शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

नक्षलग्रस्त भागात पेटले बॅनर युध्द

By admin | Updated: May 23, 2017 17:14 IST

नक्षल सप्ताहाच्या निमित्ताने ग्रामीण भागात बॅनर युध्द पेटले असल्याचे दिसून येत आहे.

आॅनलाईन लोकमतगडचिरोली : पश्चिम बंगाल राज्यात झालेल्या नक्षलबरी येथील लढाईला ५० वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्त जनतेने २३ ते २९ मे या कालावधीत नक्षल सप्ताह पाळण्याचे आवाहन बॅनरच्या माध्यमातून केले आहे. तर आदिवासी बचाव समितीच्या नावाने जिमलगट्टा परिसरात बॅनर बांधण्यात येऊन नक्षल्यांनी आदिवासींची लूट केली असल्याचा आरोप केला आहे. एकंदरीतच नक्षल सप्ताहाच्या निमित्ताने ग्रामीण भागात बॅनर युध्द पेटले असल्याचे दिसून येत आहे. नक्षल्यांनी २३ मेच्या रात्री एटापल्ली पासून अगदी तीन किमी अंतरावर असलेल्या जीवनगट्टा व डोली मार्गावर बॅनर बांधले आहेत. या लाल रंगाच्या बॅनरवर नक्षलबरीच्या लढाईच्या लढाईला ५० वर्ष पूर्ण होत आहे. या निमित्त आनंदोस्तव साजरा करावा, नक्षल चळवळीचे संस्थापक चारू मुजूमदार यांना लाल सलाम, साम्राज्यवाद व नोकरशाहीवादापासून सावध राहा, असा संदेश देण्यात आला आहे. २३ मे च्याच रात्री आदिवासी बचाव समितीच्या नावाने अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा परिसरात बॅनर टाकले आहे. यामध्ये नक्षल्यांनी निरपराध नागरिकांची हत्या करणे बंद करावे, आदिवासींच्या नावावर खंडणी वसुली बंद करावी, नक्षल्यांद्वारे बंद पाळण्याच्या आवाहनाचा धिक्कार करावा, असे आवाहन केले आहे. दोन्ही बाजुने आवाहन करणारी बॅनर व नक्षल पत्रके ग्रामीण भागात टाकण्यात आली असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.