शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

अंकिसाच्या मिरचीचा तेलंगणात ठसका; अंतर कमी अन् दरही मिळतोय जास्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2023 17:28 IST

उत्पादक वळले नागपूरऐवजी तेलंगणाकडे

महेश अगुला

अंकिसा (गडचिरोली) : सिरोंचा पासून नागपूरचे अंतर अधिक व मिरचीला दरही कमी, त्याऐवजी तेलंगणातील वरंगलचे अंतर कमी अन् भावही जास्त, त्यामुळे सिरोंचा तालुक्यातील मिरची विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात परराज्यात जाऊ लागली आहे. सिरोंचा तालुक्यातील अंकिसा सारख्या छोट्या गावातील मिरचीला तेलंगणात पसंती मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या हातात चांगले पैसे पडू लागले आहेत.

सिरोंचा तालुक्यातील अंकिसा ,असरअल्ली, बालमुत्यमपल्ली, टेकडा मोटला, वडदम, पोचमपल्ली ही मिरची उत्पादनासाठी परिचित असलेली गावे. धानाचा हंगाम संपल्यावर मिरची लागवड करुन जास्तीत जास्त उत्पादन मिळविण्यासाठी शेतकऱ्यांत स्पर्धा लागते. मोठ्या कष्टाने शेतकरी मिरची उत्पादन घेत असतात.

सिरोंचापासून नागपूर साडेतीनशे पेक्षा अधिक किलोमीटर अंतर आहे. त्याऐवजी तेलंगणातील वरंगल हे अवघ्या सव्वाशे किलोमीटरवर आहे. गतवर्षी शेतकऱ्यांनी नागपूरला मिरची विक्री केली, यंदा मात्र नागपूरला कमी दर मिळत असून वाहतूक खर्चही आवाक्याबाहेर आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची पसंती तेलंगणाला आहे.

अवकाळीचा फटका

मिरची उत्पादक शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा फटका बसला. तोडणी करुन वाळविण्यासाठी शेतात टाकलेली मिरची अवकाळी पावसाने भिजली. त्यामुळे आता दर कमी मिळेल, अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. यामुळे वरंगलच्या बाजारात आठ दिवसांपासून मिरचीच्या दरात चढ- उतार होत असल्याचे उत्पादक राजेश लंगारी, मनोज राल्लबंडी, नागेश जेयाडी, नरेश कोठारी, सतीश धन्नुरी, रवी कोठारी, नारायण येरकरी, मनोज राल्लबंडी यांनी सांगितले.

वरंगलच्या बाजारातील दर

मिरची वाण - दर (क्विंटलमध्ये)

३४१ - २१००० ते २५०००

डी. डी. - २४०००ते २६८०००

डब्ल्यू. एच . - ३४००० ते ३७६००

दीपिका - २९०००ते ३३०००

भाड्याने जमिनी घेऊन मिरची उत्पादन

सिरोंचा तालुक्यात अनेक शेतकरी भूमिहीन आहेत. असे लोक भाड्याने जमिनी घेऊन मिरचीचे उत्पादन घेतात. बोअरवेल हा या भागात एकमेव पाण्याचा स्त्रोत आहे. पाण्याची सोय असलेली एक एकर जमीन ५० हजार रुपयांपेक्षा अधिक रुपयांनी भाड्याने घेतात, तर पाण्याची सोय नसेल तर एकरी ४० हजार रुपये भाडे मोजावे लागते

मिरची उत्पादनासाठी शाश्वत पाणी नाही. त्यासाठी तलाव होणे गरचेजे आहे. शिवाय उत्पादकांना प्रोत्साहन म्हणून कृषी विभागाने मिरचीची रोपे किंवा बियाणे द्यावीत. यामुळे शेतकऱ्यांना हातभार लागू शकतो. नागपूरचे अंतर जास्त असल्याने यंदा तेलंगणात मिरची विक्रीकडे कल आहे.

- धर्मय्या कोठारी, मिरची उत्पादक

सिरोंचा तालुक्यात मिरचीचे उत्पादन अधिक होते, पण हक्काची बाजारपेठ नाही. ही सुविधा तालुक्यात उपलब्ध झाली तर आणखी फायदा होऊ शकतो. उत्पादकांना अनेक नैसर्गिक संकटांना तोंड द्यावे लागते, त्यामुळे शासनाने अनुदान देखील सुरु करणे गरजेचे बनले आहे.

- रवी बोरे, मिरची उत्पादक

टॅग्स :agricultureशेतीGadchiroliगडचिरोली