शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

लसीच्या जनजागृतीसाठी सहायक जिल्हाधिकारी पोहोचले दुर्गम गावात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:27 IST

धानोरा : कोरोनाच्या लसीकरणाबाबत तालुक्यातील अनेक गावांमध्ये असलेला गैरसमज दूर करण्यासाठी सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी आशिष येरेकर यांनी ...

धानोरा : कोरोनाच्या लसीकरणाबाबत तालुक्यातील अनेक गावांमध्ये असलेला गैरसमज दूर करण्यासाठी सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी आशिष येरेकर यांनी अतिदुर्गम पेंढरी परिसरातील मोहगाव येथे सभा घेऊन जनजागृती केली. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याने लसीकरण हा एकच उपाय असल्याचे सांगत त्यांनी गावकऱ्यांमध्ये असलेल्या शंकांचे निरसन केले.

येरेकर यांनी मोहगाव येथे त्या परिसरातील १५ गावांतील ग्रामसभा अध्यक्ष, सचिव यांची संयुक्त सभा घेतली. लसीकरणाबाबत असलेल्या गैरसमजामुळे आणि पसरलेल्या अफवांमुळे ग्रामीण नागरिकांमध्ये लसीबाबत शंका आहे. त्यामुळे आरोग्य विभागाला लसीकरणासाठी काही गावांमधून योग्य प्रतिसाद मिळत नव्हता. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने गावांपर्यंत पोहोचून ग्रामसभेच्या पदाधिकाऱ्यांमार्फत जागृती आणण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार या सभेमध्ये लसीकरणाबाबत मनात असलेले गैरसमज, शंका यांचे निरसन करण्यात आले. तिसऱ्या लाटेला रोखायचे असेल, तर सर्व नागरिकांनी लसीकरण करावे, असे आवाहन एसडीओ येरेकर यांनी केले.

यावेळी तहसीलदार सी. जी. पित्तुलवार, संवर्ग विकास अधिकारी बंडू निमसरकार, ग्रामसभांचे मार्गदर्शक देवाजी तोफा, धानोरा नगर पंचायतचे मुख्याधिकारी डॉ. नरेंद्र बेंबरे यांनीसुद्धा मार्गदर्शन केले. या सभेला डॉ. हिचामी, डॉ. बोगा, ग्रामसभा अध्यक्ष देवसाय आतला, बावसू पावे, श्रीनिवास दुलमवार, मोहगावचे उपसरपंच दिनेश टेकाम आदी प्रामुख्याने उपस्थित होते. सभेचे संचालन ग्रामसेवक जयंत मेश्राम यांनी केले.