शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

पाणी पुरवठ्याबाबत गंभीर राहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 00:12 IST

माणसाला शुद्ध पाणी मिळणे आरोग्य टिकविण्यासाठी गरजेचे आहे. त्याकरिता ग्रामपंचायत पदाधिकाºयांसह सर्व कर्मचाºयांनी तसेच ग्रामस्थांनीसुद्धा पाणीपुरवठ्याबाबत संवेदनशील राहावे, ....

ठळक मुद्देकृषी सभापतींचे आवाहन : देसाईगंजात तालुकास्तरीय पाणी गुणवत्ता कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : माणसाला शुद्ध पाणी मिळणे आरोग्य टिकविण्यासाठी गरजेचे आहे. त्याकरिता ग्रामपंचायत पदाधिकाºयांसह सर्व कर्मचाºयांनी तसेच ग्रामस्थांनीसुद्धा पाणीपुरवठ्याबाबत संवेदनशील राहावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती नाना नाकाडे यांनी केले.स्वच्छता हीच सेवा या अभियानांतर्गत देसाईगंज पंचायत समितीच्या सभागृहात मंगळवारी तालुकास्तरीय पाणीगुणवत्ता कार्यशाळा पार पडली. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर अध्यक्षस्थानी पं. स. सभापती मोहन गायकवाड होते. प्रमुख अतिथी म्हणून जि. प. सदस्य रमाकांत ठेंगरी, रोशन पारधी, पं. स. सदस्य अशोक नंदेश्वर, शेवंता अवसरे, रेवाता अलोणे, अर्चना ढोरे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता कटरे, जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी एस. डी. पठाण आदी मान्यवर उपस्थित होते.नागरिकांनी शौचालयाचा नियमित वापर केला पाहिजे, स्वच्छतेच्या सवयी पाळल्या पाहिजे, यामध्ये महिलांचा मोठा सहभाग असणे आवश्यक आहे, असे उपस्थित मान्यवरांनी सांगितले. तसेच शुद्ध पाणी, शुद्ध परिसर, वैयक्तिक स्वच्छता, व्यवस्थापन, पर्यावरण व पारंपारिक ऊर्जा पारदर्शकता आदी विषयाचे महत्त्व पटवून देण्यात आले. पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता एस. एच. कटरे, आरोग्य सहायक दरडमारे, सहायक बालविकास प्रकल्प अधिकारी संध्या उईके यांनी याप्रसंगी पाणीगुणवत्तेबाबत तांत्रिकदृष्ट्या मौलिक मार्गदर्शन केले.प्रास्ताविक स्वाती लांजेवार, संचालन अर्चना बडोले यांनी केले तर आभार ग्रामविकास अधिकारी पांडुरंग पेशने यांनी मानले. कार्यशाळेला सरपंच, सदस्य, ग्रामसेवक, अंगणवाडी पर्यवेक्षिका आरोग्यसेवक व जलसुरक्षक हजर होते.गोदरीमुक्त ग्राम पंचायतींचा सत्कारसदर कार्यशाळेत हागणदारीमुक्त झालेल्या देसाईगंज तालुक्यातील पिंपळगाव, कसारी, डोंगरगाव, विसोरा, कुरूड या ग्राम पंचायतीचे सरपंच, सचिव यांना पारितोषिक, प्रमाणपत्र व ट्रॉफि देऊन सत्कार करण्यात आला.पाणी गुणवत्ता संनियंत्रण स्वच्छ भारत मिशन आणि संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाची सांगड घालून देसाईगंज तालुक्यातील सर्व ग्राम पंचायतींनी ही चळवळ प्रभावीपणे राबवावी, असे आवाहन जि. प. चे कृषी सभापती नाना नाकाडे, पं. स. सभापती मोहन गायकवाड, रोशनी पारधी, सुनीता मरस्कोल्हे व उमेशचंद्र चिलबुले आदींनी केले.