लोकमत न्यूज नेटवर्कमोहटोला(किन्हाळा) : सर्वत्र कोरोनाची दहशत आहे. संसर्गाद्वारे पसरणारा हा आजार असला तरी आतापर्यंत ग्रामीण भाग यापासून दूर आहे. परंतु एकमेकांच्या संपर्कात आल्यास हा रोग होण्याची शक्यता आहे. या विषाणूपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी उपाययोजना कराव्या तसेच शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, अशी जागृती देसाईगंजचे संवर्ग विकास अधिकारी श्रावण सलाम गावभेटीद्वारे करीत आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेक गावांना भेटी दिल्या आहेत.ग्रामीण भागातील नागरिकांच्या मनातील भीती दूर व्हावी तसेच गरीब व गरजूंना मदत व्हावी यासाठी बीडीओ सलाम यांनी ‘शासन आपल्या सोबत’ हा जाणिव जागृतीसाठी उपक्रम सुरू केलेला आहे. या माध्यमातून ते आपल्या पथकासह अनेक गावांना भेटी देत आहेत. विशेष म्हणजे सुटीच्या दिवशी देखील आपले कर्तव्य पार पाडत आहेत.देसाईगंज तालुक्यातील अख्खा ग्रामीण भाग ते पिंजून काढत आहेत. त्यात निर्वासित शिबिरांना भेट देणे, त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करणे, गावातील सामाजिक कार्यकर्ते व दानशुरांना मदतीसाठी आवाहन करणे, नागरिकांना कोरोनापासून संरक्षण कसे करावे? याविषयीचे समुपदेशन करणे, संचारबंदीचा नियम न तोडण्याचे आवाहन करणे, पानवठ्यावर जमा होणाऱ्या महिलांनी तोंडावर मास्क किंवा रुमाल ठेवण्यास सांगणे, गाव निर्जंतुकीकरणासाठी सरपंचाना प्रेरीत करणे आदी कार्य बीडीओ सलाम व त्यांचे पथक करीत आहे.विशेष म्हणजे, श्रावण सलामे स्वत: पथकाचे नेतृत्व करीत आहेत. या पथकात गटशिक्षणाधिकारी डॉ. पीतांबर कोडापे, अधीक्षक पी. एस. सिडाम, यांत्रिकी प्रमुख एम. जी. बगमारे व गटसाधन केंद्राचे विषयसाधन व्यक्ती अरविंद घुटके यांचा समावेश आहे.मजुरांसाठी उपलब्ध केले वाहनडोंगरमेंढा येथे ३ एप्रिल रोजी काही मजूर भंडारा जिल्ह्यातून स्वगावी आल्याचे कळले. तेव्हा सदर पथकाने मजुरांची भेट घेतली व होम क्वारंटाईन करण्याबाबत सूचित केले. यातील पाच मजूर आरमोरी तालुक्यातील कोरेगावचे आढळले. त्यांचेही समुपदेशन यावेळी करण्यात आले. सोबतच भिवापूरपासून पायी चालत आलेल्या कोकडी येथील मजुरांना देसाईगंजपासून कोकडी गावापर्यंत जाण्यासाठी वाहन उपलब्ध करुन देण्यात आले.
गावभेटीद्वारे नागरिकांमध्ये होत आहे जागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2020 05:01 IST
ग्रामीण भागातील नागरिकांच्या मनातील भीती दूर व्हावी तसेच गरीब व गरजूंना मदत व्हावी यासाठी बीडीओ सलाम यांनी ‘शासन आपल्या सोबत’ हा जाणिव जागृतीसाठी उपक्रम सुरू केलेला आहे. या माध्यमातून ते आपल्या पथकासह अनेक गावांना भेटी देत आहेत. विशेष म्हणजे सुटीच्या दिवशी देखील आपले कर्तव्य पार पाडत आहेत.
गावभेटीद्वारे नागरिकांमध्ये होत आहे जागृती
ठळक मुद्देदेसाईगंजच्या बीडीओंचा पुढाकार । ‘शासन आपल्या सोबत’ उपक्रम ठरतोय आदर्श