शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
2
‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा
3
युरोपियन युनियनचे नेते बल्गेरियावरून जात होते, रशियाने विमानाचे रडारच जाम करून टाकले...
4
अंबानी कुटुंबाने घेतला मोठा निर्णय; वाढत्या तणावादरम्यान विशेष कार्यक्रम पुढे ढकलला !
5
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: मराठा आंदोलन: मुंबई हायकोर्टातील आजचे कामकाज संपले; उद्या दुपारी ३ वाजता पुन्हा सुनावणी
6
ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांनी मुंबईत विकले २ फ्लॅट; 'एवढ्या' कोटींमध्ये झाला व्यवहार, बाजारभावापेक्षा दुप्पट नफा
7
हैदराबाद गॅझेट लागू करण्याबाबत मसुदा तयार, पण...; राधाकृष्ण विखे पाटील यांची महत्त्वाची माहिती
8
सेंट झेवियर्स कॉलेजच्या ‘मल्हार’ फेस्टिव्हलमध्ये तरुणाईचा कल्ला; 'या' टीमने मारली बाजी
9
गिलमुळे 'तळ्यात-मळ्यात' असलेल्या संजूचा 'फिफ्टी प्लस'चा चौकार! दावेदारी भक्कम केलीये खरी, पण...
10
AIने हे काय केलं, मुलाच्या हातून आईला संपवलं! नेमकं प्रकरण काय? जाणून बसेल धक्का
11
Maratha Morcha : मुख्यमंत्री साहेब, तुमच्या हातातली वेळ गेलेली नाही, महाराष्ट्र मुंबईत यायला निघण्याआधी निर्णय घ्या; मनोज जरांगेंचा इशारा
12
बिजुरिया बिजुरिया! सोनू निगमसोबत वरुण धवनचा जबरदस्त डान्स, अभिनेता म्हणाला...
13
वहिनीचा दीरावर जडला जीव; रात्री पतीला एका खोलीत कोंडून 'ती' दिराच्या खोलीत गेली अन्...
14
तुम्हीही तुमच्या पगारवाढीचा हिशोब लावताय? वेतनवाढ कशी ठरते? संपूर्ण गणित सोप्या भाषेत समजून घ्या
15
Manoj Jarange Patil: "माझ्या पोरांवर दादागिरी करायची नाही, एकालाही काठी लावली तर मुंबईसह महाराष्ट्र बंद करू"
16
चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांची आवडती कार, मोदींनीही केली सफर! 'लाल झेंडा' असलेल्या 'या' गाडीत खास काय?
17
भारतात रस्ते अपघातात दर तासाला २० जणांचा मृत्यू, अहवालातून समोर आली धक्कादायक माहिती
18
GST कमी झाल्यास, किती स्वस्त होऊ शकते मोस्ट-सेलिंग Maruti Ertiga? किती रुपयांचा होऊ शकतो फायदा? जाणून घ्या
19
'आरक्षण बचाव'ची मागणी, मराठा आंदोलनाचे केंद्रबिंदू अंतरवाली सराटीत ओबीसींचे उपोषण
20
Mumbai Local: मराठा आंदोलनामुळे मुंबईची लाईफलाईन खोळंबली! सीएसएमटी स्टेशनवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त

नोकरीत रूजू करण्यास टाळाटाळ

By admin | Updated: March 4, 2017 01:19 IST

वनरक्षक भरतीत निवड होऊनही वन विभाग रूजू करून घेण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप निवड

आत्मदहनाचा इशारा : मागील तीन वर्षांपासून वन विभागाकडून दिरंगाई गडचिरोली : वनरक्षक भरतीत निवड होऊनही वन विभाग रूजू करून घेण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी पत्रकार परिषदेतून केला आहे. वन विभागाने नोकरीत रूजू करून घ्यावे, अन्यथा वन विभागाच्या कार्यालय परिसरात आत्मदहन करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी निवड झालेल्या युवकांनी केली आहे. देसाईगंज तालुक्यातील पोटगाव येथील विशाल शंकर दडमल हा २०१४-१५ च्या भरतीत पात्र ठरला. कुरखेडा तालुक्यातील उराडी येथील प्रकाश जनार्धन गरमळे हा २०१५-१६ च्या भरतीत पात्र ठरला. तर कुरखेडा तालुक्यातील सोनेरांगी येथील बबलू विजय वाघाडे व देविका अशोक गजबे हे डिसेंबर २०१६ मध्ये घेतलेल्या वनरक्षक पदाच्या भरतीत पात्र ठरले. शासनाच्या १२ डिसेंबर २०११ च्या शासन निर्णयानुसार ज्या उमेदवाराकडे जात वैधता प्रमाणपत्र नाही. अशा उमेदवाराला नियुक्ती दिली जाते. त्यानंतर तीन महिन्याने सदर उमेदवाराने जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर केल्याची पोचपावती द्यावी लागते. या नियमानुसारच महाराष्ट्रात सर्वत्र तसेच गडचिरोली जिल्ह्यात पोलीस विभाग, जिल्हा परिषद व इतर विभागाच्या मार्फतीने नोकरीसाठी नियुक्ती दिली जात आहे. मात्र या चार युवकांना वन विभाग नियुक्ती देण्यास टाळाटाळ करीत आहे. तीन वर्षापासून निवड होऊनही नियुक्ती न मिळाल्याने युवक कमालीचे त्रस्त झाले आहेत. नियुक्ती देण्याबाबत अनेकवेळा मुख्य वनसंरक्षकांना निवेदन देण्यात आले. मात्र नियुक्ती देण्यास त्यांच्याकडून टाळाटाळ होत आहे. त्यामुळे सदर युवक मानसिकदृष्ट्या खचले आहेत. त्यामुळे त्यांना वन विभागाने नियुक्ती द्यावी किंवा त्यांना आत्मदहन करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी आदिवासी माना विद्यार्थी युवा संघटनेचे प्रा. राजू केदार यांनी केली आहे. पत्रकार परिषदेला अन्यायग्रस्त युवकही उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)