शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

वर्षारंभीच गाढवी नदी झाली कोरडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:36 IST

महाराष्ट्र राज्य तथा गोंदिया जिल्ह्याच्या पूर्व सीमेजवळील ढासगढ येथून उगम पावणारी आणि हजारो मीटर अंतर पार करून गडचिरोली जिल्ह्याच्या ...

महाराष्ट्र राज्य तथा गोंदिया जिल्ह्याच्या पूर्व सीमेजवळील ढासगढ येथून उगम पावणारी आणि हजारो मीटर अंतर पार करून गडचिरोली जिल्ह्याच्या पश्चिम सीमेवर असलेल्या आरमोरी तालुक्यातील शिवणी येथे वैनगंगा नदीत विलीन होणारी गाढवी नदी विसोरा तसेच देसाईगंज तालुक्यातील शेतकरी, नागरिकांची जीवनदायिनी म्हणून ओळखली जाते. गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यातून वाहताना दोन्ही किनाऱ्यावरील शेकडो हेक्टर शेतातील पिकांना पाणी पुरवते. गोंदिया, गडचिरोली हा घनदाट अरण्यप्रदेश असून या भागात दरवर्षी चांगला पाऊस पडतो.

नदीच्या प्रवाहात काठावरच्या शेतांमध्ये पाणी पुरवण्यासाठी हजारो मोटारपंप लावले आहेत. मात्र अर्जुनी तालुक्यातील गोठणगाव जवळच्या डोंगररांगांंच्या आड नदीचे पाणी अडवून इटीयाडोह धरण बांधले आहे. त्यामुळे नदीचा पाणी प्रवाह अनियमित झाला आहे. पावसाळ्यात धो-धो पाऊस आल्यावरच धरणाचे पाणी ओव्हर होऊन नदीतील पाणी प्रवाह संतत असतो. पण पाऊस बंद झाला आणि पाण्याचा ओव्हरफ्लो सुद्धा थांबतो आणि नदी पण कोरडी होण्यास सुरुवात होते. नदीच्या पात्रातील पाण्याचा वेग अनियंत्रित आणि जोराचा राहत असल्यामुळे रेतीचा चढउतार जागोजागी उभा होतो. त्यानेही पात्रातील पाण्याचा प्रवाह प्रभावित होतो. त्यामुळे काही ठिकाणी पात्र अरुंद झाले आहे. तसेच नदी काठावरचे झाडेझुडुपे तोडून नष्ट केली जात आहेत. त्याठिकाणी पात्र पसरट झाले आहे. हा सर्व परिणाम नैसर्गिक आहे.

परंतु नदीचा पाणी प्रवाह बंद होण्यास मानवनिर्मित कारणेही आहेत. पावसाळ्यात नदी प्रवाहातील पाण्याला जोरदार वेग असतो. परिणामी पाण्याच्या प्रवाहातील सर्व अडथळे दूर सारून पाणी प्रवाहित होते. जेव्हा पावसाळा संपला म्हणजे ऑक्टोबर नंतर नदीच्या पात्रात जेसीबी यंत्राने खोल खड्डे खोडून त्यात मोटारपंप लावले जातात. रेतीची पार बांधून पाणी अडविले जाते. त्यामुळे अल्पावधीत नदीचा प्रवाह कोरडा होतो. नदीकाठापासून काही नजीक वसलेल्या गावातील नागरिकाचा मृत्यू झाल्यास नदीच्या पात्रात मृतदेह जाळले जातात. त्यासाठी मोठाले लाकडी अर्धवट जळालेल्या अवस्थेत नदी पाण्यात तसेच फेकले जातात. तसेच गेली कित्येक वर्षांपासून स्वच्छ न केलेले नदी पात्र स्वच्छ करणे गरजेचे आहे.

नदी निव्वळ पाण्याला वाहून नेणारी एवढेच तिचे महत्त्व नाही तर प्राणी, पक्षी, वनस्पती, माती या सर्वाँच्या अनमोल अशा जैविविधतेला समृद्ध करणारी नैसर्गिक देणगी आहे. नदीकाठच्या शेतात धानपीक, अन्य खरीप, रब्बी पीके घेतली जातात. याही वेळी पीक लागवड सुरू आहे वा झाली आहे. तसेच उत्पादन सुद्धा बाजारात दाखल झाले आहे. नदीच्या पाण्यावर शेती पिकत असल्यामुळे अनेक कुटुंबांचा चरितार्थ सुरळीत चालत आहे. नदी कोरडी झाली कि पात्रात जागोजागी पाण्यासाठी खड्डे खोदलेले दिसून येतात. त्यामुळे पाणी तिथेच थांबते आणि प्रवाह बंद होतो. आता नदीच्या पात्रातील झाडे तोडून तिथे शेतीही केली जात आहे. याकडे पर्यावरण विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होते आहे