शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरण विभागाच्या मंजुरीत अडकला 57 रेतीघाटांचा लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2022 05:00 IST

पर्यावरण विभागाची मंजुरी न घेता हे घाट लिलावात काढलेच कसे, असा प्रश्न करत एक जनहित याचिका चामोर्शी येथील पराग आईंचवार यांनी उच्च न्यायालयात दाखल केली. यासोबत इतरही जिल्ह्यांमधून अशा याचिका दाखल झाल्या आहेत. त्यावरील सुनावणी बाकी असल्यामुळे राज्य शासनाने सर्वच जिल्ह्यांमधील रेतीघाटांच्या लिलाव प्रक्रियेला स्थगिती दिल्याची माहिती आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मोठ्या नद्यांची आणि चांगल्या प्रतिच्या रेतीची देण लाभलेल्या या जिल्ह्यात रेतीघाटांच्या लिलावातून मिळणाऱ्या महसुलाला मात्र काही वर्षात ग्रहण लागले आहे. यावर्षीही तयार असलेल्या ५७ घाटांच्या लिलावाला ऐनवेळी स्थगिती देण्यात आली. त्यामुळे २१ कोटींपेक्षा जास्त महसुलाची आस लावून बसलेल्या प्रशासनाला चांगलाच झटका बसला आहे.पर्यावरण विभागाची मंजुरी न घेता हे घाट लिलावात काढलेच कसे, असा प्रश्न करत एक जनहित याचिका चामोर्शी येथील पराग आईंचवार यांनी उच्च न्यायालयात दाखल केली. यासोबत इतरही जिल्ह्यांमधून अशा याचिका दाखल झाल्या आहेत. त्यावरील सुनावणी बाकी असल्यामुळे राज्य शासनाने सर्वच जिल्ह्यांमधील रेतीघाटांच्या लिलाव प्रक्रियेला स्थगिती दिल्याची माहिती आहे.विशेष म्हणजे यावर्षी नव्याने लिलाव करण्यासाठी ५७ रेतीघाटांना आयुक्तांकडून मंजुरी मिळाली होती. त्या घाटांना पर्यावरण विभागाने मंजुरी द्यावी यासाठी आधीच प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. मात्र त्यांच्याकडून त्या प्रस्तावाची अद्याप दखल घेण्यात आलेली नाही. दरम्यान, २८ जानेवारी २०२२ च्या शासकीय पत्रानुसार घाटांचा लिलाव आधी करा, त्यानंतर पर्यावरण विभागाची मंजुरी घ्या, अशी सूचना करण्यात आली. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने काही दिवसांपूर्वीच ५७ रेतीघाटांच्या लिलावासाठी निविदा काढली. गुरूवारी (दि.१०) ही निविदा उघडली जाणार होती. मात्र त्याआधीच ही लिलाव प्रक्रिया स्थगित करण्याची सूचना शासनाकडून प्राप्त झाली.गेल्या दाेन वर्षांपासून जिल्ह्यातील रेतीघाटांची लिलाव प्रक्रिया उशिरा हाेत असल्यामुळे त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे. 

यावर्षीच्या लिलावातून अवघा २.२८ कोटीचा महसूलगेल्यावर्षीच्या लिलावातून शिल्लक राहिलेल्या ११ रेतीघाटांसाठी आधीच लिलाव प्रक्रिया झाली. पहिल्या लिलावात त्या ११ पैकी ३ रेतीघाट गेले. त्यातून २ कोटी २८ लाखांचा महसूल जिल्हा प्रशासनाला मिळाला. पण त्यानंतर शिल्लक असलेल्या ६ कोटी किंमत असलेल्या ८ घाटांसाठी तीन वेळा निविदा प्रक्रिया राबवूनही कोणी रेतीघाट घेण्यासाठी पुढे आले नाही. त्या घाटांची मुदत येत्या ३१ मे रोजी संपणार असल्यामुळे अपेक्षित प्रतिसाद मिळू शकला नाही.

 

टॅग्स :sandवाळू