शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

अन् अजगरच निघाला कोंबडीचोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:44 IST

देसाईगंजपासून शंकरपूरमार्गे १३ किलोमीटर अंतरावर असलेल्या विठ्ठलगाव येथील बहुतेक नागरिकांच्या कोंबड्या दररोज गायब होत असत. श्रावण मास संपत ...

देसाईगंजपासून शंकरपूरमार्गे १३ किलोमीटर अंतरावर असलेल्या विठ्ठलगाव येथील बहुतेक नागरिकांच्या कोंबड्या दररोज गायब होत असत. श्रावण मास संपत आल्याने कुणीतरी गावातील किंवा गावाबाहेरील कोंबडीचोर कोंबड्या चोरण्यासाठी चटावला असेल असा येथील नागरिकांचा अंदाज होता. त्यामुळे त्या कोंबडी चोराला रंगेहात पकडायचे असा निश्चय करून गावकऱ्यांनी पाळत ठेवली. यादरम्यान अमोल गोठे यांच्या घराजवळ वंजारी यांच्या कडकनाथ कोंबड्यांच्या पोल्ट्री फार्मकडून कोंबड्या ओरडण्याचा आवाज आला. गावकऱ्यांनी लागलीच तिकडे धाव घेतली. पाहतात तर काय, प्रचंड मोठा अजगर त्यांच्या दृष्टिपथास पडला. गावकऱ्यांना ज्याचा शोध होता तो कोंबडीचोर हाच असल्याची खात्री पटली.

अजगराने त्या फार्ममधील तब्बल बारा कोंबड्या गिळंकृत केल्या होत्या. त्यामुळे संतापलेले गावकरी त्याला मारणार, तेवढ्यात अमोल गोठे यांनी त्यांना थांबवत देसाईगंज येथील आपल्या परिचयातील सर्पमित्राला बोलावून त्या अजगराला पकडले. त्यानंतर त्याला त्याच्या अधिवासात (जंगलात) सोडण्यात आले.

080921\img-20210906-wa0143.jpg

देसाईगंज येथील सर्पमीञांनी अजगराची केली सुटका व सोडले मुक्त अधिवासात.