. त्यावेळी गडचिरोली बसस्थानक व्यवस्थापक बावणे यांना ही तक्रार देण्यात आली. ज्येष्ठांच्या ओळखपत्राच्या वैधतेबाबत एसटी महामंडळाचे काही वेगळे परिपत्रक असल्यास ते दाखवावे, असा आग्रह धरण्यात आला. मात्र बसस्थानक व्यवस्थापकांनी परिपत्रकाची शोधाशोध केली. परंतु त्यांना ते सापडले नाही. ४८ दिवसांचा कालावधी लोटला. परंतु त्यांच्याकडून अद्यापही परिपत्रक उपलब्ध करून देण्यात आले नाही. त्यामुळे प्रशासनाचा बेजबाबदारपणा उघडकीस आला आहे.