शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकाल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
3
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
5
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
6
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
7
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
8
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
9
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
10
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
11
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
12
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
13
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
14
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
15
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
16
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
17
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
18
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
19
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
20
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार

नोकरीत रूजू करण्यास टाळाटाळ

By admin | Updated: March 4, 2017 01:19 IST

वनरक्षक भरतीत निवड होऊनही वन विभाग रूजू करून घेण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप निवड

आत्मदहनाचा इशारा : मागील तीन वर्षांपासून वन विभागाकडून दिरंगाई गडचिरोली : वनरक्षक भरतीत निवड होऊनही वन विभाग रूजू करून घेण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी पत्रकार परिषदेतून केला आहे. वन विभागाने नोकरीत रूजू करून घ्यावे, अन्यथा वन विभागाच्या कार्यालय परिसरात आत्मदहन करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी निवड झालेल्या युवकांनी केली आहे. देसाईगंज तालुक्यातील पोटगाव येथील विशाल शंकर दडमल हा २०१४-१५ च्या भरतीत पात्र ठरला. कुरखेडा तालुक्यातील उराडी येथील प्रकाश जनार्धन गरमळे हा २०१५-१६ च्या भरतीत पात्र ठरला. तर कुरखेडा तालुक्यातील सोनेरांगी येथील बबलू विजय वाघाडे व देविका अशोक गजबे हे डिसेंबर २०१६ मध्ये घेतलेल्या वनरक्षक पदाच्या भरतीत पात्र ठरले. शासनाच्या १२ डिसेंबर २०११ च्या शासन निर्णयानुसार ज्या उमेदवाराकडे जात वैधता प्रमाणपत्र नाही. अशा उमेदवाराला नियुक्ती दिली जाते. त्यानंतर तीन महिन्याने सदर उमेदवाराने जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर केल्याची पोचपावती द्यावी लागते. या नियमानुसारच महाराष्ट्रात सर्वत्र तसेच गडचिरोली जिल्ह्यात पोलीस विभाग, जिल्हा परिषद व इतर विभागाच्या मार्फतीने नोकरीसाठी नियुक्ती दिली जात आहे. मात्र या चार युवकांना वन विभाग नियुक्ती देण्यास टाळाटाळ करीत आहे. तीन वर्षापासून निवड होऊनही नियुक्ती न मिळाल्याने युवक कमालीचे त्रस्त झाले आहेत. नियुक्ती देण्याबाबत अनेकवेळा मुख्य वनसंरक्षकांना निवेदन देण्यात आले. मात्र नियुक्ती देण्यास त्यांच्याकडून टाळाटाळ होत आहे. त्यामुळे सदर युवक मानसिकदृष्ट्या खचले आहेत. त्यामुळे त्यांना वन विभागाने नियुक्ती द्यावी किंवा त्यांना आत्मदहन करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी आदिवासी माना विद्यार्थी युवा संघटनेचे प्रा. राजू केदार यांनी केली आहे. पत्रकार परिषदेला अन्यायग्रस्त युवकही उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)