शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

दरवर्षीचा जलकैद: वट्रा खुर्द पुलामुळे ३० गावांचे जगणे संकटात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 18:47 IST

दर पावसाळ्यात तुटतो जगण्याचा मार्ग : वट्रा खुर्द पूल प्रशासनाच्या दुर्लक्षात

सिरोंचा : गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुका हा अनेक दुर्गम व आदिवासी बहुल गावांनी व्यापलेला असून, या भागात मूलभूत सुविधांची टंचाई आजही जाणवते. त्यातच अहेरी - देवलमरी - वेंकटापूर - मोयाबिनपेठा- सिरोंचा मार्गावर असलेला वट्रा खुर्द येथील लहान पूल दरवर्षी पावसाळ्यात गावकऱ्यांच्या समस्यांना निमंत्रण देतो.

पावसाळ्यात या लहान पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्यामुळे हा मार्ग १ ते २ महिने पूर्णपणे बंद राहतो. परिणामी, या मार्गावर अवलंबून असलेल्या २० ते ३० गावांतील नागरिकांना अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण आणि दळणवळण यांसारख्या मूलभूत गरजांसाठी प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागते.

आपत्कालीन आरोग्य सेवा, रुग्णवाहिका, गर्भवती महिलांची ने-आण, शाळा-महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची वाहतूक या सर्व गोष्टी थांबतात. या समस्येमुळे संपूर्ण परिसर शहरी संपर्कापासून तुटतो आणि नागरिक जणू पावसाळ्यात कैदेतच अडकतात.

स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा प्रशासनाकडे उंच आणि मजबूत पुलाची मागणी केली असली, तरी ती आजतागायत फक्त कागदावरच राहिली आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. सुधीर किसन मुडुमडिगेला (मु. टेकडा ताला), श्री. प्रभाकर परपटलावर (मु. मोयाबिनपेठा), आणि श्री. राम वेकन्ना अग्गुवार (मु. नरसिंहपल्ली) यांनी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद गडचिरोली, श्री. सुहास गाडे यांना निवेदन सादर करून वट्रा खुर्द येथे उंच व मजबूत पुलाची तातडीने मंजुरी देण्याची जोरदार मागणी केली आहे.

या निवेदनात त्यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे की, सध्याचा पूल हा फारच कमी उंचीचा असून, अल्प पावसातही पाण्याखाली जातो. त्यामुळे पूल बंद पडल्यावर या मार्गावरील सर्व वाहतूक ठप्प होते आणि सामान्य जनतेचे जीवनमान पूर्णपणे विस्कळीत होते.

"आम्हाला विकासाची नाही, तर जीवन जगण्यासाठी मूलभूत सुविधांची गरज आहे," अशी भावना अनेक गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

गावकऱ्यांच्या या दीर्घकालीन मागणीचा गांभीर्याने विचार करून वट्रा खुर्द येथे उंच आणि टिकाऊ पूल उभारणे ही काळाची गरज आहे, हे प्रशासनाने ओळखावे, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे. 

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली