शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

अंकिसाच्या मिरचीचा तेलंगणात ठसका; अंतर कमी अन् दरही मिळतोय जास्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2023 17:28 IST

उत्पादक वळले नागपूरऐवजी तेलंगणाकडे

महेश अगुला

अंकिसा (गडचिरोली) : सिरोंचा पासून नागपूरचे अंतर अधिक व मिरचीला दरही कमी, त्याऐवजी तेलंगणातील वरंगलचे अंतर कमी अन् भावही जास्त, त्यामुळे सिरोंचा तालुक्यातील मिरची विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात परराज्यात जाऊ लागली आहे. सिरोंचा तालुक्यातील अंकिसा सारख्या छोट्या गावातील मिरचीला तेलंगणात पसंती मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या हातात चांगले पैसे पडू लागले आहेत.

सिरोंचा तालुक्यातील अंकिसा ,असरअल्ली, बालमुत्यमपल्ली, टेकडा मोटला, वडदम, पोचमपल्ली ही मिरची उत्पादनासाठी परिचित असलेली गावे. धानाचा हंगाम संपल्यावर मिरची लागवड करुन जास्तीत जास्त उत्पादन मिळविण्यासाठी शेतकऱ्यांत स्पर्धा लागते. मोठ्या कष्टाने शेतकरी मिरची उत्पादन घेत असतात.

सिरोंचापासून नागपूर साडेतीनशे पेक्षा अधिक किलोमीटर अंतर आहे. त्याऐवजी तेलंगणातील वरंगल हे अवघ्या सव्वाशे किलोमीटरवर आहे. गतवर्षी शेतकऱ्यांनी नागपूरला मिरची विक्री केली, यंदा मात्र नागपूरला कमी दर मिळत असून वाहतूक खर्चही आवाक्याबाहेर आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची पसंती तेलंगणाला आहे.

अवकाळीचा फटका

मिरची उत्पादक शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा फटका बसला. तोडणी करुन वाळविण्यासाठी शेतात टाकलेली मिरची अवकाळी पावसाने भिजली. त्यामुळे आता दर कमी मिळेल, अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. यामुळे वरंगलच्या बाजारात आठ दिवसांपासून मिरचीच्या दरात चढ- उतार होत असल्याचे उत्पादक राजेश लंगारी, मनोज राल्लबंडी, नागेश जेयाडी, नरेश कोठारी, सतीश धन्नुरी, रवी कोठारी, नारायण येरकरी, मनोज राल्लबंडी यांनी सांगितले.

वरंगलच्या बाजारातील दर

मिरची वाण - दर (क्विंटलमध्ये)

३४१ - २१००० ते २५०००

डी. डी. - २४०००ते २६८०००

डब्ल्यू. एच . - ३४००० ते ३७६००

दीपिका - २९०००ते ३३०००

भाड्याने जमिनी घेऊन मिरची उत्पादन

सिरोंचा तालुक्यात अनेक शेतकरी भूमिहीन आहेत. असे लोक भाड्याने जमिनी घेऊन मिरचीचे उत्पादन घेतात. बोअरवेल हा या भागात एकमेव पाण्याचा स्त्रोत आहे. पाण्याची सोय असलेली एक एकर जमीन ५० हजार रुपयांपेक्षा अधिक रुपयांनी भाड्याने घेतात, तर पाण्याची सोय नसेल तर एकरी ४० हजार रुपये भाडे मोजावे लागते

मिरची उत्पादनासाठी शाश्वत पाणी नाही. त्यासाठी तलाव होणे गरचेजे आहे. शिवाय उत्पादकांना प्रोत्साहन म्हणून कृषी विभागाने मिरचीची रोपे किंवा बियाणे द्यावीत. यामुळे शेतकऱ्यांना हातभार लागू शकतो. नागपूरचे अंतर जास्त असल्याने यंदा तेलंगणात मिरची विक्रीकडे कल आहे.

- धर्मय्या कोठारी, मिरची उत्पादक

सिरोंचा तालुक्यात मिरचीचे उत्पादन अधिक होते, पण हक्काची बाजारपेठ नाही. ही सुविधा तालुक्यात उपलब्ध झाली तर आणखी फायदा होऊ शकतो. उत्पादकांना अनेक नैसर्गिक संकटांना तोंड द्यावे लागते, त्यामुळे शासनाने अनुदान देखील सुरु करणे गरजेचे बनले आहे.

- रवी बोरे, मिरची उत्पादक

टॅग्स :agricultureशेतीGadchiroliगडचिरोली