शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

बहुजन समाजाने क्रांती घडवावी

By admin | Updated: June 12, 2016 01:20 IST

बिरसामुंडा यांनी ब्रिटिश सरकारच्या व्यवस्थेविरोधात संघर्ष केला. त्याबरोबरच उच्च वर्णीयांकडून बहुजणांचे होणारे शोषण हाणून पाडले.

मेघराज राऊत : पत्रकार भवनात बिरसामुंडा स्मृतिदिन व प्रबोधनगडचिरोली : बिरसामुंडा यांनी ब्रिटिश सरकारच्या व्यवस्थेविरोधात संघर्ष केला. त्याबरोबरच उच्च वर्णीयांकडून बहुजणांचे होणारे शोषण हाणून पाडले. बहुजन समाजाच्या उत्कर्षासाठी बिरसामुंडा यांनी संघर्ष केला. त्यामुळे त्यांचे विचार अंगिकारत बहुजन समाजाने क्रांती घडवावी, असे आवाहन बहुजन मुक्ती आंदोलनाचे विदर्भ अध्यक्ष मेघराज राऊत यांनी गुरूवारी केले. स्थानिक पत्रकार भवनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती महोत्सवानिमित्त आयोजित शहीद बिरसामुंडा स्मृतिदिन व प्रबोधन कार्यक्रमात मार्गदर्शक म्हणून राऊत बोलत होते. उद्घाटन राष्ट्रीय संघटक संगीत इंगळे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बहुजन मुक्ती आंदोलनाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश डोंगरे होते. प्रमुख अतिथी म्हणून विदर्भ प्रभारी अरूण सरोदे, महासचिव सुधीर वालदे, महिला आघाडी अध्यक्ष शालिनी रायपुरे, पपीता जुनघरे, मीना सोेमकुवर, पोलीस निरीक्षक विजय पुराणिक उपस्थित होते. कार्यक्रमात इयत्ता बारावीतील गुणवंत सौरभ अविनाश तुरे, प्रतीक अनिल भुरसे यांचा आई, बहिणीसह सत्कार करण्यात आला. केंद्र व राज्यात सत्ता बदल झाल्यापासून अनुसूचित जमाती, भटके, इतर मागासवर्गीय लोकांची नोकरीची दारे बंद झाली आहेत. त्यामुळे सर्वांनी एकजूट होऊन संघर्ष करण्यासाठी तयार व्हावे, असे आवाहन सुरेश डोंगरे यांनी अध्यक्षीय भाषणातून केले. कार्यक्रमाचे संचालन विदर्भ महासचिव सुधीर वालदे तर आभार पपीता जुनघरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हाध्यक्ष महेंद्र राऊत, महासचिव राजेंद्र मंडपे, सचिव नरेंद्र रायपुरे, कल्पना जनबंधू, वंदना रायपुरे, संतोष मशाखेत्री, शंभरकर, भडके व गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)