शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

पाणी पुरवठ्याबाबत गंभीर राहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 00:12 IST

माणसाला शुद्ध पाणी मिळणे आरोग्य टिकविण्यासाठी गरजेचे आहे. त्याकरिता ग्रामपंचायत पदाधिकाºयांसह सर्व कर्मचाºयांनी तसेच ग्रामस्थांनीसुद्धा पाणीपुरवठ्याबाबत संवेदनशील राहावे, ....

ठळक मुद्देकृषी सभापतींचे आवाहन : देसाईगंजात तालुकास्तरीय पाणी गुणवत्ता कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : माणसाला शुद्ध पाणी मिळणे आरोग्य टिकविण्यासाठी गरजेचे आहे. त्याकरिता ग्रामपंचायत पदाधिकाºयांसह सर्व कर्मचाºयांनी तसेच ग्रामस्थांनीसुद्धा पाणीपुरवठ्याबाबत संवेदनशील राहावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती नाना नाकाडे यांनी केले.स्वच्छता हीच सेवा या अभियानांतर्गत देसाईगंज पंचायत समितीच्या सभागृहात मंगळवारी तालुकास्तरीय पाणीगुणवत्ता कार्यशाळा पार पडली. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर अध्यक्षस्थानी पं. स. सभापती मोहन गायकवाड होते. प्रमुख अतिथी म्हणून जि. प. सदस्य रमाकांत ठेंगरी, रोशन पारधी, पं. स. सदस्य अशोक नंदेश्वर, शेवंता अवसरे, रेवाता अलोणे, अर्चना ढोरे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता कटरे, जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी एस. डी. पठाण आदी मान्यवर उपस्थित होते.नागरिकांनी शौचालयाचा नियमित वापर केला पाहिजे, स्वच्छतेच्या सवयी पाळल्या पाहिजे, यामध्ये महिलांचा मोठा सहभाग असणे आवश्यक आहे, असे उपस्थित मान्यवरांनी सांगितले. तसेच शुद्ध पाणी, शुद्ध परिसर, वैयक्तिक स्वच्छता, व्यवस्थापन, पर्यावरण व पारंपारिक ऊर्जा पारदर्शकता आदी विषयाचे महत्त्व पटवून देण्यात आले. पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता एस. एच. कटरे, आरोग्य सहायक दरडमारे, सहायक बालविकास प्रकल्प अधिकारी संध्या उईके यांनी याप्रसंगी पाणीगुणवत्तेबाबत तांत्रिकदृष्ट्या मौलिक मार्गदर्शन केले.प्रास्ताविक स्वाती लांजेवार, संचालन अर्चना बडोले यांनी केले तर आभार ग्रामविकास अधिकारी पांडुरंग पेशने यांनी मानले. कार्यशाळेला सरपंच, सदस्य, ग्रामसेवक, अंगणवाडी पर्यवेक्षिका आरोग्यसेवक व जलसुरक्षक हजर होते.गोदरीमुक्त ग्राम पंचायतींचा सत्कारसदर कार्यशाळेत हागणदारीमुक्त झालेल्या देसाईगंज तालुक्यातील पिंपळगाव, कसारी, डोंगरगाव, विसोरा, कुरूड या ग्राम पंचायतीचे सरपंच, सचिव यांना पारितोषिक, प्रमाणपत्र व ट्रॉफि देऊन सत्कार करण्यात आला.पाणी गुणवत्ता संनियंत्रण स्वच्छ भारत मिशन आणि संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाची सांगड घालून देसाईगंज तालुक्यातील सर्व ग्राम पंचायतींनी ही चळवळ प्रभावीपणे राबवावी, असे आवाहन जि. प. चे कृषी सभापती नाना नाकाडे, पं. स. सभापती मोहन गायकवाड, रोशनी पारधी, सुनीता मरस्कोल्हे व उमेशचंद्र चिलबुले आदींनी केले.