शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
"वर्गात एक विद्यार्थी असेल तरी मराठीची तुकडी चालली पाहिजे", विश्वास पाटील यांची स्पष्ट भूमिका
3
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
4
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
5
निर्भिड आणि बेधडक पत्रकारितेची आज गरज; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत
6
Pune Crime: नाशिकच्या तरुणीवर हिंजवडीत कोयत्याने हल्ला! प्रेमप्रकरणातून तरुणाने केला जीव घेण्याचा प्रयत्न
7
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
8
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
9
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
10
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
11
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
12
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
13
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
14
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
15
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
16
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
17
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
18
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
19
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
20
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख

उद्योगांना कर्ज वाटपात बँकांचा अखडता हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 00:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : उद्योग स्थापन करू इच्छीणाऱ्याला कर्ज सुलभतेने उपलब्ध व्हावे, यासाठी केंद्र शासनाने एप्रिल २०१५ पासून ...

ठळक मुद्दे६,७९६ लाभार्थी : चार वर्षात ९१ लाखांचे कर्ज वितरण

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : उद्योग स्थापन करू इच्छीणाऱ्याला कर्ज सुलभतेने उपलब्ध व्हावे, यासाठी केंद्र शासनाने एप्रिल २०१५ पासून मुद्रा योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक बँकेला मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. मात्र बँका कर्ज वाटप करताना अखडता हात घेत असल्याचे दिसून येते. चार वर्षांच्या कालावधीत केवळ ९१ लाख रुपयांचे कर्ज वितरित केले आहे.कोणताही व्यवसाय व उद्योग स्थापन करण्यासाठी पैसा ही सर्वात महत्त्वाची बाब आहे. अनेक युवकांची व्यवसाय करण्याची इच्छा राहते. मात्र त्याच्याकडे निधी राहत नाही. त्यामुळे व्यवसाय सुरू करू शकत नाही. परिणामी बेरोजगारीचा सामना करावा लागतो किंवा इच्छा नसताना मिळेल ते काम करून पोट भरावे लागते. होतकरू तरूणांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी पैसे उपलब्ध व्हावे, या उद्देशासने केंद्र शासनाने एप्रिल २०१५ मध्ये मुद्रा योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत व्यावसायिकाची क्षमता बघून कर्जाचे वितरण करायचे आहे. मात्र या योजनेअंतर्गतही बँका कर्जाचे वितरण करताना अनेक मापदंड लावून कर्ज वितरित करण्यास टाळाटाळ करीत असल्याचे दिसून येते.एप्रिल २०१५ ते ३० मे २०१९ पर्यंत एकूण ६ हजार ७९६ लाभार्थ्यांना ९१ लाख २३ हजार रुपयांच्या कर्जाचे वितरण करण्यात आले आहे. या योजनेचे शिशू, किशोर व तरूण असे तीन प्रकार पडतात. शिशू योजनेअंतर्गत ४ हजार ३२० लाभार्थ्यांना १९ लाख ७४ हजार रुपयांच्या कर्जाचे वितरण करण्यात आले आहे. किशोर योजनेअंतर्गत २ हजार ४४९ लाभार्थ्यांना ४४ लाख ८ हजार रुपयांच्या कर्जाचे वितरण झाले आहे. तरूण योजनेअंतर्गत २८१ लाभार्थ्यांना २२ लाख २५ हजार रुपयांच्या कर्जाचे वितरण करण्यात आले आहे. चार वर्षांत बँकांच्या कर्ज वितरणाकडे लक्ष दिल्यास बँका कर्ज वितरणात आखडता हात घेत असल्याचे दिसून येते.लावले जातात अनेक मापदंडकर्जाचे वितरण करताना बँका अनेक मापदंड लावत असल्याचे दिसून येते. नवीन व अनोळखी व्यक्ती कर्ज घेण्यास आल्यास त्या व्यक्तीला सहजासहजी कर्ज दिले जात नाही. विविध कारणे सांगून कर्ज देण्यास टाळाटाळ केली जाते तर दुसरीकडे ओळखीच्या तसेच अगोदरच व्यवसायात जम बसलेल्या व्यावसायिकाला कर्ज देण्यासाठी बँका पुढाकार घेतात. बँकांच्या या धोरणामुळे गरजवंत युवक कर्जापासून वंचित राहते. जिल्ह्यातील बेरोजगारीची समस्या लक्षात घेतल्यास कर्जाचे वितरण अधिक प्रमाणात व्हायला पाहिजे, मात्र बँकांच्या चुकीच्या धोरणामुळे कर्ज वितरण होत नाही.

टॅग्स :bankबँक