शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

अंकिसाच्या मिरचीचा तेलंगणात ठसका; अंतर कमी अन् दरही मिळतोय जास्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2023 17:28 IST

उत्पादक वळले नागपूरऐवजी तेलंगणाकडे

महेश अगुला

अंकिसा (गडचिरोली) : सिरोंचा पासून नागपूरचे अंतर अधिक व मिरचीला दरही कमी, त्याऐवजी तेलंगणातील वरंगलचे अंतर कमी अन् भावही जास्त, त्यामुळे सिरोंचा तालुक्यातील मिरची विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात परराज्यात जाऊ लागली आहे. सिरोंचा तालुक्यातील अंकिसा सारख्या छोट्या गावातील मिरचीला तेलंगणात पसंती मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या हातात चांगले पैसे पडू लागले आहेत.

सिरोंचा तालुक्यातील अंकिसा ,असरअल्ली, बालमुत्यमपल्ली, टेकडा मोटला, वडदम, पोचमपल्ली ही मिरची उत्पादनासाठी परिचित असलेली गावे. धानाचा हंगाम संपल्यावर मिरची लागवड करुन जास्तीत जास्त उत्पादन मिळविण्यासाठी शेतकऱ्यांत स्पर्धा लागते. मोठ्या कष्टाने शेतकरी मिरची उत्पादन घेत असतात.

सिरोंचापासून नागपूर साडेतीनशे पेक्षा अधिक किलोमीटर अंतर आहे. त्याऐवजी तेलंगणातील वरंगल हे अवघ्या सव्वाशे किलोमीटरवर आहे. गतवर्षी शेतकऱ्यांनी नागपूरला मिरची विक्री केली, यंदा मात्र नागपूरला कमी दर मिळत असून वाहतूक खर्चही आवाक्याबाहेर आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची पसंती तेलंगणाला आहे.

अवकाळीचा फटका

मिरची उत्पादक शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा फटका बसला. तोडणी करुन वाळविण्यासाठी शेतात टाकलेली मिरची अवकाळी पावसाने भिजली. त्यामुळे आता दर कमी मिळेल, अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. यामुळे वरंगलच्या बाजारात आठ दिवसांपासून मिरचीच्या दरात चढ- उतार होत असल्याचे उत्पादक राजेश लंगारी, मनोज राल्लबंडी, नागेश जेयाडी, नरेश कोठारी, सतीश धन्नुरी, रवी कोठारी, नारायण येरकरी, मनोज राल्लबंडी यांनी सांगितले.

वरंगलच्या बाजारातील दर

मिरची वाण - दर (क्विंटलमध्ये)

३४१ - २१००० ते २५०००

डी. डी. - २४०००ते २६८०००

डब्ल्यू. एच . - ३४००० ते ३७६००

दीपिका - २९०००ते ३३०००

भाड्याने जमिनी घेऊन मिरची उत्पादन

सिरोंचा तालुक्यात अनेक शेतकरी भूमिहीन आहेत. असे लोक भाड्याने जमिनी घेऊन मिरचीचे उत्पादन घेतात. बोअरवेल हा या भागात एकमेव पाण्याचा स्त्रोत आहे. पाण्याची सोय असलेली एक एकर जमीन ५० हजार रुपयांपेक्षा अधिक रुपयांनी भाड्याने घेतात, तर पाण्याची सोय नसेल तर एकरी ४० हजार रुपये भाडे मोजावे लागते

मिरची उत्पादनासाठी शाश्वत पाणी नाही. त्यासाठी तलाव होणे गरचेजे आहे. शिवाय उत्पादकांना प्रोत्साहन म्हणून कृषी विभागाने मिरचीची रोपे किंवा बियाणे द्यावीत. यामुळे शेतकऱ्यांना हातभार लागू शकतो. नागपूरचे अंतर जास्त असल्याने यंदा तेलंगणात मिरची विक्रीकडे कल आहे.

- धर्मय्या कोठारी, मिरची उत्पादक

सिरोंचा तालुक्यात मिरचीचे उत्पादन अधिक होते, पण हक्काची बाजारपेठ नाही. ही सुविधा तालुक्यात उपलब्ध झाली तर आणखी फायदा होऊ शकतो. उत्पादकांना अनेक नैसर्गिक संकटांना तोंड द्यावे लागते, त्यामुळे शासनाने अनुदान देखील सुरु करणे गरजेचे बनले आहे.

- रवी बोरे, मिरची उत्पादक

टॅग्स :agricultureशेतीGadchiroliगडचिरोली