शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणूक २०२५: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
2
'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
3
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
4
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
5
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
6
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
7
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
8
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
9
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
10
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
11
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
12
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
13
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
14
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
15
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
16
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
17
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
18
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
19
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
20
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा

जिल्ह्यात टरबूज लागवडीचे क्षेत्र वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 23:14 IST

गडचिरोली हा धान उत्पादक शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखले जात असले तरी काळाच्या ओघात जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी आता खरीप व रबी अशा दोनही हंगामात विविध पिकांचे उत्पादन घेण्यास सुरूवात केली आहे.

ठळक मुद्देकमी खर्चाची शेती : शेतकऱ्यांचा कल वाढला

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली हा धान उत्पादक शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखले जात असले तरी काळाच्या ओघात जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी आता खरीप व रबी अशा दोनही हंगामात विविध पिकांचे उत्पादन घेण्यास सुरूवात केली आहे. जिल्ह्याच्या विविध भागातील शेतजमीन व हवामान अनुकूल असल्याने यंदाच्या रबी हंगामात गडचिरोली, आरमोरी, धानोरा तालुक्यासह अहेरी उपविभागाच्या काही भागातील शेतकऱ्यांनी टरबूज पिकाची लागवड केली आहे. सध्या हे पीक डौलात आले आहे.१९८० च्या वन कायद्यामुळे जिल्ह्यातील मोठे व मध्यम सिंचन प्रकल्प रखडले आहेत. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागतो. मात्र गेल्या दोन वर्षांपासून शासनाच्या शेततळे, सिंचन विहीर व इतर योजनांमधून अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात सिंचनाच्या छोट्यामोठ्या सुविधा केल्या आहेत. या सिंचन सुविधांमुळे जिल्ह्यातील शेतकरी रबी हंगामात विविध प्रकारच्या भाजीपाल्याचे उत्पादन घेत असून अनेकांनी टरबुजाचीही लागवड केली आहे. नदी किनाऱ्या शेतजमिनीत ओलावा राहत असल्याने अशा जमिनीत टरबुजाची शेती फायदेशीर ठरते.