शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
3
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
4
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
5
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
6
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
7
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
8
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
9
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
10
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
11
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
12
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
13
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
14
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
15
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
16
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
17
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
18
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
19
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
20
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

२६ ग्रामपंचायतीत आचारसंहिता लागू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 22:36 IST

येत्या नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात मुदत संपत असलेल्या जिल्ह्यातील २६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या १४ आॅक्टोबरला मतदान होणार आहे.

ठळक मुद्दे१४ आॅक्टोबरला मतदान : युवा उमेदवारांसाठी सातवी पासची अट

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : येत्या नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात मुदत संपत असलेल्या जिल्ह्यातील २६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या १४ आॅक्टोबरला मतदान होणार आहे. १६ आॅक्टोबरला निकाल जाहीर होऊन नागरिकांनी निवडलेले सरपंचही जाहीर होतील. त्यामुळे या निवडणुकीची उत्सुकता सर्वांना लागली आहे. संबंधित ग्रामपंचायतींमध्ये आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.यावेळी प्रथमच नागरिकांमधून सरपंचाची थेट निवड होणार आहे. त्यामुळे बहुमत कोणत्या गटाला मिळते यापेक्षा सरपंच कोणाचा होतो यावर राजकीय पक्ष आपले लक्ष केंद्रीत करणआर आहे. ही निवडणूक राजकीय पक्षांच्या चिन्हावर होत नसली तरी सर्व प्रमुख पक्ष आपल्याच गटाचा किंवा पक्षाचा सरपंच व्हावा यासाठी जोमाने निवडणुकीत उतरण्याची शक्यता आहे.वर्ष २०११ च्या जनगणनेचा आधार घेऊन नव्याने प्रभागरचना आणि आरक्षण करण्यात आले आहे. ५ जानेवारी २०१७ पर्यंतच्या मूळ मतदार यादीनंतर जुलै महिन्यात नोंदणी झालेल्या नवीन मतदारांचा समावेश करून सुधारित मतदार यादी तयार करण्यात आली आहे.जिल्ह्यात अहेरी तालुक्यातील किष्टापूर ग्रामपंचायतीचा कार्यक्रम आधीच जाहीर करण्यात आला आहे. आदिवासीबहुल जिल्हा असल्यामुळे बहुतांश जागा अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव आहेत. परंतू जात पडताळणी करण्याबाबत जागृतीच नसल्यामुळे लोक निवडणुकीत उभे राहण्यापासून वंचित राहतात. त्यासाठी शासन स्तरावर चर्चा करून जिल्ह्यात जात पडताळणी समितीचे विशेष शिबिर लावण्याची मागणी जोर धरत आहे.निवडणूक प्रक्रियेला नक्षलवाद्यांचा विरोध असला तरी अलिकडे हा विरोध काहीसा सौम्य झाला आहे. त्यामुळे निवडणूक लढविण्यासाठी अतिसंवेदनशिल भागातील नागरिक ही पुढे येण्याची शक्यता आहे. मात्र त्या भागात निवडणूक यंत्रणेने योग्य प्रकारे जनजागृती करावी अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.अवघ्या ४ ग्रा.पं.साठी दुसरा टप्पाराज्यभरात आॅक्टोबर ते फेब्रुवारी यादरम्यान मुदत संपणाºया ग्रामपंचायतींची निवडणूक दोन टप्प्यात होत आहे. निवडणूक यंत्रणेवर ताण येऊ नये म्हणून पहिल्या टप्प्यात डिसेंबरपर्यंत मुदत संपणाºया ग्रा.पं.च्या निवडणुका होत आहे. परंतू गडचिरोली जिल्ह्यात फेब्रुवारीपर्यंत केवळ ३१ ग्रा.पं.च्या निवडणूक लागणार आहे. या सर्व ठिकाणची निवडणूक एकाच टप्प्यात घेणे सहज शक्य होते. परंतू तसे न करता केवळ ४ ग्रामपंचायतींची निवडणूक दुसºया टप्प्यात होणार असल्यामुळे प्रशासकीय खर्च वाढणार आहे.रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीला खो२७ मे २०१७ रोजी झालेल्या ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीत ४३७ जागांवर कोणीच उमेदवार निवडणूक लढण्यासाठी पुढे आले नव्हते. त्या ठिकाणी तीन महिन्यानंतर पुन्हा निवडणूक कार्यक्रम लावता येतो. परंतू शासनाने जाहीर केलेल्या पहिल्या टप्प्यातील निवडणूक कार्यक्रमात रिक्त पदे असलेल्या ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीला ‘खो’ देण्यात आला आहे. त्यामुळे गावांच्या विकासाचा पाया असणाºया ग्रामपंचायतींमधील रिक्त पदांचे प्रशासन किंवा निवडणूक आयोगाला गांभिर्य नाही का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.अशी असेल पात्रतासदर निवडणूक लढवू इच्छिणारा उमेदवार जर १ जानेवारी १९९५ नंतर जन्मलेला असेल तर तो किमान सातवा वर्ग उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.ज्या ग्रामपंचायतमध्ये उमेदवार निवडणूक लढणार आहे त्या गावाच्या मतदार यादीत त्याचे नाव असणे गरजेचे आहे.इच्छुक उमेदवाराने वयाचे २१ वर्षे पूर्ण केलेले असावे.१२ सप्टेंबर २००१ नंतर २ पेक्षा अधिक अपत्यांचा जन्म झाला असल्यास ते उमेदवार अपात्र ठरणार आहेत.उमेदवाला जात आणि जात पडताळणी प्रमाणपत्र जोडावे लागणार आहे. नसल्यास त्यासाठी अर्ज केलेला असावा.इच्छुक उमेदवाराच्या घरी शौचालय असणे आवश्यक आहे.