शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

कंबालपेठा मार्गाची लागली वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 05:00 IST

टेकडाताला परिसर व आजूबाजूच्या गावातील अनेक लोक तहसील कार्यालय, बँक, शैक्षणिक तसेच आरोग्य सेवेच्या कामासाठी आणि विविध प्रकारच्या वस्तूंची खरेदी विक्री करण्यासाठी सिरोंचा तालुका मुख्यालय येत असतात. टेकडा या गावाशी गावखेड्यातील नागरिकांचा कुठल्या कोणत्याही कामामुळे संपर्क येत असतो.

ठळक मुद्देवाहनधारक हैराण : खड्डेमय मार्गाच्या पक्क्या दुरूस्तीची मागणी

कौसर खान ।लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : तालुक्यातील सिरोंचा-अहेरी या मार्गाला जोडणाऱ्या टेकडा-कंबलपेठा या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून त्यात पावसाचे पाणी साचले आहे. टेकडा (ताला) परिसरातील शेकडो नागरिक याच मार्गाने सिरोंचा व अहेरी तालुका मुख्यालयी ये-जा करतात. मात्र वर्दळीच्या असलेल्या या मार्गाची पूर्णत: वाट लागल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत.टेकडाताला परिसर व आजूबाजूच्या गावातील अनेक लोक तहसील कार्यालय, बँक, शैक्षणिक तसेच आरोग्य सेवेच्या कामासाठी आणि विविध प्रकारच्या वस्तूंची खरेदी विक्री करण्यासाठी सिरोंचा तालुका मुख्यालय येत असतात. टेकडा या गावाशी गावखेड्यातील नागरिकांचा कुठल्या कोणत्याही कामामुळे संपर्क येत असतो. जाफ्राबाद येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असले तरी कर्मचाऱ्यांची कमतरता व सुविधांचा अभाव असल्याने सिरोंचा येथील ग्रामीण रुग्णालयात बरेच रुग्ण हलविले जातात. रुग्ण व प्रवाशी सुरळीत पोहोचण्यासाठी मार्ग चांगला असणे गरजेचे आहे. आधुनिक काळात दळणवळणाची सोय अत्यंत महत्त्वाची आहे. गावागावाला जोडणारे रस्ते पक्क्या स्वरूपाचे झाल्याशिवाय या भागाचा विकास शक्य नाही.टेकडा-कंबालपेठा हा मार्ग सिरोंचा ते अहेरी या ११५ क्रमांकाच्या राज्य महामार्गाला जोडणारा महामार्ग आहे. ओव्हरलोड वाहतुकीमुळे रस्त्यामध्ये अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहे. टेकडा येथून सिरोंचाला जाण्यासाठी नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. खड्ड्यात पाणी साचून राहत असल्यामुळे वाहनचालकाला खड्ड्याचा अंदाज येत नाही. परिणामी अपघाताची शक्यता वाढली आहे.मागील सात-आठ दिवसांपासून सिरोंचा तालुक्यात संततधार पाऊस होत आहे. त्यामुळे टेकडा ते कंबालपेठादरम्यान असलेल्या अटीवागू नाल्यावरील अर्धा पूल वाहून गेला आहे. त्यामुळे आवागमनास अडचण निर्माण झाली आहे. सदर पुलावरील स्लॅब वाहून गेल्याने या पुलाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचे स्पष्ट होत आहे. नागरिकांनी श्रमदान करून माती टाकून तात्पुरत्या स्वरूपात या पुलाची दुरूस्ती केली. यंत्रणेने सदर पुलाची व या पुलाला जोडणाºया टेकडा-कंबालपेठा मार्गाची पक्की दुरूस्ती करावी, अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे. 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाroad transportरस्ते वाहतूक