शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मध्य रेल्वेची ठाणे ते सीएसएमटी दरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद
2
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
3
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
4
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
5
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
6
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
7
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
8
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
9
'हिंदुस्तान झिदाबाद...' तिरंग्यासाठी लंडनमध्ये पाकिस्तानींशी भिडल्या भारतीय तरुणी, पाहा VIDEO
10
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...
12
LIC ची मोठी घोषणा! बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी; विलंब शुल्कातही मोठी सूट
13
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
14
रोनाल्डोचा साखरपुडा आणि सौदीचे ‘रहस्य’! स्थानिकांना वेगळा नियम आणि स्टारला वेगळा न्याय, का?
15
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
16
चिपळुणात वाशिष्ठी नदीने ओलांडली इशारा पातळी; पूरसदृश स्थितीमुळे कामाशिवाय घराबाहेर न पडण्याची सूचना
17
"२६ जुलैचा जलप्रलय, तुम्ही मला...", वीणा जामकरने सांगितली ज्योती चांदेकरांची भावुक आठवण
18
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
19
Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
20
"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी

पावसाने ओलांडली वार्षिक सरासरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 06:00 IST

२५ जुलैपासून दमदार पावसाला सुरूवात झाली. २५ जुलै ते ३ सप्टेंबर या जळपास सव्वा महिन्याच्या कालावधीत अपवाद वगळता प्रत्येक दिवशी पाऊस पडत आहे. सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

ठळक मुद्देपाच वर्षातील सर्वाधिक पाऊस पडण्याची शक्यता : पावसाळा संपण्याच्या महिनाभर आधीच १४२७ मिमी पाऊस

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत सरासरी १३५४.७ मिमी पाऊस पडतो. मात्र यावर्षी सुरूवातीपासूनच दमदार पाऊस झाल्याने यावर्षीचा पावसाळा संपण्यास महिनाभराचा कालावधी शिल्लक असतानाच पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली. आतापर्यंत जिल्ह्यात १४२७.२ मिमी पाऊस झाला आहे. हा पाऊस वार्षिक सरासरीच्या १०५.३५ टक्के आहे.पावसाचा जोर असाच सुरू राहिल्यास सप्टेंबर अखेरपर्यंत मागील पाच वर्षातील रेकॉर्ड तुटेल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.२५ जुलैपासून दमदार पावसाला सुरूवात झाली. २५ जुलै ते ३ सप्टेंबर या जळपास सव्वा महिन्याच्या कालावधीत अपवाद वगळता प्रत्येक दिवशी पाऊस पडत आहे. सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. १ जून ते ३० सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत २०१४ मध्ये ११२९.९ मिमी, २०१५ मध्ये १००० मिमी, २०१६ मध्ये १५२६ मिमी, २०१७ मध्ये ८६४.२ मिमी, २०१८ मध्ये १३१५.७ मिमी पाऊस पडला आहे.३ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात ११५९ मिमी पाऊस पडणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात १४२७.२ मिमी पाऊस झाला आहे. अपेक्षित पावसाच्या सुमारे १२३.१३ मिमी पाऊस झाला आहे. सोमवारी व मंगळवारी झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणचे मार्ग बंद पडले होते. पर्लकोटा नदी पुलावर पाणी चढल्याने भामरागड तालुक्याचा संपर्क तुटला होता. भामरागड तालुक्याने सुध्दा यावर्षी पावसाच्या कहराचा अनुभव अवलंबला. एटापल्ली तालुक्यातीलही नदी, नाल्यांना पूर आल्याने अनेक गावांची वाट अडविली होती. सततच्या पावसामुळे सोयाबिन, कापूस पिके धोक्यात आली आहेत. अनेक शेतातील पिके पिवळी पडली असल्याचे दिसत आहे.अतिवृष्टीचा इशारागडचिरोली, भंडारा व गोंदिया या जिल्ह्यांमध्ये ४ सप्टेंबर रोजी अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व तालुकास्तरीय यंत्रोला सतर्क राहून खबदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. पाऊस सुरू असताना घराबाहेर पडताना नागरिकांनी उचीत काळजी घ्यावी. विजांचा कडकडाट सुरू असल्यास शेतात जाऊ नये, असे कळविले आहे.दोराच्या मदतीने ओलांडला पूलभामरागड-आलापल्ली मार्गावरील तुमरगुडा नाल्याच्या पुलावरून मंगळवारी सकाळी १० वाजता पाणी चढले. पाणी कमी होण्याची प्रतीक्षा करीत जवळपास ५० प्रवाशी थांबनू होते. मात्र कमी होण्याऐवजी वाढू लागला. त्यामुळे संबंधित प्रवाशी ताडगावकडे परत जाण्यासाठी निघाले. मात्र ताडगावजवळचा नाला सुध्दा भरला होता. त्यामुळे ताडगाव येथेही पोहोचणे कठीण होते. रात्र जंगलातच काढण्याची आपत्ती निर्माण झाली होती. ही बाब ताडगाव येथील व्यापारी, नागरिक व पोलिसांना माहित झाल्यानंतर त्यांनी ताडगाव जवळचा नाला गाठला. नाल्याच्या दोन्ही बाजुला दोर बांधून पुलावरून पाणी असतानाही प्रवाशांना ताडगावकडे सुखरूप बाहेर काढले. त्यांच्या जेवन व निवासाची व्यवस्था सुध्दा केली.

टॅग्स :Rainपाऊस