शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
4
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
5
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
6
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?
7
खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला
8
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...
9
वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजीनंतर आता गोलंदाजीत कमाल! युवा टीम इंडियाकडून कसोटीत रचला इतिहास
10
"नाव घ्यायला भीती वाटते तर बोलू नका" ; आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियन गॅँगचा उल्लेख करताच राणे संतापले
11
घरभाडं, वीजबिल भरायला पैसे नव्हते, राष्ट्रीय खेळाडू बनले चोर, व्यापाऱ्याचं अपहरण करून लुटले, त्यानंतर... 
12
भाचाच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
13
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
14
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
15
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी
16
Viral Video: चक्क माणसासारखं दोन पायावर उभा राहिला बिबट्या; स्वत: बघितल्याशिवाय विश्वास बसणार नाही!
17
"राज ठाकरे मराठीच्या नावावर द्वेष पसरवतात, त्यांच्यावर रासुका लावा’’, मुंबई हायकोर्टातील वकिलांची मागणी  
18
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'
19
मुंबई-पुण्यात घरं घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज! मालमत्ता विक्रीत ३०% घट; 'या' कारणामुळे किमती खाली येणार!
20
भयंकर! कर्ज फेडण्यासाठी, विम्याचे २ कोटी हडपण्यासाठी मित्राची केली हत्या, जिवंत जाळलं अन्...

आश्वासन दिले मात्र प्राेत्साहन अनुदानाचा पत्ता नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:37 IST

गडचिराेली : नियमित पीक कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्राेत्साहन अनुदान देण्याची घाेषणा राज्य शासनाने मागील वर्षीच्या अंदाजपत्रकादरम्यान ...

गडचिराेली : नियमित पीक कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्राेत्साहन अनुदान देण्याची घाेषणा राज्य शासनाने मागील वर्षीच्या अंदाजपत्रकादरम्यान केली; मात्र वर्ष उलटूनही जिल्ह्यातील एकाही शेतकऱ्याला प्राेत्साहन अनुदान दिले नाही. शासनाने दिलेला शब्द पाळला नाही, अशी भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.

मागील वर्षी राज्य शासनाने थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यासाठी महात्मा जाेतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती याेजना सुरू केली हाेती. या याेजनेंतर्गत थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले तर जे शेतकरी नियमित कर्ज भरत आहेत, त्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयापर्यंत प्राेत्साहन अनुदान देण्याची घाेषणा केली. मागील वर्षी लाॅकडाऊनमुळे शेतकऱ्यांचेही माेठे नुकसान झाले. तरीही प्राेत्साहन अनुदान मिळेल, या आशेने कर्जाचा भरणा केला. वर्षभराच्या कालावधीत थकीत शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले; मात्र जिल्ह्यातील एकाही शेतकऱ्याला प्राेत्साहन अनुदान दिले नाही. त्यामुळे नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. आपणही कर्ज थकीत ठेवले असते तर शासनाने माफ केले असते; मात्र नियमित कर्ज भरून गुन्हा केला काय, असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.

बाॅक्स...

१० हजार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती

भाजपचे सरकार असताना बहुतांश शेतकऱ्यांचे कर्ज राज्य शासनाने माफ केले हाेते. या याेजनेतून जे शेतकरी वगळण्यात आले, त्यांचे कर्ज मागील वर्षी माफ करण्यात आले. जिल्हाभरातील जवळपास १० हजार शेतकऱ्यांनी या याेजनेचा लाभ घेतला आहे. काही शेतकऱ्यांची कर्जमुक्ती नुकतीच झाली आहे. या शेतकऱ्यांना आता पुढचे कर्ज मिळणार आहे.

काेट....

मागील वर्षी लाॅकडाऊन असल्याने शेतकऱ्यांचे माेठे हाल झाले. शेतमाल विक्री करताना अडचणी निर्माण हाेत हाेत्या. तरीही पीक कर्जाचा भरणा वेळेवर केला. शासनाने नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्राेत्साहन अनुदान देण्याची घाेषणा केली. मात्र ही घाेषणा हवेतच विरली आहे. वर्षभराचा कालावधी उलटला मात्र अनुदान मिळाले नाही.

- शिवराम चहांदे, शेतकरी

काेट....

घेतलेले कर्ज बुडवायचे नाही, ही भावना मनात ठेवून मागील २० वर्षांपासून आपण कर्ज उचलून ३१ मार्चपूर्वी कर्जाचा भरणा करीत आहाेत. त्यामुळे एकाही कर्जमाफी याेजनेचा लाभ मिळाला नाही. शासनाने प्राेत्साहन अनुदान देण्याची घाेषणा केली. तेव्हा आपल्याला थाेडे पैसे मिळतील, अशी अपेक्षा हाेती. मात्र शासनाने एकही रुपया दिला नाही. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्याच्या ताेंडाला शासनाने पाने पुसली आहेत.

- दिनकर बारसागडे, शेतकरी

बाॅक्स...

४०,०००

नियमित कर्जफेड करणारे शेतकरी

....................................

०००००

प्राेत्साहन अनुदान मिळालेले शेतकरी