शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
2
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
3
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
4
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
5
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
6
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
8
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
9
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
10
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
11
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
12
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
13
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
14
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
15
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
16
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
17
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
18
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
19
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
20
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

पर्यावरण विभागाच्या मंजुरीत अडकला 57 रेतीघाटांचा लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2022 05:00 IST

पर्यावरण विभागाची मंजुरी न घेता हे घाट लिलावात काढलेच कसे, असा प्रश्न करत एक जनहित याचिका चामोर्शी येथील पराग आईंचवार यांनी उच्च न्यायालयात दाखल केली. यासोबत इतरही जिल्ह्यांमधून अशा याचिका दाखल झाल्या आहेत. त्यावरील सुनावणी बाकी असल्यामुळे राज्य शासनाने सर्वच जिल्ह्यांमधील रेतीघाटांच्या लिलाव प्रक्रियेला स्थगिती दिल्याची माहिती आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मोठ्या नद्यांची आणि चांगल्या प्रतिच्या रेतीची देण लाभलेल्या या जिल्ह्यात रेतीघाटांच्या लिलावातून मिळणाऱ्या महसुलाला मात्र काही वर्षात ग्रहण लागले आहे. यावर्षीही तयार असलेल्या ५७ घाटांच्या लिलावाला ऐनवेळी स्थगिती देण्यात आली. त्यामुळे २१ कोटींपेक्षा जास्त महसुलाची आस लावून बसलेल्या प्रशासनाला चांगलाच झटका बसला आहे.पर्यावरण विभागाची मंजुरी न घेता हे घाट लिलावात काढलेच कसे, असा प्रश्न करत एक जनहित याचिका चामोर्शी येथील पराग आईंचवार यांनी उच्च न्यायालयात दाखल केली. यासोबत इतरही जिल्ह्यांमधून अशा याचिका दाखल झाल्या आहेत. त्यावरील सुनावणी बाकी असल्यामुळे राज्य शासनाने सर्वच जिल्ह्यांमधील रेतीघाटांच्या लिलाव प्रक्रियेला स्थगिती दिल्याची माहिती आहे.विशेष म्हणजे यावर्षी नव्याने लिलाव करण्यासाठी ५७ रेतीघाटांना आयुक्तांकडून मंजुरी मिळाली होती. त्या घाटांना पर्यावरण विभागाने मंजुरी द्यावी यासाठी आधीच प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. मात्र त्यांच्याकडून त्या प्रस्तावाची अद्याप दखल घेण्यात आलेली नाही. दरम्यान, २८ जानेवारी २०२२ च्या शासकीय पत्रानुसार घाटांचा लिलाव आधी करा, त्यानंतर पर्यावरण विभागाची मंजुरी घ्या, अशी सूचना करण्यात आली. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने काही दिवसांपूर्वीच ५७ रेतीघाटांच्या लिलावासाठी निविदा काढली. गुरूवारी (दि.१०) ही निविदा उघडली जाणार होती. मात्र त्याआधीच ही लिलाव प्रक्रिया स्थगित करण्याची सूचना शासनाकडून प्राप्त झाली.गेल्या दाेन वर्षांपासून जिल्ह्यातील रेतीघाटांची लिलाव प्रक्रिया उशिरा हाेत असल्यामुळे त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे. 

यावर्षीच्या लिलावातून अवघा २.२८ कोटीचा महसूलगेल्यावर्षीच्या लिलावातून शिल्लक राहिलेल्या ११ रेतीघाटांसाठी आधीच लिलाव प्रक्रिया झाली. पहिल्या लिलावात त्या ११ पैकी ३ रेतीघाट गेले. त्यातून २ कोटी २८ लाखांचा महसूल जिल्हा प्रशासनाला मिळाला. पण त्यानंतर शिल्लक असलेल्या ६ कोटी किंमत असलेल्या ८ घाटांसाठी तीन वेळा निविदा प्रक्रिया राबवूनही कोणी रेतीघाट घेण्यासाठी पुढे आले नाही. त्या घाटांची मुदत येत्या ३१ मे रोजी संपणार असल्यामुळे अपेक्षित प्रतिसाद मिळू शकला नाही.

 

टॅग्स :sandवाळू