शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
3
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'त्या' मरकजला केले जमीनदोस्त
4
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
5
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
6
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
7
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
8
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
9
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
10
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
11
Operation Sindoor : "आता पाकिस्तानला वेदनांची जाणीव झाली असेल, ऑपरेशन सिंदूरचा संपूर्ण देशाला अभिमान"
12
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
13
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
14
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव
15
पोलिसाच्या वर्दीत पाहून लेकाची काय होती प्रतिक्रिया? अंकुश चौधरी म्हणाला, "त्याने भलतीच मागणी..."
16
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
17
वर्धा: विवाहित महिला आणि पुरुषाचे प्रेमसंबंध, शेतातील विहिरीत सापडले दोघांचे मृतदेह
18
'या' व्यक्तीच्या पगारापुढे मस्क-जेफ बेझोस यांचा पगार काहीच नाही; कमाईच्या बाबतीत सर्वांना टाकलं मागे
19
"किती नुकसान झालं, किती दहशतवादी मारले गेले हे समजलं असतं तर…’’, काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांचं मोठं विधान
20
हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानला आणखी एक दणका; भारतीय सैन्याने नीलम-झेलम धरण उडवले

नोकरीत रूजू करण्यास टाळाटाळ

By admin | Updated: March 4, 2017 01:19 IST

वनरक्षक भरतीत निवड होऊनही वन विभाग रूजू करून घेण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप निवड

आत्मदहनाचा इशारा : मागील तीन वर्षांपासून वन विभागाकडून दिरंगाई गडचिरोली : वनरक्षक भरतीत निवड होऊनही वन विभाग रूजू करून घेण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी पत्रकार परिषदेतून केला आहे. वन विभागाने नोकरीत रूजू करून घ्यावे, अन्यथा वन विभागाच्या कार्यालय परिसरात आत्मदहन करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी निवड झालेल्या युवकांनी केली आहे. देसाईगंज तालुक्यातील पोटगाव येथील विशाल शंकर दडमल हा २०१४-१५ च्या भरतीत पात्र ठरला. कुरखेडा तालुक्यातील उराडी येथील प्रकाश जनार्धन गरमळे हा २०१५-१६ च्या भरतीत पात्र ठरला. तर कुरखेडा तालुक्यातील सोनेरांगी येथील बबलू विजय वाघाडे व देविका अशोक गजबे हे डिसेंबर २०१६ मध्ये घेतलेल्या वनरक्षक पदाच्या भरतीत पात्र ठरले. शासनाच्या १२ डिसेंबर २०११ च्या शासन निर्णयानुसार ज्या उमेदवाराकडे जात वैधता प्रमाणपत्र नाही. अशा उमेदवाराला नियुक्ती दिली जाते. त्यानंतर तीन महिन्याने सदर उमेदवाराने जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर केल्याची पोचपावती द्यावी लागते. या नियमानुसारच महाराष्ट्रात सर्वत्र तसेच गडचिरोली जिल्ह्यात पोलीस विभाग, जिल्हा परिषद व इतर विभागाच्या मार्फतीने नोकरीसाठी नियुक्ती दिली जात आहे. मात्र या चार युवकांना वन विभाग नियुक्ती देण्यास टाळाटाळ करीत आहे. तीन वर्षापासून निवड होऊनही नियुक्ती न मिळाल्याने युवक कमालीचे त्रस्त झाले आहेत. नियुक्ती देण्याबाबत अनेकवेळा मुख्य वनसंरक्षकांना निवेदन देण्यात आले. मात्र नियुक्ती देण्यास त्यांच्याकडून टाळाटाळ होत आहे. त्यामुळे सदर युवक मानसिकदृष्ट्या खचले आहेत. त्यामुळे त्यांना वन विभागाने नियुक्ती द्यावी किंवा त्यांना आत्मदहन करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी आदिवासी माना विद्यार्थी युवा संघटनेचे प्रा. राजू केदार यांनी केली आहे. पत्रकार परिषदेला अन्यायग्रस्त युवकही उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)