शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
3
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
4
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
5
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
6
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
7
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
8
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
9
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
10
चीनचा Bajaj ला मोठा धक्का; ऑगस्टपासून बंद होऊ शकते EV चे उत्पादन, कारण काय..?
11
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
12
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
13
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
14
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
15
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
16
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
17
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
18
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
19
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
20
31 जुलैपासून सुरू होणार 'या' कंपनीचा कार प्लांट, दर वर्षी बाहेर पडणार 1.50 लाख इलेक्ट्रिक कार!

दरवर्षीचा जलकैद: वट्रा खुर्द पुलामुळे ३० गावांचे जगणे संकटात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 18:47 IST

दर पावसाळ्यात तुटतो जगण्याचा मार्ग : वट्रा खुर्द पूल प्रशासनाच्या दुर्लक्षात

सिरोंचा : गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुका हा अनेक दुर्गम व आदिवासी बहुल गावांनी व्यापलेला असून, या भागात मूलभूत सुविधांची टंचाई आजही जाणवते. त्यातच अहेरी - देवलमरी - वेंकटापूर - मोयाबिनपेठा- सिरोंचा मार्गावर असलेला वट्रा खुर्द येथील लहान पूल दरवर्षी पावसाळ्यात गावकऱ्यांच्या समस्यांना निमंत्रण देतो.

पावसाळ्यात या लहान पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्यामुळे हा मार्ग १ ते २ महिने पूर्णपणे बंद राहतो. परिणामी, या मार्गावर अवलंबून असलेल्या २० ते ३० गावांतील नागरिकांना अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण आणि दळणवळण यांसारख्या मूलभूत गरजांसाठी प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागते.

आपत्कालीन आरोग्य सेवा, रुग्णवाहिका, गर्भवती महिलांची ने-आण, शाळा-महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची वाहतूक या सर्व गोष्टी थांबतात. या समस्येमुळे संपूर्ण परिसर शहरी संपर्कापासून तुटतो आणि नागरिक जणू पावसाळ्यात कैदेतच अडकतात.

स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा प्रशासनाकडे उंच आणि मजबूत पुलाची मागणी केली असली, तरी ती आजतागायत फक्त कागदावरच राहिली आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. सुधीर किसन मुडुमडिगेला (मु. टेकडा ताला), श्री. प्रभाकर परपटलावर (मु. मोयाबिनपेठा), आणि श्री. राम वेकन्ना अग्गुवार (मु. नरसिंहपल्ली) यांनी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद गडचिरोली, श्री. सुहास गाडे यांना निवेदन सादर करून वट्रा खुर्द येथे उंच व मजबूत पुलाची तातडीने मंजुरी देण्याची जोरदार मागणी केली आहे.

या निवेदनात त्यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे की, सध्याचा पूल हा फारच कमी उंचीचा असून, अल्प पावसातही पाण्याखाली जातो. त्यामुळे पूल बंद पडल्यावर या मार्गावरील सर्व वाहतूक ठप्प होते आणि सामान्य जनतेचे जीवनमान पूर्णपणे विस्कळीत होते.

"आम्हाला विकासाची नाही, तर जीवन जगण्यासाठी मूलभूत सुविधांची गरज आहे," अशी भावना अनेक गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

गावकऱ्यांच्या या दीर्घकालीन मागणीचा गांभीर्याने विचार करून वट्रा खुर्द येथे उंच आणि टिकाऊ पूल उभारणे ही काळाची गरज आहे, हे प्रशासनाने ओळखावे, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे. 

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली