शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

आरमोरी व गडचिरोली तालुक्याला पावसाने झोडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 23:29 IST

मागील दीड महिन्यांपासून दरदिवशी पाऊस येत असल्याने नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. पाऊस थांबण्याची अपेक्षा करीत आहेत. सोमवारी दिवसभर आकाश स्वच्छ होते. त्यामुळे रात्री पाऊस येणार नाही, असा अंदाज होता. मात्र सोमवारी पहाटे ४ वाजेपासून पावसाला सुरूवात झाली.

ठळक मुद्देशेतीचे नुकसान : वार्षिक सरासरीच्या ९० टक्के पाऊस

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सोमवारी पहाटेच्या सुमारास गडचिरोली व आरमोरी तालुक्याला पावसाने झोडपून काढले. धानोरा, चामोर्शी, मुलचेरा, कुरखेडा तालुक्यातही दमदार पाऊस झाला. त्यामुळे नदी, नाले ओसंडून वाहू लागले. लहान पुलांवरून पाणी चढल्याने अनेक मार्ग ठप्प पडले होते.मागील दीड महिन्यांपासून दरदिवशी पाऊस येत असल्याने नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. पाऊस थांबण्याची अपेक्षा करीत आहेत. सोमवारी दिवसभर आकाश स्वच्छ होते. त्यामुळे रात्री पाऊस येणार नाही, असा अंदाज होता. मात्र सोमवारी पहाटे ४ वाजेपासून पावसाला सुरूवात झाली. गडचिरोली व आरमोरी तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाला. गडचिरोली तालुक्यात सुमारे ८२ मिमी तर आरमोरी तालुक्यात ८४ मिमी पाऊस झाला. धानोरा, चामोर्शी, मुलचेरा या तालुक्यांमध्ये सुध्दा ४० मिमी पेक्षा अधिक पाऊस पडला आहे.२ सप्टेंबरपर्यंत ११५१.८ मिमी पाऊस पडणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात १२२२.७ मिमी पाऊस झाला आहे. सर्वसाधारण पावसाच्या सुमारे १०६.२ मिमी पाऊस पडला आहे. जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत १३५४.७ मिमी पाऊस पडतो. आतापर्यंत ९० टक्के पाऊस झाला आहे. सप्टेंबर महिना संपण्यास २८ दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. पावसाचे प्रमाण असेच राहिल्यास यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सोमवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे नदी, नाल्यांना पूर परिस्थिती निर्माण झाली होती. पुराचे पाणी शेतात शिरले. वेगाने वाहणाऱ्या पाण्यामुळे अनेकांचे शेत खरडून गेले. तसेच रोवलेले धानपीक सुध्दा वाहून गेले. रोवणे आता संपले आहेत. त्यामुळे वाहून गेलेल्या रोवण्याच्या जागी पुन्हा रोवणे करणे अशक्य आहे. त्यामुळे तेवढी जागा पडीक राहणार आहे. दोन दिवस शेतातच राहिल्यास धानपीक सडण्याची शक्यता आहे.

 

टॅग्स :Rainपाऊस