शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

अंकिसाच्या मिरचीचा तेलंगणात ठसका; अंतर कमी अन् दरही मिळतोय जास्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2023 17:28 IST

उत्पादक वळले नागपूरऐवजी तेलंगणाकडे

महेश अगुला

अंकिसा (गडचिरोली) : सिरोंचा पासून नागपूरचे अंतर अधिक व मिरचीला दरही कमी, त्याऐवजी तेलंगणातील वरंगलचे अंतर कमी अन् भावही जास्त, त्यामुळे सिरोंचा तालुक्यातील मिरची विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात परराज्यात जाऊ लागली आहे. सिरोंचा तालुक्यातील अंकिसा सारख्या छोट्या गावातील मिरचीला तेलंगणात पसंती मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या हातात चांगले पैसे पडू लागले आहेत.

सिरोंचा तालुक्यातील अंकिसा ,असरअल्ली, बालमुत्यमपल्ली, टेकडा मोटला, वडदम, पोचमपल्ली ही मिरची उत्पादनासाठी परिचित असलेली गावे. धानाचा हंगाम संपल्यावर मिरची लागवड करुन जास्तीत जास्त उत्पादन मिळविण्यासाठी शेतकऱ्यांत स्पर्धा लागते. मोठ्या कष्टाने शेतकरी मिरची उत्पादन घेत असतात.

सिरोंचापासून नागपूर साडेतीनशे पेक्षा अधिक किलोमीटर अंतर आहे. त्याऐवजी तेलंगणातील वरंगल हे अवघ्या सव्वाशे किलोमीटरवर आहे. गतवर्षी शेतकऱ्यांनी नागपूरला मिरची विक्री केली, यंदा मात्र नागपूरला कमी दर मिळत असून वाहतूक खर्चही आवाक्याबाहेर आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची पसंती तेलंगणाला आहे.

अवकाळीचा फटका

मिरची उत्पादक शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा फटका बसला. तोडणी करुन वाळविण्यासाठी शेतात टाकलेली मिरची अवकाळी पावसाने भिजली. त्यामुळे आता दर कमी मिळेल, अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. यामुळे वरंगलच्या बाजारात आठ दिवसांपासून मिरचीच्या दरात चढ- उतार होत असल्याचे उत्पादक राजेश लंगारी, मनोज राल्लबंडी, नागेश जेयाडी, नरेश कोठारी, सतीश धन्नुरी, रवी कोठारी, नारायण येरकरी, मनोज राल्लबंडी यांनी सांगितले.

वरंगलच्या बाजारातील दर

मिरची वाण - दर (क्विंटलमध्ये)

३४१ - २१००० ते २५०००

डी. डी. - २४०००ते २६८०००

डब्ल्यू. एच . - ३४००० ते ३७६००

दीपिका - २९०००ते ३३०००

भाड्याने जमिनी घेऊन मिरची उत्पादन

सिरोंचा तालुक्यात अनेक शेतकरी भूमिहीन आहेत. असे लोक भाड्याने जमिनी घेऊन मिरचीचे उत्पादन घेतात. बोअरवेल हा या भागात एकमेव पाण्याचा स्त्रोत आहे. पाण्याची सोय असलेली एक एकर जमीन ५० हजार रुपयांपेक्षा अधिक रुपयांनी भाड्याने घेतात, तर पाण्याची सोय नसेल तर एकरी ४० हजार रुपये भाडे मोजावे लागते

मिरची उत्पादनासाठी शाश्वत पाणी नाही. त्यासाठी तलाव होणे गरचेजे आहे. शिवाय उत्पादकांना प्रोत्साहन म्हणून कृषी विभागाने मिरचीची रोपे किंवा बियाणे द्यावीत. यामुळे शेतकऱ्यांना हातभार लागू शकतो. नागपूरचे अंतर जास्त असल्याने यंदा तेलंगणात मिरची विक्रीकडे कल आहे.

- धर्मय्या कोठारी, मिरची उत्पादक

सिरोंचा तालुक्यात मिरचीचे उत्पादन अधिक होते, पण हक्काची बाजारपेठ नाही. ही सुविधा तालुक्यात उपलब्ध झाली तर आणखी फायदा होऊ शकतो. उत्पादकांना अनेक नैसर्गिक संकटांना तोंड द्यावे लागते, त्यामुळे शासनाने अनुदान देखील सुरु करणे गरजेचे बनले आहे.

- रवी बोरे, मिरची उत्पादक

टॅग्स :agricultureशेतीGadchiroliगडचिरोली