शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
2
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
3
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
4
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
5
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
6
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
7
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
8
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
9
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
10
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
11
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
12
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
13
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
14
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
15
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
16
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
17
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
18
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
19
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त

पोलीस पाटलांच्या रिक्त पदाचा अनुशेष कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 06:00 IST

गडचिरोली जिल्ह्याच्या १२ तालुक्यात सहा महसुली उपविभाग असून प्रत्येक उपविभागात दोन तालुक्यांचा समावेश आहे. प्रत्येक गावात एक पोलीस पाटील असावा, असे शासनाचे धोरण आहे. या धोरणानुसार गडचिरोली जिल्ह्यात पोलीस पाटलांची एकूण १ हजार ५१४ पदे रिक्त आहेत. यापैकी ९०० वर पदे भरण्यात आली असून गेल्या अनेक महिन्यांपासून जवळपास ३०० पेक्षा अधिक पदे रिक्त आहेत.

ठळक मुद्दे३०० वर पदे रिक्त : अत्यल्प मानधनामुळे उमेदवार तयार होईना

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पोलीस प्रशासन व जनतेमधील महत्त्वाचा दुवा समजल्या जाणाऱ्या पोलीस पाटलांच्या रिक्त पदांचा अनुशेष गडचिरोली जिल्ह्यात अद्यापही कायम आहे. नक्षली दहशत, संवेदनशील भाग व अत्यल्प मानधन या साºया कारणांमुळे गडचिरोली जिल्ह्यात पोलीस पाटलांची ३०० वर पदे रिक्त आहे. परिणामी शेकडो गावांचा कारभार पोलीस पाटलाविनाच सुरू आहे.गडचिरोली जिल्ह्याच्या १२ तालुक्यात सहा महसुली उपविभाग असून प्रत्येक उपविभागात दोन तालुक्यांचा समावेश आहे. प्रत्येक गावात एक पोलीस पाटील असावा, असे शासनाचे धोरण आहे. या धोरणानुसार गडचिरोली जिल्ह्यात पोलीस पाटलांची एकूण १ हजार ५१४ पदे रिक्त आहेत. यापैकी ९०० वर पदे भरण्यात आली असून गेल्या अनेक महिन्यांपासून जवळपास ३०० पेक्षा अधिक पदे रिक्त आहेत.गावातील शांतता व सुव्यवस्था टिकविण्यासोबतच गावातील तंटे गावातच मिटविण्याच्या कामातही पोलीस पाटील महत्त्वपूर्ण भूमिका बजावित असते. गावात घडलेल्या कुठल्याही गुन्ह्याची तसेच घटनांची माहिती पोलीस प्रशासनाला पोलीस पाटलांमार्फत दिली जाते. पोलीस ठाणे, पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा शांतता व सुव्यवस्थेबाबत पोलीस पाटलांशी नेहमीच संवाद असतो. याशिवाय अवैध धंद्यावर आळा घालण्यासाठी पोलीस पाटील पोलीस प्रशासनाला नेहमी मदत करीत असतो. सार्वत्रिक निवडणुकीच्या कामातील सुव्यवस्था सांभाळण्याच्या कामातही पोलीस पाटील योगदान देत असतो. त्यामुळे गावात पोलीस पाटलाचे पद अतिशय महत्त्वपूर्ण आहे.पोलीस पाटलांना मार्च २०१९ पर्यंत तीन हजार रुपये मानधन मिळत होते. त्यांच्या मागणीची दखल घेऊन सरकारने एप्रिल २०१९ पासून ६ हजार ५०० रुपये मानधन केले. त्यामुळे आता दुर्गम भागातील पोलीस पाटलांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र मानधन नियमित दिले जात नसल्याची ओरड आहे.एका पोलीस पाटलावर अनेक गावांचा भारगडचिरोली, चामोर्शी, देसाईगंज हे तीन तालुके शहरी भागालगत आहेत. तर इतर नऊ तालुके नक्षलप्रभावित, अतिदुर्गम भागात मोडतात. पोलीस पाटील पदासाठी इयत्ता दहावी उत्तीर्ण उमेदवार मिळणे आवश्यक आहे. मात्र कुरखेडा, अहेरी, एटापल्ली या तीन उपविभागात नक्षली दहशत, अत्यल्प मानधनामुळे या पदासाठी उमेदवार अर्ज भरण्यास तयार होत नाही.प्रशासनाच्या वतीने दरवर्षी या पदासाठी भरती प्रक्रिया राबविली जाते. मात्र उमेदवार तयार होत नसल्याने पोलीस पाटलांच्या रिक्त पदांचा अनुशेष कायम राहतो. पोलीस पाटलांच्या अनेक मागण्यासंदर्भात संघटनेच्या वतीने शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला. मानधनवाढ ही एकमेव मागणी मान्य करण्यात आली. मात्र इतर सोयीसुविधाबाबत निर्णय झाला नाही.

टॅग्स :Policeपोलिस