शहरं
Join us  
Trending Stories
1
टेस्लामध्ये मोठा पेच! पॅकेजवरून वाद, एलन मस्क कंपनी सोडण्याची शक्यता; अध्यक्षांचा गंभीर इशारा...
2
एकनाथ खडसेंच्या जळगावातील बंगल्यात चोरी; किती मुद्देमाल चोरून नेला?
3
मोठी अपडेट: श्रेयस अय्यर ड्रेसिंग रुममध्येच बेशुद्ध पडलेला; वैद्यकीय पथकाने लागलीच धोका ओळखला, नाहीतर...
4
"तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या...", भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं
5
कॉफीसाठी जगभरात प्रसिद्ध असलेला 'हा' देश मोठ्या संकटात! यावर्षीच्या सगळ्यात भयंकर विनाशाला सामोरा जाणार
6
पेटीएम, जीपे, फोनपेवरील ऑटो पे कसे बंद कराल? आपोआप जातायत सबस्क्रीप्शन, पेमेंटचे पैसे... 
7
CCTV फुटेजमध्ये भलत्याच ठिकाणी दिसला आरोपी अन्...; अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात ट्विस्टवर ट्विस्ट
8
Aadhaar Card New Rules 1st Nov: महत्त्वाची बातमी! १ नोव्हेंबरपासून बदलणार आधार कार्डाशी निगडीत ३ मोठे नियम, जाणून घ्या
9
शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स ८४,८८० च्या पार; निफ्टीही वधारला, 'या' प्रमुख स्टॉक्समध्ये तेजी
10
वनप्लस १५ येतोय...! पण १४ क्रमांक का वगळला? चिनी संस्कृतीत असे काय आहे...
11
शंकर महाराज प्रकट दिन: म्हणा अकरा कवनांचे स्तोत्र, विजयी होईल सर्वत्र; कामना होतील पूर्ण
12
Bank Holidays November 2025: नोव्हेंबरमध्ये किती दिवस बँका राहणार बंद? पाहा RBI ची हॉलिडे लिस्ट, पटापट आटपा काम
13
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
14
१०० वर्षांनी महालक्ष्मीसह ४ राजयोग: ७ राशींना सुबत्ता, कल्याण; बक्कळ लाभ, यशाचा मंगलमय काळ!
15
Tulasi Vivah 2025: विष्णू हे लक्ष्मीपती असूनही दरवर्षी तुळशीशी का लावला जातो विवाह?
16
LIC ची ‘ही’ स्कीम गुंतवणूकदारांना बनवेल कोट्यधीश!; ४ वर्षापर्यंत भरा प्रीमिअम, मिळतील १ कोटी
17
"मी तुला कच्च खाऊन टाकेन"; बायकोने नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडलं, चपलेने धू-धू धुतलं
18
आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२५: ‘मौनं सर्वार्थ साधनम्’, येणी वसूल होतील; सरकारी लाभ
19
चिनी हँडलर, टेलिग्राम ट्रॅप, लाखोंची लूट... ४७ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, तिघांना अटक
20
तुमचे अधिकारी वृत्तपत्र वाचत नाहीत का? देशाची प्रतिमा मलिन होतेय; भटक्या कुत्र्यांवरून भडकले कोर्ट

पावसाने ओलांडली वार्षिक सरासरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 06:00 IST

२५ जुलैपासून दमदार पावसाला सुरूवात झाली. २५ जुलै ते ३ सप्टेंबर या जळपास सव्वा महिन्याच्या कालावधीत अपवाद वगळता प्रत्येक दिवशी पाऊस पडत आहे. सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

ठळक मुद्देपाच वर्षातील सर्वाधिक पाऊस पडण्याची शक्यता : पावसाळा संपण्याच्या महिनाभर आधीच १४२७ मिमी पाऊस

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत सरासरी १३५४.७ मिमी पाऊस पडतो. मात्र यावर्षी सुरूवातीपासूनच दमदार पाऊस झाल्याने यावर्षीचा पावसाळा संपण्यास महिनाभराचा कालावधी शिल्लक असतानाच पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली. आतापर्यंत जिल्ह्यात १४२७.२ मिमी पाऊस झाला आहे. हा पाऊस वार्षिक सरासरीच्या १०५.३५ टक्के आहे.पावसाचा जोर असाच सुरू राहिल्यास सप्टेंबर अखेरपर्यंत मागील पाच वर्षातील रेकॉर्ड तुटेल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.२५ जुलैपासून दमदार पावसाला सुरूवात झाली. २५ जुलै ते ३ सप्टेंबर या जळपास सव्वा महिन्याच्या कालावधीत अपवाद वगळता प्रत्येक दिवशी पाऊस पडत आहे. सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. १ जून ते ३० सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत २०१४ मध्ये ११२९.९ मिमी, २०१५ मध्ये १००० मिमी, २०१६ मध्ये १५२६ मिमी, २०१७ मध्ये ८६४.२ मिमी, २०१८ मध्ये १३१५.७ मिमी पाऊस पडला आहे.३ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात ११५९ मिमी पाऊस पडणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात १४२७.२ मिमी पाऊस झाला आहे. अपेक्षित पावसाच्या सुमारे १२३.१३ मिमी पाऊस झाला आहे. सोमवारी व मंगळवारी झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणचे मार्ग बंद पडले होते. पर्लकोटा नदी पुलावर पाणी चढल्याने भामरागड तालुक्याचा संपर्क तुटला होता. भामरागड तालुक्याने सुध्दा यावर्षी पावसाच्या कहराचा अनुभव अवलंबला. एटापल्ली तालुक्यातीलही नदी, नाल्यांना पूर आल्याने अनेक गावांची वाट अडविली होती. सततच्या पावसामुळे सोयाबिन, कापूस पिके धोक्यात आली आहेत. अनेक शेतातील पिके पिवळी पडली असल्याचे दिसत आहे.अतिवृष्टीचा इशारागडचिरोली, भंडारा व गोंदिया या जिल्ह्यांमध्ये ४ सप्टेंबर रोजी अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व तालुकास्तरीय यंत्रोला सतर्क राहून खबदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. पाऊस सुरू असताना घराबाहेर पडताना नागरिकांनी उचीत काळजी घ्यावी. विजांचा कडकडाट सुरू असल्यास शेतात जाऊ नये, असे कळविले आहे.दोराच्या मदतीने ओलांडला पूलभामरागड-आलापल्ली मार्गावरील तुमरगुडा नाल्याच्या पुलावरून मंगळवारी सकाळी १० वाजता पाणी चढले. पाणी कमी होण्याची प्रतीक्षा करीत जवळपास ५० प्रवाशी थांबनू होते. मात्र कमी होण्याऐवजी वाढू लागला. त्यामुळे संबंधित प्रवाशी ताडगावकडे परत जाण्यासाठी निघाले. मात्र ताडगावजवळचा नाला सुध्दा भरला होता. त्यामुळे ताडगाव येथेही पोहोचणे कठीण होते. रात्र जंगलातच काढण्याची आपत्ती निर्माण झाली होती. ही बाब ताडगाव येथील व्यापारी, नागरिक व पोलिसांना माहित झाल्यानंतर त्यांनी ताडगाव जवळचा नाला गाठला. नाल्याच्या दोन्ही बाजुला दोर बांधून पुलावरून पाणी असतानाही प्रवाशांना ताडगावकडे सुखरूप बाहेर काढले. त्यांच्या जेवन व निवासाची व्यवस्था सुध्दा केली.

टॅग्स :Rainपाऊस