शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

२६ ग्रामपंचायतीत आचारसंहिता लागू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 22:36 IST

येत्या नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात मुदत संपत असलेल्या जिल्ह्यातील २६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या १४ आॅक्टोबरला मतदान होणार आहे.

ठळक मुद्दे१४ आॅक्टोबरला मतदान : युवा उमेदवारांसाठी सातवी पासची अट

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : येत्या नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात मुदत संपत असलेल्या जिल्ह्यातील २६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या १४ आॅक्टोबरला मतदान होणार आहे. १६ आॅक्टोबरला निकाल जाहीर होऊन नागरिकांनी निवडलेले सरपंचही जाहीर होतील. त्यामुळे या निवडणुकीची उत्सुकता सर्वांना लागली आहे. संबंधित ग्रामपंचायतींमध्ये आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.यावेळी प्रथमच नागरिकांमधून सरपंचाची थेट निवड होणार आहे. त्यामुळे बहुमत कोणत्या गटाला मिळते यापेक्षा सरपंच कोणाचा होतो यावर राजकीय पक्ष आपले लक्ष केंद्रीत करणआर आहे. ही निवडणूक राजकीय पक्षांच्या चिन्हावर होत नसली तरी सर्व प्रमुख पक्ष आपल्याच गटाचा किंवा पक्षाचा सरपंच व्हावा यासाठी जोमाने निवडणुकीत उतरण्याची शक्यता आहे.वर्ष २०११ च्या जनगणनेचा आधार घेऊन नव्याने प्रभागरचना आणि आरक्षण करण्यात आले आहे. ५ जानेवारी २०१७ पर्यंतच्या मूळ मतदार यादीनंतर जुलै महिन्यात नोंदणी झालेल्या नवीन मतदारांचा समावेश करून सुधारित मतदार यादी तयार करण्यात आली आहे.जिल्ह्यात अहेरी तालुक्यातील किष्टापूर ग्रामपंचायतीचा कार्यक्रम आधीच जाहीर करण्यात आला आहे. आदिवासीबहुल जिल्हा असल्यामुळे बहुतांश जागा अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव आहेत. परंतू जात पडताळणी करण्याबाबत जागृतीच नसल्यामुळे लोक निवडणुकीत उभे राहण्यापासून वंचित राहतात. त्यासाठी शासन स्तरावर चर्चा करून जिल्ह्यात जात पडताळणी समितीचे विशेष शिबिर लावण्याची मागणी जोर धरत आहे.निवडणूक प्रक्रियेला नक्षलवाद्यांचा विरोध असला तरी अलिकडे हा विरोध काहीसा सौम्य झाला आहे. त्यामुळे निवडणूक लढविण्यासाठी अतिसंवेदनशिल भागातील नागरिक ही पुढे येण्याची शक्यता आहे. मात्र त्या भागात निवडणूक यंत्रणेने योग्य प्रकारे जनजागृती करावी अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.अवघ्या ४ ग्रा.पं.साठी दुसरा टप्पाराज्यभरात आॅक्टोबर ते फेब्रुवारी यादरम्यान मुदत संपणाºया ग्रामपंचायतींची निवडणूक दोन टप्प्यात होत आहे. निवडणूक यंत्रणेवर ताण येऊ नये म्हणून पहिल्या टप्प्यात डिसेंबरपर्यंत मुदत संपणाºया ग्रा.पं.च्या निवडणुका होत आहे. परंतू गडचिरोली जिल्ह्यात फेब्रुवारीपर्यंत केवळ ३१ ग्रा.पं.च्या निवडणूक लागणार आहे. या सर्व ठिकाणची निवडणूक एकाच टप्प्यात घेणे सहज शक्य होते. परंतू तसे न करता केवळ ४ ग्रामपंचायतींची निवडणूक दुसºया टप्प्यात होणार असल्यामुळे प्रशासकीय खर्च वाढणार आहे.रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीला खो२७ मे २०१७ रोजी झालेल्या ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीत ४३७ जागांवर कोणीच उमेदवार निवडणूक लढण्यासाठी पुढे आले नव्हते. त्या ठिकाणी तीन महिन्यानंतर पुन्हा निवडणूक कार्यक्रम लावता येतो. परंतू शासनाने जाहीर केलेल्या पहिल्या टप्प्यातील निवडणूक कार्यक्रमात रिक्त पदे असलेल्या ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीला ‘खो’ देण्यात आला आहे. त्यामुळे गावांच्या विकासाचा पाया असणाºया ग्रामपंचायतींमधील रिक्त पदांचे प्रशासन किंवा निवडणूक आयोगाला गांभिर्य नाही का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.अशी असेल पात्रतासदर निवडणूक लढवू इच्छिणारा उमेदवार जर १ जानेवारी १९९५ नंतर जन्मलेला असेल तर तो किमान सातवा वर्ग उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.ज्या ग्रामपंचायतमध्ये उमेदवार निवडणूक लढणार आहे त्या गावाच्या मतदार यादीत त्याचे नाव असणे गरजेचे आहे.इच्छुक उमेदवाराने वयाचे २१ वर्षे पूर्ण केलेले असावे.१२ सप्टेंबर २००१ नंतर २ पेक्षा अधिक अपत्यांचा जन्म झाला असल्यास ते उमेदवार अपात्र ठरणार आहेत.उमेदवाला जात आणि जात पडताळणी प्रमाणपत्र जोडावे लागणार आहे. नसल्यास त्यासाठी अर्ज केलेला असावा.इच्छुक उमेदवाराच्या घरी शौचालय असणे आवश्यक आहे.