शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
3
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
4
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
5
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
6
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
7
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
8
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
9
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
10
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
11
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
12
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
13
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
14
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
15
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
16
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
17
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
18
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
19
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
20
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!

२६ ग्रामपंचायतीत आचारसंहिता लागू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 22:36 IST

येत्या नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात मुदत संपत असलेल्या जिल्ह्यातील २६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या १४ आॅक्टोबरला मतदान होणार आहे.

ठळक मुद्दे१४ आॅक्टोबरला मतदान : युवा उमेदवारांसाठी सातवी पासची अट

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : येत्या नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात मुदत संपत असलेल्या जिल्ह्यातील २६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या १४ आॅक्टोबरला मतदान होणार आहे. १६ आॅक्टोबरला निकाल जाहीर होऊन नागरिकांनी निवडलेले सरपंचही जाहीर होतील. त्यामुळे या निवडणुकीची उत्सुकता सर्वांना लागली आहे. संबंधित ग्रामपंचायतींमध्ये आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.यावेळी प्रथमच नागरिकांमधून सरपंचाची थेट निवड होणार आहे. त्यामुळे बहुमत कोणत्या गटाला मिळते यापेक्षा सरपंच कोणाचा होतो यावर राजकीय पक्ष आपले लक्ष केंद्रीत करणआर आहे. ही निवडणूक राजकीय पक्षांच्या चिन्हावर होत नसली तरी सर्व प्रमुख पक्ष आपल्याच गटाचा किंवा पक्षाचा सरपंच व्हावा यासाठी जोमाने निवडणुकीत उतरण्याची शक्यता आहे.वर्ष २०११ च्या जनगणनेचा आधार घेऊन नव्याने प्रभागरचना आणि आरक्षण करण्यात आले आहे. ५ जानेवारी २०१७ पर्यंतच्या मूळ मतदार यादीनंतर जुलै महिन्यात नोंदणी झालेल्या नवीन मतदारांचा समावेश करून सुधारित मतदार यादी तयार करण्यात आली आहे.जिल्ह्यात अहेरी तालुक्यातील किष्टापूर ग्रामपंचायतीचा कार्यक्रम आधीच जाहीर करण्यात आला आहे. आदिवासीबहुल जिल्हा असल्यामुळे बहुतांश जागा अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव आहेत. परंतू जात पडताळणी करण्याबाबत जागृतीच नसल्यामुळे लोक निवडणुकीत उभे राहण्यापासून वंचित राहतात. त्यासाठी शासन स्तरावर चर्चा करून जिल्ह्यात जात पडताळणी समितीचे विशेष शिबिर लावण्याची मागणी जोर धरत आहे.निवडणूक प्रक्रियेला नक्षलवाद्यांचा विरोध असला तरी अलिकडे हा विरोध काहीसा सौम्य झाला आहे. त्यामुळे निवडणूक लढविण्यासाठी अतिसंवेदनशिल भागातील नागरिक ही पुढे येण्याची शक्यता आहे. मात्र त्या भागात निवडणूक यंत्रणेने योग्य प्रकारे जनजागृती करावी अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.अवघ्या ४ ग्रा.पं.साठी दुसरा टप्पाराज्यभरात आॅक्टोबर ते फेब्रुवारी यादरम्यान मुदत संपणाºया ग्रामपंचायतींची निवडणूक दोन टप्प्यात होत आहे. निवडणूक यंत्रणेवर ताण येऊ नये म्हणून पहिल्या टप्प्यात डिसेंबरपर्यंत मुदत संपणाºया ग्रा.पं.च्या निवडणुका होत आहे. परंतू गडचिरोली जिल्ह्यात फेब्रुवारीपर्यंत केवळ ३१ ग्रा.पं.च्या निवडणूक लागणार आहे. या सर्व ठिकाणची निवडणूक एकाच टप्प्यात घेणे सहज शक्य होते. परंतू तसे न करता केवळ ४ ग्रामपंचायतींची निवडणूक दुसºया टप्प्यात होणार असल्यामुळे प्रशासकीय खर्च वाढणार आहे.रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीला खो२७ मे २०१७ रोजी झालेल्या ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीत ४३७ जागांवर कोणीच उमेदवार निवडणूक लढण्यासाठी पुढे आले नव्हते. त्या ठिकाणी तीन महिन्यानंतर पुन्हा निवडणूक कार्यक्रम लावता येतो. परंतू शासनाने जाहीर केलेल्या पहिल्या टप्प्यातील निवडणूक कार्यक्रमात रिक्त पदे असलेल्या ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीला ‘खो’ देण्यात आला आहे. त्यामुळे गावांच्या विकासाचा पाया असणाºया ग्रामपंचायतींमधील रिक्त पदांचे प्रशासन किंवा निवडणूक आयोगाला गांभिर्य नाही का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.अशी असेल पात्रतासदर निवडणूक लढवू इच्छिणारा उमेदवार जर १ जानेवारी १९९५ नंतर जन्मलेला असेल तर तो किमान सातवा वर्ग उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.ज्या ग्रामपंचायतमध्ये उमेदवार निवडणूक लढणार आहे त्या गावाच्या मतदार यादीत त्याचे नाव असणे गरजेचे आहे.इच्छुक उमेदवाराने वयाचे २१ वर्षे पूर्ण केलेले असावे.१२ सप्टेंबर २००१ नंतर २ पेक्षा अधिक अपत्यांचा जन्म झाला असल्यास ते उमेदवार अपात्र ठरणार आहेत.उमेदवाला जात आणि जात पडताळणी प्रमाणपत्र जोडावे लागणार आहे. नसल्यास त्यासाठी अर्ज केलेला असावा.इच्छुक उमेदवाराच्या घरी शौचालय असणे आवश्यक आहे.