शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

कंबालपेठा मार्गाची लागली वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 05:00 IST

टेकडाताला परिसर व आजूबाजूच्या गावातील अनेक लोक तहसील कार्यालय, बँक, शैक्षणिक तसेच आरोग्य सेवेच्या कामासाठी आणि विविध प्रकारच्या वस्तूंची खरेदी विक्री करण्यासाठी सिरोंचा तालुका मुख्यालय येत असतात. टेकडा या गावाशी गावखेड्यातील नागरिकांचा कुठल्या कोणत्याही कामामुळे संपर्क येत असतो.

ठळक मुद्देवाहनधारक हैराण : खड्डेमय मार्गाच्या पक्क्या दुरूस्तीची मागणी

कौसर खान ।लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : तालुक्यातील सिरोंचा-अहेरी या मार्गाला जोडणाऱ्या टेकडा-कंबलपेठा या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून त्यात पावसाचे पाणी साचले आहे. टेकडा (ताला) परिसरातील शेकडो नागरिक याच मार्गाने सिरोंचा व अहेरी तालुका मुख्यालयी ये-जा करतात. मात्र वर्दळीच्या असलेल्या या मार्गाची पूर्णत: वाट लागल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत.टेकडाताला परिसर व आजूबाजूच्या गावातील अनेक लोक तहसील कार्यालय, बँक, शैक्षणिक तसेच आरोग्य सेवेच्या कामासाठी आणि विविध प्रकारच्या वस्तूंची खरेदी विक्री करण्यासाठी सिरोंचा तालुका मुख्यालय येत असतात. टेकडा या गावाशी गावखेड्यातील नागरिकांचा कुठल्या कोणत्याही कामामुळे संपर्क येत असतो. जाफ्राबाद येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असले तरी कर्मचाऱ्यांची कमतरता व सुविधांचा अभाव असल्याने सिरोंचा येथील ग्रामीण रुग्णालयात बरेच रुग्ण हलविले जातात. रुग्ण व प्रवाशी सुरळीत पोहोचण्यासाठी मार्ग चांगला असणे गरजेचे आहे. आधुनिक काळात दळणवळणाची सोय अत्यंत महत्त्वाची आहे. गावागावाला जोडणारे रस्ते पक्क्या स्वरूपाचे झाल्याशिवाय या भागाचा विकास शक्य नाही.टेकडा-कंबालपेठा हा मार्ग सिरोंचा ते अहेरी या ११५ क्रमांकाच्या राज्य महामार्गाला जोडणारा महामार्ग आहे. ओव्हरलोड वाहतुकीमुळे रस्त्यामध्ये अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहे. टेकडा येथून सिरोंचाला जाण्यासाठी नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. खड्ड्यात पाणी साचून राहत असल्यामुळे वाहनचालकाला खड्ड्याचा अंदाज येत नाही. परिणामी अपघाताची शक्यता वाढली आहे.मागील सात-आठ दिवसांपासून सिरोंचा तालुक्यात संततधार पाऊस होत आहे. त्यामुळे टेकडा ते कंबालपेठादरम्यान असलेल्या अटीवागू नाल्यावरील अर्धा पूल वाहून गेला आहे. त्यामुळे आवागमनास अडचण निर्माण झाली आहे. सदर पुलावरील स्लॅब वाहून गेल्याने या पुलाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचे स्पष्ट होत आहे. नागरिकांनी श्रमदान करून माती टाकून तात्पुरत्या स्वरूपात या पुलाची दुरूस्ती केली. यंत्रणेने सदर पुलाची व या पुलाला जोडणाºया टेकडा-कंबालपेठा मार्गाची पक्की दुरूस्ती करावी, अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे. 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाroad transportरस्ते वाहतूक