शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
2
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
3
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
4
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
5
लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
7
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
8
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
9
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
10
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
11
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
12
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
13
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
15
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
16
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
17
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
18
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
19
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
20
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा

मातृवंदना योजनेची जनजागृती रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 06:00 IST

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत शंभरकर यांनी योजनेबाबत सविस्तर माहिती दिली. ही योजना तळागाळातील सर्व मातांपर्यंत पोहोचविण्यासाठी आरोग्य यंत्रणा प्रयत्न करीत आहे, असे मार्गदर्शन केले. आशा स्वयंसेविका घरोघरी जाऊन लाभार्थ्यांचे अर्ज भरून घेणार आहेत, असे सांगितले. प्रास्ताविकादरम्यान डॉ. सुनील मडावी यांनी प्रधानमंत्री मातृवंदना योजना गडचिरोलीसारख्या मागासवर्गीय जिल्ह्यातील मातांसाठी वरदान ठरणारी आहे.

ठळक मुद्देमहिला बाल रूग्णालयातून सुरूवात : २ ते ८ डिसेंबर या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गरोदर माता व नवजात बालकाचे संगोपण व्हावे, यासाठी प्रधानमंत्री मातृवंदना योजनेंतर्गत पाच हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. या योजनेची जनजागृती करण्यासाठी महिला व बाल रूग्णालयातून २ डिसेंबर रोजी जनजागृती रॅली काढण्यात आली. २ ते ८ डिसेंबर या कालावधीत विविध कार्यक्रम राबवून जनजागृती केली जाणार आहे.महिला रूग्णालयात आयोजित कार्यक्रमाला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रूडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत शंभरकर, महिला व बाल रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीपचंद सोयाम, जिल्हा माता व बाल संगोपण अधिकारी डॉ.सुनील मडावी, निवासी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बागराज धुर्वे, डॉ. राऊत, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. अनुपम महेशगौरी आदी मान्यवर उपस्थित होते.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रूडे यांनी मार्गदर्शन करताना ज्या मातांची प्रसुती होऊन सुध्दा प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा लाभ मिळाला नाही, अशा मातांना प्रसुतीनंतर ४६० दिवसापर्यंत लाभ देता येतो, असे मार्गदर्शन केले.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत शंभरकर यांनी योजनेबाबत सविस्तर माहिती दिली. ही योजना तळागाळातील सर्व मातांपर्यंत पोहोचविण्यासाठी आरोग्य यंत्रणा प्रयत्न करीत आहे, असे मार्गदर्शन केले. आशा स्वयंसेविका घरोघरी जाऊन लाभार्थ्यांचे अर्ज भरून घेणार आहेत, असे सांगितले. प्रास्ताविकादरम्यान डॉ. सुनील मडावी यांनी प्रधानमंत्री मातृवंदना योजना गडचिरोलीसारख्या मागासवर्गीय जिल्ह्यातील मातांसाठी वरदान ठरणारी आहे. जास्तीत जास्त महिलांपर्यंत ही योजना पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. ‘सुरक्षित जननी विकसीत धारणी’ अशा घोषणा देत महिला व बाल रूग्णालयातून रॅली काढण्यात आली. प्रास्ताविक डॉ. सुनील मडावी, संचालन रचना फुलझले, तर आभार आरोग्य सहायक आनंद मोडक यांनी मानले.पाच हजार रुपयांचा मिळतो लाभगरोदरपणात व प्रसुतीनंतर योग्य औषधोपचार, पोषण आहार उपलब्ध व्हावा, या उद्देशाने केंद्र शासनाने १ सप्टेंबर २०१७ रोजी ही योजना सुरू केली. या योजनेंतर्गत शासकीय आरोग्य संस्थेतील एएनएमकडे मासिक पाळी सुटल्यानंतर १०० दिवसांच्या आत नोंदणी केल्यानंतर हजार रुपये अनुदान बँक खात्यात टाकले जाते. गरोदरपणाच्या सहा महिन्यात किमान एक प्रसुतीपूर्वी तपासणी केली असल्यास दोन हजार रुपयांचा लाभ दिला जातो. प्रसुतीनंतर प्रसुतीनंतर बाळाची नोंद व बाळाची १४ आठवड्यापर्यंतचे लसीकरण पूर्ण झाल्यानंतर दोन हजार रुपये अनुदान असे एकूण पाच हजार रुपये अनुदान दिले जाते. विशेष म्हणजे, पहिल्या प्रसुतीवेळी अनुदान मिळते.

टॅग्स :Healthआरोग्य