शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
4
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
5
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
6
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
7
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
8
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
9
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
10
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
11
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
12
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
13
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
14
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
15
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
16
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
17
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
18
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
19
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
20
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
Daily Top 2Weekly Top 5

बनावट आरडी बुक तयार करून बॅंक ग्राहकांची ५ लाखांनी फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2022 16:57 IST

काेरची येथील एसबीआय सेवा केंद्रातील प्रकार, दाेघांना अटक

कोरची (गडचिरोली) : कोरची येथील स्टेट बँक ऑफ इंडिया ग्राहक सेवा केंद्रावर खातेदारांची फसवणूक झाली असून, कोरची पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. त्यांना मंगळवारी अटक करून बुधवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, ग्राहक सेवा केंद्रामध्ये शेतकरी व अशिक्षित अशा खातेधारकांचे बनावट खाते तयार करून फसवणूक करण्याचे प्रमाण वाढले होते.

नंदकिशोर सदानंद कावळे यांनी दिलेला तक्रारीत म्हटले आहे की, आरोपी संजीत अशोक सरजारे (वय २९, रा. नान्ही, ता. कुरखेडा, जि. गडचिरोली), वीरेंद्र टेंभुर्णे (रा. कोसमी, ता. कोरची, जि. गडचिरोली) यांना ग्राहक सेवा केंद्र चालवण्याकरिता दिले हाेते. या दोघांनी ग्राहक सेवा केंद्रावर खातेधारांचे बनावट आरडी खाते पासबुक तयार केले. त्यावर बनावट खाते क्रमांक लिहून खातेदारांनी जमा केलेली रक्कम ही स्वतःजवळ ठेवून खातेदारांच्या पैशाचा अपहार करून खातेदारांची एकूण ४ लाख ९५ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. तसेच यापूर्वी बँकेच्या खातेदारांचे हजारो रुपये खात्यात जमा करण्यासाठी खातेदारांनी दिले होते. परंतु रक्कम जमा केल्याची पावती हातात देऊन महिने उलटूनही खात्यात रक्कम जमा केले नाही.

स्टेट बँक ऑफ इंडिया यांनी खासगी कंपनी पे पॉइंट इंडिया नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड यांना विश्वासाने ग्राहक सेवा केंद्र चालवण्यासाठी दिले होते. परंतु ग्राहक सेवा केंद्र चालविणारे आरोपींची तक्रार स्टेट बँकेला मिळताच बँकेने कंपनीला याबाबत तक्रार पाठविले. सदर कंपनीने दोघाविरुद्ध पोलिस ठाण्यामध्ये तक्रार केली आहे. कोरची ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून, गडचिरोली पोलिस अधीक्षक निलोत्पल बसू व कुरखेडा उपविभागीय पोलिस अधिकारी साहील झरकर यांच्या मार्गदर्शनात या गुन्ह्याचा अधिक तपास कोरची पोलिस निरीक्षक अमोल फळतरे हे करीत आहेत.

जमा पावत्या दिल्या, मात्र पैस जमा केलेच नाही

परिसरातील काही नागरिक या केंद्राच्या मार्फतीने बॅंकेत पैसे जमा करीत हाेते. यात नागरिकांना पैसे जमा केल्याची पावती संबंधितांनी दिली आहे. मात्र, त्यांचे पैसे महिनाभराचा कालावधी हाेऊनही जमा केला नाही. त्यामुळे हे पैसे सुद्धा त्यांनी लंपास केले असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

गरिबांनी काय करावे

या केंद्रात पैसे भरणारे बहुतांश नागरिक आहेत. बचतीची सवय लागावी म्हणून खाते काढून पैसे जमा केले. मात्र, त्यांचे पैसे गहाळ करण्यात आले आहेत. त्यांच्या पैशाची जबाबदारी स्टेट बॅंक ऑफ इंडिया घेणार काय हा प्रश्न आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीbankबँकSBIएसबीआयfraudधोकेबाजीGadchiroliगडचिरोली