शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

काका- पुतण्यांच्या समर्थकांत तू तू- मैं मैं; सोशल मीडियातून एकमेकांवर चिखलफेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2024 14:41 IST

अहेरीत कार्टून वॉर : काढतात उणी-दुणी

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजताच अहेरी राजनगरीतील राजकारण तापण्यास सुरुवात झाली आहे. सोशल मीडियातून मंत्री धर्मरावबाबा आत्राम व त्यांचे पुतणे व माजी राज्यमंत्री अम्बिशराव आत्राम यांच्या समर्थकांनी एकमेकांवर चिखलफेक केली. यासाठी सूचक संदेश देणारे कार्टून अन् व्हिडीओ बनवून पोस्ट केले. यावेळी समर्थकांमध्ये एकेरी शब्दांत तू तू मैं मैंदेखील झाली.

जिल्ह्याच्या राजकारणाची दिशा ठरविणाऱ्या अहेरी मतदारसंघातील लढत लक्षवेधी होण्याची शक्यता आहे. येथे मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना महायुतीकडून तिकीट हवे आहे, तर माजी राज्यमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांनीही उमेदवारीवर दावा केला आहे. भाग्यश्री आत्राम यांनी वडिलांविरोधात बंड करून वेगळी वाट निवडली आहे. महायुती व महाविकास आघाडीच्या वाटाघाटीत अहेरीची जागा कोणाला सुटते, यावर लढतीचे चित्र अवलंबून आहे. 

तूर्त मंत्री धर्मरावबाबा आत्राम व अम्ब्रिशराव आत्राम यांच्यात जोरदार वाक् युध्द रंगले आहे. अम्ब्रिशराव यांनी मतदारसंघातील रस्ते, पुलांवरून धर्मरावबाबा यांच्याविरुद्ध जाहीर आरोप केले आहेत, तसेच त्यांच्या हेलिकॉप्टर दौऱ्यांवरूनही टीकास्त्र सोडले आहे. 

यास धर्मरावबाबा यांनीही साडेचार वर्षे झोपलेल्यांना आता जाग आली, अशा शब्दांत पलटवार करून दुखऱ्या नसीवर बोट ठेवले आहे. त्यानंतर आता दोन्ही गटांकडून एकमेकांना नामोहरम करण्यासाठी सूचक कार्टूनचे अस्त्र वापरण्यात आले आहे. सोशल मीडियात दोघांच्या कार्यकर्त्यांमध्ये घमासान सुरू आहे. कार्यकर्त्यांमधील या आरोप- प्रत्यारोपाने प्रचारा आधीच राजकारण तापले असून प्रत्यक्ष निवडणुकीपर्यंत हा वाद आणखी काय काय वळणे घेतो याकडे सर्वांचे लक्ष आहे. 

महायुतीतील संघर्ष टिपेला 

  • दरम्यान, महायुतीत भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) एकत्रित • आहेत. मात्र, अहेरीत आत्राम काका-पुतण्यातून विस्तवही जात नाही. त्यामुळे येथे युतीधर्म न पाळता दोघेही राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी आमने-सामने येणार आहेत. 
  • २०१४ व २०१९ मध्येही या दोघांमध्ये लढत झाली होती. २०१४ मध्ये नवख्या अम्ब्रेिशरावांनी काका धर्मरावबाबांना पराभूत केले होते, तर २०१९ मध्ये धर्मरावबाबा यांनी अम्ब्रेिशराव यांना अस्मान दाखवले होते. 
  • आता सामना बरोबरीत असल्याने यावेळी काय होणार, याची सर्वांना उत्सुकता आहे. तूर्त महायुतीतील तसेच आत्राम राजपरिवारातील काका- पुतण्यातील राजकीय संघर्ष टिपेला पोहोचल्याचे चित्र आहे.

नात्यागोत्यांभोवती राजकारण अहेरीच्या राजकारणावर राजपरिवाराचा सुरुवातीपासूनच प्रभाव राहिलेला आहे. काका-पुतणे यांच्यातील दहा वर्षांपासूनच्या संघर्षात आता भाग्यश्री आत्रांच्या बंडाने नवी भर पडली आहे. त्यामुळे यावेळी येथे पिता- कन्या, बहीण- भाऊ असे नात्यागोत्याचे राजकारण रंगण्याची शक्यता आहे.

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीPoliticsराजकारणElectionनिवडणूक 2024