शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
4
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
5
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
6
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
7
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
8
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
9
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
10
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
11
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
12
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
13
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
14
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
15
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
16
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
17
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
18
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
19
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
20
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन

बनावट आरडी बुक तयार करून बॅंक ग्राहकांची ५ लाखांनी फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2022 16:57 IST

काेरची येथील एसबीआय सेवा केंद्रातील प्रकार, दाेघांना अटक

कोरची (गडचिरोली) : कोरची येथील स्टेट बँक ऑफ इंडिया ग्राहक सेवा केंद्रावर खातेदारांची फसवणूक झाली असून, कोरची पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. त्यांना मंगळवारी अटक करून बुधवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, ग्राहक सेवा केंद्रामध्ये शेतकरी व अशिक्षित अशा खातेधारकांचे बनावट खाते तयार करून फसवणूक करण्याचे प्रमाण वाढले होते.

नंदकिशोर सदानंद कावळे यांनी दिलेला तक्रारीत म्हटले आहे की, आरोपी संजीत अशोक सरजारे (वय २९, रा. नान्ही, ता. कुरखेडा, जि. गडचिरोली), वीरेंद्र टेंभुर्णे (रा. कोसमी, ता. कोरची, जि. गडचिरोली) यांना ग्राहक सेवा केंद्र चालवण्याकरिता दिले हाेते. या दोघांनी ग्राहक सेवा केंद्रावर खातेधारांचे बनावट आरडी खाते पासबुक तयार केले. त्यावर बनावट खाते क्रमांक लिहून खातेदारांनी जमा केलेली रक्कम ही स्वतःजवळ ठेवून खातेदारांच्या पैशाचा अपहार करून खातेदारांची एकूण ४ लाख ९५ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. तसेच यापूर्वी बँकेच्या खातेदारांचे हजारो रुपये खात्यात जमा करण्यासाठी खातेदारांनी दिले होते. परंतु रक्कम जमा केल्याची पावती हातात देऊन महिने उलटूनही खात्यात रक्कम जमा केले नाही.

स्टेट बँक ऑफ इंडिया यांनी खासगी कंपनी पे पॉइंट इंडिया नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड यांना विश्वासाने ग्राहक सेवा केंद्र चालवण्यासाठी दिले होते. परंतु ग्राहक सेवा केंद्र चालविणारे आरोपींची तक्रार स्टेट बँकेला मिळताच बँकेने कंपनीला याबाबत तक्रार पाठविले. सदर कंपनीने दोघाविरुद्ध पोलिस ठाण्यामध्ये तक्रार केली आहे. कोरची ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून, गडचिरोली पोलिस अधीक्षक निलोत्पल बसू व कुरखेडा उपविभागीय पोलिस अधिकारी साहील झरकर यांच्या मार्गदर्शनात या गुन्ह्याचा अधिक तपास कोरची पोलिस निरीक्षक अमोल फळतरे हे करीत आहेत.

जमा पावत्या दिल्या, मात्र पैस जमा केलेच नाही

परिसरातील काही नागरिक या केंद्राच्या मार्फतीने बॅंकेत पैसे जमा करीत हाेते. यात नागरिकांना पैसे जमा केल्याची पावती संबंधितांनी दिली आहे. मात्र, त्यांचे पैसे महिनाभराचा कालावधी हाेऊनही जमा केला नाही. त्यामुळे हे पैसे सुद्धा त्यांनी लंपास केले असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

गरिबांनी काय करावे

या केंद्रात पैसे भरणारे बहुतांश नागरिक आहेत. बचतीची सवय लागावी म्हणून खाते काढून पैसे जमा केले. मात्र, त्यांचे पैसे गहाळ करण्यात आले आहेत. त्यांच्या पैशाची जबाबदारी स्टेट बॅंक ऑफ इंडिया घेणार काय हा प्रश्न आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीbankबँकSBIएसबीआयfraudधोकेबाजीGadchiroliगडचिरोली